शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसाठी निवडणूक रंगीत तालीम

By admin | Updated: November 15, 2016 00:20 IST

पालिका निवडणूक : स्वबळ आजमावण्यासाठी ताकदीने रिंगणात

विहार तेंडुलकर -- रत्नागिरी --जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणाऱ्या भाजपसाठी ही निवडणूक अगदीच वर्चस्वाची लढाई नसली तरी भविष्यात ताकद वाढवण्यासाठी ही निवडणूक म्हणजे रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळे भाजपने या निवडणुकीत जास्तीत जास्त ताकद वाढवण्याकडेच भर दिल्याचे दिसून येते.मागील निवडणुकीपर्यंत शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला आपले स्वबळ वाढल्याची जाणीव झाली आणि त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत झाला. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर अनेक ठिकाणी युतीतील या दोन घटक पक्षांची मने दुभंगली.नगर परिषद निवडणुकीत राज्यस्तरावर युती झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी अचानक जाहीर केले. मात्र, रत्नागिरी जिल्ह््यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड नगर परिषद आणि दापोली नगरपंचायत याठिकाणी भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भाजप पदाधिकाऱ्यांनी युतीबाबत स्वारस्यच न दाखवल्याने राज्यस्तरावर निर्णय होऊनही रत्नागिरी जिल्ह््यात युती होऊ शकली नाही.मागील अनेक वर्षांचा इतिहास पाहता युतीचा फायदा भाजपला मिळाला. मात्र, भाजप पदाधिकाऱ्यांनी केवळ फायदा करुन घेण्याकडेच लक्ष दिले. पक्षवाढीसाठी म्हणावे तसे प्रयत्न त्यांच्याकडून झाले नाहीत. भाजपचे लोकप्रतिनिधी जिल्ह््यातून निवडून गेले, मात्र ते युतीपेक्षाही शिवसेनेच्या बळावर. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला स्वत:कडे असलेल्या स्वबळाची जाणीव झाली आणि ज्याठिकाणी बळ कमी आहे, तेथे भविष्यात वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरले.रत्नागिरी जिल्ह््यातही हाच प्रयोग सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेच्या तुलनेत छोटा पक्ष असूनही भाजप युती करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून येते. नुकसान सोसावे लागले तरी चालेल; परंतु स्वबळावर लढायचे, या मन:स्थितीत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आहेत. आज ना उद्या आपले बळ नक्कीच वाढेल; त्यावेळी आपण नक्की निवडून येऊ, अशी मानसिकता भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपने ताकदीने प्रचार करून स्वबळ वाढविण्याच्या दृष्टीने पाऊल टाकल्याचे दिसून येते. येत्या निवडणुकीत भाजपला कितपत यश मिळते, हे येत्या २८ तारखेलाच समजून येणार आहे.स्वबळाची मानसिकताचिपळूण येथे बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी भाजपचा आजपर्यंत शिवसेनेने केवळ वापर करून घेतला. त्यातून भाजपच्या हाती काहीच गवसले नाही, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे यापुढे युती नाहीच, असे आग्रही प्रतिपादन केले होते. त्यामुळे युतीमध्ये राहिल्याने आपला कधीच फायदा होऊ शकणार नाही, ही आता जिल्ह्यातील सर्वच भाजप पदाधिकाऱ्यांची मानसिकता झाली असल्याचे दिसून येते.स्वबळावर लढण्याचे भविष्यात फायदेनगर परिषद निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य भाजपने बाळगले आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते भविष्यातील निवडणुकीची तयारी करत आहेत. या निवडणुकीत भाजपला जास्त फायदा झाला नाही तरी भविष्यात त्याचे परिणाम दिसून येतील, या मानसिकतेपर्यंत भाजपचे जिल्हास्तरीय पदाधिकारी आल्याचे दिसून येते.