शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

तर राजापुरातील दोन्ही नद्यांचा गाळ कंपनी उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापुरातच मार्गी लागल्यास शहराला त्रासदायक ठरणाऱ्या अर्जुना व कोदवली या दोन्ही नद्यांतील गाळाचा उपसा करण्याची ...

राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापुरातच मार्गी लागल्यास शहराला त्रासदायक ठरणाऱ्या अर्जुना व कोदवली या दोन्ही नद्यांतील गाळाचा उपसा करण्याची तयारी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प कंपनीने दर्शविली आहे. राजापूरचे नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी तसा प्रस्ताव कंपनीकडे सादर केला आहे. त्यासाठी कंपनीने तयारी दर्शविली आहे.

कोकणातील नद्या गाळाने भरल्याने अतिवृष्टी झाल्यानंतर महापुराने हाहाकार उडतो. चिपळूणमध्ये यंदा आलेल्या महापुराने होत्याचे नव्हते केल्याने असंख्य संसार उद्ध्वस्त झाले आहेत. राजापूरकरांनीही यंदा जुलैमध्येच सतत आठ दिवस महापुराचा सामना केला आहे. राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांबाबतही गाळाचीच समस्या मोठी आहे. त्यामुळे नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांनी राजापुरात जर रिफायनरी प्रकल्प झाला तर शहरालगतच्या नद्यांमधील गाळ उपसून देण्याचा प्रस्ताव आरआरपीसीएल कंपनीकडे सादर केला आहे. त्यानुसार तब्बल पाच किलोमीटर अंतरातील गाळ उपसण्याची तयारी आरआरपीसीएल कंपनीने दर्शविल्याचे अधिकृत वृत्त आहे.

राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांमध्ये पात्र सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने अरुंद झाले आहे. या दोन्ही नद्यांचा संगम ज्या बंदरधक्का भागात होतो, त्याठिकाणी खाडीचा आरंभ होत असल्याने पूर आणि भरती याचा सतत फटका बसून राजापूर शहरात पावसाळी हंगामात वारंवार पुराचे पाणी शिरते. गेली पाच ते सहा दशके राजापूर शहरात पूरस्थिती निर्माण होत आहे. सन २००८मध्ये कोदवली नदीतील गाळ काही प्रमाणात उपसून तो नदीपात्रातच बाजूला पिचिंग करून ठेवण्यात आला होता. यासाठी काही कोटी रूपये शासनाने खर्च केले होते. मात्र, शहराच्या लगत असलेला गाळ तेथेच पिचिंग केल्याने गेल्या बारा वर्षांत पुन्हा हा गाळ नदीपात्रात येऊन स्थिरावला आहे. जोडीलाच नव्या गाळाची भर पडली आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या दोन्ही नद्यांचा किमान पाच किलोमीटर अंतरातील गाळ उपसणे ही सध्याची मोठी गरज आहे. यासाठी सुमारे शंभर कोटी रूपये खर्च येण्याची शक्यता आहे.

राज्य शासन शहराच्या विकासासाठीच पुरेसा निधी देत नसल्याने गाळ उपशासाठी एवढी रक्कम प्राप्त होणे दुरापास्तच आहे. अशास्थितीत तालुक्यात येऊ शकणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून हा गाळ उपसण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. याबाबत अनौपचारिक बोलताना आरआरपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जर प्रकल्प झाला आणि शासनाने सूचना केल्या तर गाळ उपसण्यासाठी कंपनी पुढाकार घेऊ शकते, असे सांगितले. अर्थात प्रकल्प तालुक्यात होणार असेल तरच कंपनीला हा खर्च करता येईल, अशी स्थिती आहे.