शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसाठी निवडणूक रंगीत तालीम

By admin | Updated: November 15, 2016 00:20 IST

पालिका निवडणूक : स्वबळ आजमावण्यासाठी ताकदीने रिंगणात

विहार तेंडुलकर -- रत्नागिरी --जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणाऱ्या भाजपसाठी ही निवडणूक अगदीच वर्चस्वाची लढाई नसली तरी भविष्यात ताकद वाढवण्यासाठी ही निवडणूक म्हणजे रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळे भाजपने या निवडणुकीत जास्तीत जास्त ताकद वाढवण्याकडेच भर दिल्याचे दिसून येते.मागील निवडणुकीपर्यंत शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला आपले स्वबळ वाढल्याची जाणीव झाली आणि त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत झाला. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर अनेक ठिकाणी युतीतील या दोन घटक पक्षांची मने दुभंगली.नगर परिषद निवडणुकीत राज्यस्तरावर युती झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी अचानक जाहीर केले. मात्र, रत्नागिरी जिल्ह््यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड नगर परिषद आणि दापोली नगरपंचायत याठिकाणी भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भाजप पदाधिकाऱ्यांनी युतीबाबत स्वारस्यच न दाखवल्याने राज्यस्तरावर निर्णय होऊनही रत्नागिरी जिल्ह््यात युती होऊ शकली नाही.मागील अनेक वर्षांचा इतिहास पाहता युतीचा फायदा भाजपला मिळाला. मात्र, भाजप पदाधिकाऱ्यांनी केवळ फायदा करुन घेण्याकडेच लक्ष दिले. पक्षवाढीसाठी म्हणावे तसे प्रयत्न त्यांच्याकडून झाले नाहीत. भाजपचे लोकप्रतिनिधी जिल्ह््यातून निवडून गेले, मात्र ते युतीपेक्षाही शिवसेनेच्या बळावर. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला स्वत:कडे असलेल्या स्वबळाची जाणीव झाली आणि ज्याठिकाणी बळ कमी आहे, तेथे भविष्यात वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरले.रत्नागिरी जिल्ह््यातही हाच प्रयोग सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेच्या तुलनेत छोटा पक्ष असूनही भाजप युती करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून येते. नुकसान सोसावे लागले तरी चालेल; परंतु स्वबळावर लढायचे, या मन:स्थितीत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आहेत. आज ना उद्या आपले बळ नक्कीच वाढेल; त्यावेळी आपण नक्की निवडून येऊ, अशी मानसिकता भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपने ताकदीने प्रचार करून स्वबळ वाढविण्याच्या दृष्टीने पाऊल टाकल्याचे दिसून येते. येत्या निवडणुकीत भाजपला कितपत यश मिळते, हे येत्या २८ तारखेलाच समजून येणार आहे.स्वबळाची मानसिकताचिपळूण येथे बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी भाजपचा आजपर्यंत शिवसेनेने केवळ वापर करून घेतला. त्यातून भाजपच्या हाती काहीच गवसले नाही, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे यापुढे युती नाहीच, असे आग्रही प्रतिपादन केले होते. त्यामुळे युतीमध्ये राहिल्याने आपला कधीच फायदा होऊ शकणार नाही, ही आता जिल्ह्यातील सर्वच भाजप पदाधिकाऱ्यांची मानसिकता झाली असल्याचे दिसून येते.स्वबळावर लढण्याचे भविष्यात फायदेनगर परिषद निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य भाजपने बाळगले आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते भविष्यातील निवडणुकीची तयारी करत आहेत. या निवडणुकीत भाजपला जास्त फायदा झाला नाही तरी भविष्यात त्याचे परिणाम दिसून येतील, या मानसिकतेपर्यंत भाजपचे जिल्हास्तरीय पदाधिकारी आल्याचे दिसून येते.