शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोसळलेल्या दरडीची तब्बल पंधरा दिवसांनी दखल

By admin | Updated: August 5, 2014 00:11 IST

घटनेची माहिती तहसीलदार कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षात नसल्याने अनेकांनी आश्चर्य

खेड : तालुक्यातील अठरागाव धवडे बांदरी विभागातील कांदोशी सुतारवाडी येथील दरड कोसळल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी तेथील धोकादायक परिस्थितीची तहसीलदार प्रकाश संकपाळ आणि प्रांताधिकारी यांनी संयुक्तरित्या पाहणी केली. दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत येथील नायब तहसीलदारांची सोमवारी सायंकाळी भेट घेऊन कांदोशी प्रकरणाबाबत जाब विचारला. तब्बल पंधरा दिवसांनंतर हा प्रकार उघड झाला आहे.दि. १५ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या कांदोशी सुतारवाडी येथील ५०० मीटर उंचीवर असलेली दरड कोसळली होती. मातीमिश्रित असलेली ही दरड तेथील काही ग्रामस्थांच्या घरात घुसली होती़ मात्र, या घटनेची माहिती तहसीलदार कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षात नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. ही दरड कोसळल्याने तेथील ८ घरांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.प्रशासनाने याकामी उपाययोजना करावी, अशी मागणीही या ग्रामस्थांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर तहसीलदार प्रकाश संकपाळ आणि प्रांताधिकारी जयकृष्ण फड यांनी संयुक्तरित्या तेथील दरडीची आणि धोकादायक स्थितीची पाहणी केली आहे़ याबाबत संकपाळ यांनी येथील धोकादायक असलेल्या ३ घरांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ‘मनसे’चे विभागीय संघटक वैभव खेडेकर यांच्यासह मनसेचे उपजिल्हाप्रमुख विश्वास मुधोळे, वैजश सागवेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर चिखले, तालुकाप्रमुख शरद शिर्के तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार रवींद्र वाळके यांची भेट घेऊन प्रशासनाच्या तयारीबाबत माहिती घेतली़ शिवाय पुणे जिल्ह्यातील ‘माळीण’सारखे प्रकरण उद्भवू नये, याकरिता प्रशासनाने उपाययोजना करावी, असे वैभव खेडेकर यांनी सुचवले. यावेळी वाळके यांनी परिस्थितीकडे प्रशासन गंभीरतेने पाहत असून, गावातील सरपंच, पोलीसपाटील आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून तातडीने निर्णय घेणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)