शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

नुकसानाचे पंचनामे सहानुभूतीने करा : जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:33 IST

असगोली : नुकसानभरपाई राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे मिळणार की ‘निसर्ग’ वादळाप्रमाणे महाराष्ट्र शासन निकष लावणार, हे अजूनही नक्की ...

असगोली : नुकसानभरपाई राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे मिळणार की ‘निसर्ग’ वादळाप्रमाणे महाराष्ट्र शासन निकष लावणार, हे अजूनही नक्की व्हायचे आहे. मात्र, बाधित जनतेचा सहानभूतीपूर्वक विचार करून आपण पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त त्यातून सुटता कामा नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.

ते गुहागर पंचायत समितीच्या ‘तौउते’ वादळ नुकसान आढावा बैठकीत बोलत होते.

गुहागर तालुक्यात १३४ घरे, ३ गोठे, जिल्हा परिषद शाळांचे ३ रंगमंच, २ ग्रामपंचायत इमारती, २ सार्वजनिक शौचालये, २ स्मशानभूमी यांचे अंशत: नुकसान झाले आहे. एक कृषी पंप वाहून गेला आहे. ४ गुरे दगावली आहेत. १४ फळझाडांचे नुकसान झाले आहे. १ मासेमारी बोट, १ गांडूळ खताचा प्रकल्प यांचेही नुकसान झाले आहे. सुमारे ८५ हेक्टरवरील फळबागा आणि शेतीचे नुकसान झाले आहे, असा प्राथमिक अहवाल या बैठकीत ठेवण्यात आला.

तौउते वादळात महावितरणचे १५० उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचे खांब आणि ३५० लघु दाबाच्या वीज वाहिन्यांचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे १७,४०० ग्राहकांचा वीजपुरवठा आजही खंडित आहे. पालशेत, आबलोली आणि गुहागर शाखा कार्यालय क्षेत्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे, अशी माहिती रानवीच्या शाखा अभियंत्यांनी दिली.

यावेळी आमदार जाधव म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती कायद्याप्रमाणे नुकसानभरपाई दिली गेली, तर अंशत: नुकसानीपोटी एका घराला ५ हजार रुपये मिळतात; पण निसर्ग वादळातील निकष महाराष्ट्र शासनाने लावले, तर त्याच घराला १५ हजारांची नुकसानभरपाई मिळेल. नैसर्गिक आपत्तीमध्ये बैल, म्हैस दगावले, तर ३५ हजारांपर्यंत नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. कृषी विभागाने पंचनामे करताना वादळात पिळवटून गेलेल्या झाडांचाही विचार करावा. नुकसानभरपाईचे पंचनामे कसेही केले तरी जनतेला अधिक भरपाई मिळेल, हे आपण शोधून काढले पाहिजे. त्यानुसार पंचनामे करावेत. जेणेकरून बाधितांना योग्य मोबदला आपण देऊ शकू. महावितरणचे पुन्हा एकदा अतोनात नुकसान झाले आहे. ४५० विजेचे खांब उभे करण्यासाठी पुन्हा एकदा वेगवेगळ्या ठिकाणाहून कंत्राटदारांची पथके बोलवावी लागतील. यासंदर्भात आपण कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली आहे, असेही ते म्हणाले.

या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, नेत्रा ठाकूर, पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, पंचायत समिती सदस्य, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.