शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांवर कंपनीचा ताबा अपघातास कारणीभूत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

आवाशी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महार्गावर जणू काही ताबाच मिळविला असल्यासारखी वाहने उभी केली जात आहेत. याकडे महामार्ग ...

आवाशी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महार्गावर जणू काही ताबाच मिळविला असल्यासारखी वाहने उभी केली जात आहेत. याकडे महामार्ग पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने ही कंपनी अपघातास कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रिया पंचक्रोशीतून व्यक्त केली जात आहे.

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणचे अर्धवट स्थितीतील काम वाहन चालकांस त्रासदायक ठरत आहे. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका येथील लोटे परशुराम वसाहतीमधून जाणाऱ्या मार्गांवर लगतच असणाऱ्या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीसमोर कंपनीत येणारी व जाणारी मालवाहू अवजड वाहने बिनधास्तपणे महामार्गावरच उभी केली जात आहेत. त्याचा वाहतुकीस अडथळा हाेत आहे. येथे अपघातास निमंत्रण देण्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र, या नेहमीच्या समस्येकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

कंपनीत २ जून २०२१ राेजी येणारा टँकर मागे घेण्याच्या प्रयत्नात असताना व टँकर चालकासोबत वाहक नसल्याच्या कारणाने याच महामार्गावर व कंपनीसमोरच रस्त्याने चालत असणारा चिंचवली, खेड येथील अभिजित अ. पवार या तरुण कामगाराचा टँकरखाली चिरडून मृत्यू झाला हाेता. त्यावेळी तो आवाशी येथे राहात होता. मात्र, यातूनही संबंधित कंपनीने बोध घेतलेला नाही. जणू काही महामार्गही आपल्याच मालकीचा असल्यासारखे दररोज येथे येणारी वाहने उभे करून दाखविले जात आहे. याचा बंदोबस्त करावा, अन्यथा आणखीही कुणाचा बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.