शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पथदीप, पाणीपुरवठा थकीत देयकांबाबत समिती देणार अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ग्रामपंचायतींच्या पथदीपांची थकीत देयके व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांचा योग्य मेळ घालण्यासाठी संबंधित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ग्रामपंचायतींच्या पथदीपांची थकीत देयके व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांचा योग्य मेळ घालण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दि. १५ ऑगस्टपर्यंत अहवाल देणार आहे. महावितरण कंपनीने याबाबत निर्णय होईपर्यंत वीजजोडण्या खंडित करू नयेत, तसेच खंडित केलेल्या जोडण्या पूर्ववत कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या असल्याने जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना दिलासा प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यातील १५४३ स्थानिक पथदीपाचे ८ कोटी ९७ लाख ९० हजार रुपये, तर पाणीपुरवठा विभागाकडील १६१९ ग्राहकांकडे २ कोटी ९९ लाख ४९ हजार रुपये थकबाकी शिल्लक आहे. ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची थकीत वीज देयके व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांसंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व पथदीपांची थकबाकी असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तक्रारी वाढल्याने सरकारने पंधराव्या वित्त आयोगातून वीज देयके देण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. मात्र, सरपंचांनी या निर्णयाला विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास, ऊर्जा, पाणीपुरवठा या विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या समितीचा अहवाल येईपर्यंत ग्रामीण तथा स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांचे पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या वीज देयकांची वसुली व वीजतोडणी तोपर्यंत थांबवावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांची तपासणी करावी. त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने दि. १५ ऑगस्टपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती मिळाली असल्याने ८४६ ग्रामपंचायतींना दिलासा प्राप्त झाला आहे.