शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

पथदीप, पाणीपुरवठा थकीत देयकांबाबत समिती देणार अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ग्रामपंचायतींच्या पथदीपांची थकीत देयके व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांचा योग्य मेळ घालण्यासाठी संबंधित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ग्रामपंचायतींच्या पथदीपांची थकीत देयके व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांचा योग्य मेळ घालण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दि. १५ ऑगस्टपर्यंत अहवाल देणार आहे. महावितरण कंपनीने याबाबत निर्णय होईपर्यंत वीजजोडण्या खंडित करू नयेत, तसेच खंडित केलेल्या जोडण्या पूर्ववत कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या असल्याने जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना दिलासा प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यातील १५४३ स्थानिक पथदीपाचे ८ कोटी ९७ लाख ९० हजार रुपये, तर पाणीपुरवठा विभागाकडील १६१९ ग्राहकांकडे २ कोटी ९९ लाख ४९ हजार रुपये थकबाकी शिल्लक आहे. ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची थकीत वीज देयके व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांसंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व पथदीपांची थकबाकी असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तक्रारी वाढल्याने सरकारने पंधराव्या वित्त आयोगातून वीज देयके देण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. मात्र, सरपंचांनी या निर्णयाला विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास, ऊर्जा, पाणीपुरवठा या विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या समितीचा अहवाल येईपर्यंत ग्रामीण तथा स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांचे पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या वीज देयकांची वसुली व वीजतोडणी तोपर्यंत थांबवावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांची तपासणी करावी. त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने दि. १५ ऑगस्टपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला स्थगिती मिळाली असल्याने ८४६ ग्रामपंचायतींना दिलासा प्राप्त झाला आहे.