शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

संवादाची दरी बिघडवू शकते व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे ताणतणाव वाढताहेत. त्यातून विविध प्रकारचे कलही निर्माण हाेत असल्याने व्यक्तींमध्ये वादाची दरी वाढत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे ताणतणाव वाढताहेत. त्यातून विविध प्रकारचे कलही निर्माण हाेत असल्याने व्यक्तींमध्ये वादाची दरी वाढत जात आहे. त्याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्य बिघडण्यावर होत आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य सांभाळायचे असेल तर मनातील विचार व्यक्त करणे, हाच त्यावर उत्तम उपाय असल्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

कोरोनाकाळात सर्वच पातळींवर ताण-तणाव निर्माण झालेत. अनेक व्यक्तींच्या नोकऱ्या गेल्या. काहींच्या वेतनात कपात झाली. व्यवसाय ठप्प झाले. गेल्या दोन वर्षांत कोरोनाने निर्माण झालेली परिस्थिती याआधीही कधीही निर्माण झालेली नव्हती. जागतिक स्तरावर याचे पडसाद उमटले असून आर्थिकचक्र थांबले आहे. सध्या काहीअंशी हे चक्र सुरू झाले असले तरीही अजूनही ते गतिमान होण्यास किती कालावधी लागेल, हे अनिश्चित आहे. सध्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. गेल्या दीड वर्षांपासून ही मुले घरात आहेत. त्यामुळे मुले आणि पालक यांच्यात चिडचिड वाढली आहे. काहींच्या नोकऱ्या सुटल्याने त्यांच्यात वैफल्य, नैराश्य मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. मात्र, घरातून मानसिक आधार मिळत नसल्याने त्यातून अशा व्यक्तींची घुसमट होऊ लागली आहे. ज्येष्ठ नागरिक यांचीही दिनचर्या घरातच राहिल्याने थांबली आहे. त्यांना कोरोनामुळे बाहेर पडण्याची भीती वाटत आहे. एकंदरीत एकमेकांकडे जाणे, व्यक्त होणे थांबल्याने विसंवादाची दरी वाढतेय. त्यामुळे त्याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर विपरित होत आहे.

मन हलके करणे हाच उत्तम उपाय

n कोरोनामुळे एकमेकांकडे जाणे थांबले आहे. त्यामुळे पूर्वीसारख्या गप्पा आता होत नाहीत. पण त्यातूनही फोनवरून का होईना शक्य होईल तेवढा संवाद ठेवणे गरजेचे आहे.

n मुले सध्या घरात असली तरी आई-वडील नोकरी किंवा व्यवसायानिमित्त दिवसभर बाहेर असतात. त्यामुळे मुले आणि पालक यांच्यातील संवादही कमी झाला आहे.

n मनस्वास्थ्य राखण्यासाठी संवाद प्रभावी माध्यम असून मन हलके होणे गरजेचे आहे.

विसंवादाची दरी

कोरोना काळात प्रत्यक्ष संवाद थांबल्याने व्यक्तीची अधिक घुसमट होवू लागली आहे. ही सर्व वयोगटांतील व्यक्तीमध्ये दिसून येत आहे. नातेवाइक, मित्र-मंडळी यांचे एकमेकांकडे येणे जाणे कमी झाले आहे. त्यामुळे अनेकांची घुसमट होत आहे. विविध प्रकारच्या कलहातून विसंवाद होत आहेत. यातून मानसिक स्वास्थ्य बिघडू लागले असल्याने अनेकांना मानसिक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

व्यक्त व्हायला शिका

मानसिक स्वास्थ्य बिघडण्यासाठी तणाव हे मुख्य कारण आहे. हे ताण दूर करण्यासाठी कुणाकडे तरी मन मोकळं करायला हवं. भावना व्यक्त करायला हव्यात. काही व्यक्तींना मन मोकळं करणे कमीपणाचे वाटते. तणावाशी सामना करण्यासाठी संवाद गरजेचा असतो. प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घेतल्यास तणावमुक्त होण्यासाठी मदत होते.

मानसाेपचार तज्ज्ञ म्हणतात.

कोरोनामुळे व्यक्तींमधील संवाद तुटला आहे. मात्र, मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी व्यक्तींमध्ये सुसंवाद होणे गरजेचे आहे. त्यासाठी मनातील विचारांचा निचरा व्हायला हवा. सध्या बाहेर जाणे होत नसले तरी मनातील विचार डायरीत नोंदवायला हवेत. आत्मकेंद्री न रहाता, व्यक्त होणे, हाच उत्तम उपाय आहे.

- डाॅ. अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी.

सध्या मुलं-पालक, ज्येष्ठ नागरिक, पती-पत्नी, नवविवाहित आदी सगळ्यांमध्येच ताणतणाव आणि त्यातून कलह वाढल्याचे दिसून येते. व्यक्तीची होणारी घुसमट बाहेर पडायला हवी. त्यासाठी अशांनी आपल्या भावना मोकळ्या करण्याचा प्रयत्न करायला हवा.

- डाॅ. श्रुतिका कोतकुंडे, मानसोपचार तज्ज्ञ, चिपळूण