शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

महामार्गांवर कंपनीचा ताबा अपघातास कारणीभूत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

आवाशी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महार्गावर जणू काही ताबाच मिळविला असल्यासारखी वाहने उभी केली जात आहेत. याकडे महामार्ग ...

आवाशी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महार्गावर जणू काही ताबाच मिळविला असल्यासारखी वाहने उभी केली जात आहेत. याकडे महामार्ग पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने ही कंपनी अपघातास कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रिया पंचक्रोशीतून व्यक्त केली जात आहे.

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणचे अर्धवट स्थितीतील काम वाहन चालकांस त्रासदायक ठरत आहे. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका येथील लोटे परशुराम वसाहतीमधून जाणाऱ्या मार्गांवर लगतच असणाऱ्या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीसमोर कंपनीत येणारी व जाणारी मालवाहू अवजड वाहने बिनधास्तपणे महामार्गावरच उभी केली जात आहेत. त्याचा वाहतुकीस अडथळा हाेत आहे. येथे अपघातास निमंत्रण देण्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र, या नेहमीच्या समस्येकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

कंपनीत २ जून २०२१ राेजी येणारा टँकर मागे घेण्याच्या प्रयत्नात असताना व टँकर चालकासोबत वाहक नसल्याच्या कारणाने याच महामार्गावर व कंपनीसमोरच रस्त्याने चालत असणारा चिंचवली, खेड येथील अभिजित अ. पवार या तरुण कामगाराचा टँकरखाली चिरडून मृत्यू झाला हाेता. त्यावेळी तो आवाशी येथे राहात होता. मात्र, यातूनही संबंधित कंपनीने बोध घेतलेला नाही. जणू काही महामार्गही आपल्याच मालकीचा असल्यासारखे दररोज येथे येणारी वाहने उभे करून दाखविले जात आहे. याचा बंदोबस्त करावा, अन्यथा आणखीही कुणाचा बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.