शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

नुकसानाचे पंचनामे सहानुभूतीने करा : जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:33 IST

असगोली : नुकसानभरपाई राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे मिळणार की ‘निसर्ग’ वादळाप्रमाणे महाराष्ट्र शासन निकष लावणार, हे अजूनही नक्की ...

असगोली : नुकसानभरपाई राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे मिळणार की ‘निसर्ग’ वादळाप्रमाणे महाराष्ट्र शासन निकष लावणार, हे अजूनही नक्की व्हायचे आहे. मात्र, बाधित जनतेचा सहानभूतीपूर्वक विचार करून आपण पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त त्यातून सुटता कामा नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.

ते गुहागर पंचायत समितीच्या ‘तौउते’ वादळ नुकसान आढावा बैठकीत बोलत होते.

गुहागर तालुक्यात १३४ घरे, ३ गोठे, जिल्हा परिषद शाळांचे ३ रंगमंच, २ ग्रामपंचायत इमारती, २ सार्वजनिक शौचालये, २ स्मशानभूमी यांचे अंशत: नुकसान झाले आहे. एक कृषी पंप वाहून गेला आहे. ४ गुरे दगावली आहेत. १४ फळझाडांचे नुकसान झाले आहे. १ मासेमारी बोट, १ गांडूळ खताचा प्रकल्प यांचेही नुकसान झाले आहे. सुमारे ८५ हेक्टरवरील फळबागा आणि शेतीचे नुकसान झाले आहे, असा प्राथमिक अहवाल या बैठकीत ठेवण्यात आला.

तौउते वादळात महावितरणचे १५० उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचे खांब आणि ३५० लघु दाबाच्या वीज वाहिन्यांचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे १७,४०० ग्राहकांचा वीजपुरवठा आजही खंडित आहे. पालशेत, आबलोली आणि गुहागर शाखा कार्यालय क्षेत्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे, अशी माहिती रानवीच्या शाखा अभियंत्यांनी दिली.

यावेळी आमदार जाधव म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती कायद्याप्रमाणे नुकसानभरपाई दिली गेली, तर अंशत: नुकसानीपोटी एका घराला ५ हजार रुपये मिळतात; पण निसर्ग वादळातील निकष महाराष्ट्र शासनाने लावले, तर त्याच घराला १५ हजारांची नुकसानभरपाई मिळेल. नैसर्गिक आपत्तीमध्ये बैल, म्हैस दगावले, तर ३५ हजारांपर्यंत नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. कृषी विभागाने पंचनामे करताना वादळात पिळवटून गेलेल्या झाडांचाही विचार करावा. नुकसानभरपाईचे पंचनामे कसेही केले तरी जनतेला अधिक भरपाई मिळेल, हे आपण शोधून काढले पाहिजे. त्यानुसार पंचनामे करावेत. जेणेकरून बाधितांना योग्य मोबदला आपण देऊ शकू. महावितरणचे पुन्हा एकदा अतोनात नुकसान झाले आहे. ४५० विजेचे खांब उभे करण्यासाठी पुन्हा एकदा वेगवेगळ्या ठिकाणाहून कंत्राटदारांची पथके बोलवावी लागतील. यासंदर्भात आपण कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली आहे, असेही ते म्हणाले.

या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, नेत्रा ठाकूर, पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, पंचायत समिती सदस्य, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.