शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

आचारसंहिता लागू; वाहने काढून घेतली

By admin | Updated: September 12, 2014 23:30 IST

प्रशासनाकडून आदेश जारी : उद्घाटने, भूमिपूजन कार्यक्रम थांबणार

रत्नागिरी : निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधी लागणार, याची उत्कंठा गणेशोत्सवाच्या आधीपासूनच शिगेला पोहोचली असतानाच आज, शुक्रवारी निवडणूक आयोगाने १५ आॅक्टोबरचा मुहूर्त जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यातही आचारसंहिता लागू झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नंदकुमार जाधव यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहने ताब्यात घेण्याचे आदेशही तत्काळ देण्यात आले आहेत.जिल्ह्यात दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर हे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे १५ आॅक्टोबरला मतदान होईल. लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात मतदारांची संख्या १२,१०,०३३ इतकी होती. लोकसभा २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. यावेळी नवीन मतदारांची नोंदणी केली होती. त्यात जिल्ह्यात महिला आणि पुरुष मिळून एकूण १९ हजार २८६ मतदारांची नव्याने नोंदणी करण्यात आली. सर्व मतदारसंघांत मिळून ८ हजार ९२५ पुरुष आणि ८ हजार ९४९ महिलांची अशी एकूण १७ हजार ८७४ मतदारांची वाढ झालेली आहे.पदाधिकाऱ्यच्या गाड्या जमाजिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद पदाधिकारी आणि पंचायत समितीच्या सभापतींच्या गाड्या जमा करून घेण्यात आल्या आहेत. आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा जाधव, उपाध्यक्ष राजेश मुकादम, समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, शिक्षण व अर्थ सभापती सतीश शेवडे, बांधकाम व आरोग्य सभापती अजित नारकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता धामणस्कर, रत्नागिरी पंचायत समिती सभापती अनुष्का खेडेकर आणि नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांची शासकीय वाहने प्रशासनाने ताब्यात घेतली. (प्रतिनिधी)