शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

तटरक्षक दलातर्फे ‘आझादी का अमृतमहोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दल देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा ...

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दल देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा करीत आहे. उत्सवांची मालिका सुरू ठेवत येथील तटरक्षक अवस्थानतर्फे शनिवारी सकाळी परिसरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

यावेळी तटरक्षक अवस्थानचे सर्व अधिकारी, सैनिक, असैनिक कर्मचारी आणि स्थानिक लोक हे वृक्षरोपण कार्यक्रमात सहभागी झाले. गुलमोहोर, सोनचाफा, पेरू, बांबू, सागवान, बेल, बदाम, स्पॅथोडिया आणि कडुनिंब अशी एकूण ७५ रोपे भारतीय तटरक्षक अवस्थानच्या रत्नागिरी कार्यालयाच्या परिसरात आणि भोवताली लावण्यात आली.

तटरक्षक स्टेशन कमांडर, उपमहानिरीक्षक दुष्यंत कुमार यांनी उपस्थितांना निसर्गाचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि वनीकरणाचे महत्त्व सांगितले. झाडे वादळाच्या पाण्याच्या प्रवाहाचे प्रमाणदेखील कमी करतात, ज्यामुळे आपल्या जलमार्गांमधील धूप आणि प्रदूषण कमी होते आणि पुराचे परिणाम कमी होतात आणि भूस्खलन टाळता येते, अशी माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी झाडे आणि खत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाचे जिल्हा वन अधिकारी स्नेहलता पाटील आणि वनरक्षक नीलेश कुंभार यांनी उपलब्ध करून दिले होते. कोरोना संसर्गाच्या खबरदारीचे सर्व उपाय कार्यक्रमादरम्यान घेण्यात आले.

भारतीय तटरक्षक अवस्थानने याआधी आझादी का अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा आणि समुदाय संवाद कार्यक्रम आयोजित केला होता.