शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

तर राजापुरातील दोन्ही नद्यांचा गाळ कंपनी उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापुरातच मार्गी लागल्यास शहराला त्रासदायक ठरणाऱ्या अर्जुना व कोदवली या दोन्ही नद्यांतील गाळाचा उपसा करण्याची ...

राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापुरातच मार्गी लागल्यास शहराला त्रासदायक ठरणाऱ्या अर्जुना व कोदवली या दोन्ही नद्यांतील गाळाचा उपसा करण्याची तयारी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प कंपनीने दर्शविली आहे. राजापूरचे नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी तसा प्रस्ताव कंपनीकडे सादर केला आहे. त्यासाठी कंपनीने तयारी दर्शविली आहे.

कोकणातील नद्या गाळाने भरल्याने अतिवृष्टी झाल्यानंतर महापुराने हाहाकार उडतो. चिपळूणमध्ये यंदा आलेल्या महापुराने होत्याचे नव्हते केल्याने असंख्य संसार उद्ध्वस्त झाले आहेत. राजापूरकरांनीही यंदा जुलैमध्येच सतत आठ दिवस महापुराचा सामना केला आहे. राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांबाबतही गाळाचीच समस्या मोठी आहे. त्यामुळे नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांनी राजापुरात जर रिफायनरी प्रकल्प झाला तर शहरालगतच्या नद्यांमधील गाळ उपसून देण्याचा प्रस्ताव आरआरपीसीएल कंपनीकडे सादर केला आहे. त्यानुसार तब्बल पाच किलोमीटर अंतरातील गाळ उपसण्याची तयारी आरआरपीसीएल कंपनीने दर्शविल्याचे अधिकृत वृत्त आहे.

राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांमध्ये पात्र सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने अरुंद झाले आहे. या दोन्ही नद्यांचा संगम ज्या बंदरधक्का भागात होतो, त्याठिकाणी खाडीचा आरंभ होत असल्याने पूर आणि भरती याचा सतत फटका बसून राजापूर शहरात पावसाळी हंगामात वारंवार पुराचे पाणी शिरते. गेली पाच ते सहा दशके राजापूर शहरात पूरस्थिती निर्माण होत आहे. सन २००८मध्ये कोदवली नदीतील गाळ काही प्रमाणात उपसून तो नदीपात्रातच बाजूला पिचिंग करून ठेवण्यात आला होता. यासाठी काही कोटी रूपये शासनाने खर्च केले होते. मात्र, शहराच्या लगत असलेला गाळ तेथेच पिचिंग केल्याने गेल्या बारा वर्षांत पुन्हा हा गाळ नदीपात्रात येऊन स्थिरावला आहे. जोडीलाच नव्या गाळाची भर पडली आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या दोन्ही नद्यांचा किमान पाच किलोमीटर अंतरातील गाळ उपसणे ही सध्याची मोठी गरज आहे. यासाठी सुमारे शंभर कोटी रूपये खर्च येण्याची शक्यता आहे.

राज्य शासन शहराच्या विकासासाठीच पुरेसा निधी देत नसल्याने गाळ उपशासाठी एवढी रक्कम प्राप्त होणे दुरापास्तच आहे. अशास्थितीत तालुक्यात येऊ शकणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून हा गाळ उपसण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. याबाबत अनौपचारिक बोलताना आरआरपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जर प्रकल्प झाला आणि शासनाने सूचना केल्या तर गाळ उपसण्यासाठी कंपनी पुढाकार घेऊ शकते, असे सांगितले. अर्थात प्रकल्प तालुक्यात होणार असेल तरच कंपनीला हा खर्च करता येईल, अशी स्थिती आहे.