शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पथदीप, पाणीपुरवठा थकीत देयकांबाबत समिती देणार अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ग्रामपंचायतींच्या पथदीपांची थकीत देयके व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांचा योग्य मेळ घालण्यासाठी संबंधित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ग्रामपंचायतींच्या पथदीपांची थकीत देयके व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांचा योग्य मेळ घालण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दि. १५ ऑगस्टपर्यंत अहवाल देणार आहे. महावितरण कंपनीने याबाबत निर्णय होईपर्यंत वीजजोडण्या खंडित करू नयेत, तसेच खंडित केलेल्या जोडण्या पूर्ववत कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या असल्याने जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना दिलासा प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यातील १५४३ स्थानिक पथदीपाचे ८ कोटी ९७ लाख ९० हजार रुपये, तर पाणीपुरवठा विभागाकडील १६१९ ग्राहकांकडे २ कोटी ९९ लाख ४९ हजार रुपये थकबाकी शिल्लक आहे. ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची थकीत वीज देयके व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांसंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व पथदीपांची थकबाकी असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तक्रारी वाढल्याने सरकारने पंधराव्या वित्त आयोगातून वीज देयके देण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. मात्र, सरपंचांनी या निर्णयाला विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास, ऊर्जा, पाणीपुरवठा या विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या समितीचा अहवाल येईपर्यंत ग्रामीण तथा स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांचे पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या वीज देयकांची वसुली व वीजतोडणी तोपर्यंत थांबवावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांची तपासणी करावी. त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने दि. १५ ऑगस्टपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती मिळाली असल्याने ८४६ ग्रामपंचायतींना दिलासा प्राप्त झाला आहे.