शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

तर राजापुरातील दोन्ही नद्यांचा गाळ कंपनी उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापुरातच मार्गी लागल्यास शहराला त्रासदायक ठरणाऱ्या अर्जुना व कोदवली या दोन्ही नद्यांतील गाळाचा उपसा करण्याची ...

राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापुरातच मार्गी लागल्यास शहराला त्रासदायक ठरणाऱ्या अर्जुना व कोदवली या दोन्ही नद्यांतील गाळाचा उपसा करण्याची तयारी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प कंपनीने दर्शविली आहे. राजापूरचे नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी तसा प्रस्ताव कंपनीकडे सादर केला आहे. त्यासाठी कंपनीने तयारी दर्शविली आहे.

कोकणातील नद्या गाळाने भरल्याने अतिवृष्टी झाल्यानंतर महापुराने हाहाकार उडतो. चिपळूणमध्ये यंदा आलेल्या महापुराने होत्याचे नव्हते केल्याने असंख्य संसार उद्ध्वस्त झाले आहेत. राजापूरकरांनीही यंदा जुलैमध्येच सतत आठ दिवस महापुराचा सामना केला आहे. राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांबाबतही गाळाचीच समस्या मोठी आहे. त्यामुळे नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांनी राजापुरात जर रिफायनरी प्रकल्प झाला तर शहरालगतच्या नद्यांमधील गाळ उपसून देण्याचा प्रस्ताव आरआरपीसीएल कंपनीकडे सादर केला आहे. त्यानुसार तब्बल पाच किलोमीटर अंतरातील गाळ उपसण्याची तयारी आरआरपीसीएल कंपनीने दर्शविल्याचे अधिकृत वृत्त आहे.

राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांमध्ये पात्र सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने अरुंद झाले आहे. या दोन्ही नद्यांचा संगम ज्या बंदरधक्का भागात होतो, त्याठिकाणी खाडीचा आरंभ होत असल्याने पूर आणि भरती याचा सतत फटका बसून राजापूर शहरात पावसाळी हंगामात वारंवार पुराचे पाणी शिरते. गेली पाच ते सहा दशके राजापूर शहरात पूरस्थिती निर्माण होत आहे. सन २००८मध्ये कोदवली नदीतील गाळ काही प्रमाणात उपसून तो नदीपात्रातच बाजूला पिचिंग करून ठेवण्यात आला होता. यासाठी काही कोटी रूपये शासनाने खर्च केले होते. मात्र, शहराच्या लगत असलेला गाळ तेथेच पिचिंग केल्याने गेल्या बारा वर्षांत पुन्हा हा गाळ नदीपात्रात येऊन स्थिरावला आहे. जोडीलाच नव्या गाळाची भर पडली आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या दोन्ही नद्यांचा किमान पाच किलोमीटर अंतरातील गाळ उपसणे ही सध्याची मोठी गरज आहे. यासाठी सुमारे शंभर कोटी रूपये खर्च येण्याची शक्यता आहे.

राज्य शासन शहराच्या विकासासाठीच पुरेसा निधी देत नसल्याने गाळ उपशासाठी एवढी रक्कम प्राप्त होणे दुरापास्तच आहे. अशास्थितीत तालुक्यात येऊ शकणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून हा गाळ उपसण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. याबाबत अनौपचारिक बोलताना आरआरपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जर प्रकल्प झाला आणि शासनाने सूचना केल्या तर गाळ उपसण्यासाठी कंपनी पुढाकार घेऊ शकते, असे सांगितले. अर्थात प्रकल्प तालुक्यात होणार असेल तरच कंपनीला हा खर्च करता येईल, अशी स्थिती आहे.