शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

तटरक्षक दलातर्फे ‘आझादी का अमृतमहोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दल देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा ...

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दल देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा करीत आहे. उत्सवांची मालिका सुरू ठेवत येथील तटरक्षक अवस्थानतर्फे शनिवारी सकाळी परिसरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

यावेळी तटरक्षक अवस्थानचे सर्व अधिकारी, सैनिक, असैनिक कर्मचारी आणि स्थानिक लोक हे वृक्षरोपण कार्यक्रमात सहभागी झाले. गुलमोहोर, सोनचाफा, पेरू, बांबू, सागवान, बेल, बदाम, स्पॅथोडिया आणि कडुनिंब अशी एकूण ७५ रोपे भारतीय तटरक्षक अवस्थानच्या रत्नागिरी कार्यालयाच्या परिसरात आणि भोवताली लावण्यात आली.

तटरक्षक स्टेशन कमांडर, उपमहानिरीक्षक दुष्यंत कुमार यांनी उपस्थितांना निसर्गाचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि वनीकरणाचे महत्त्व सांगितले. झाडे वादळाच्या पाण्याच्या प्रवाहाचे प्रमाणदेखील कमी करतात, ज्यामुळे आपल्या जलमार्गांमधील धूप आणि प्रदूषण कमी होते आणि पुराचे परिणाम कमी होतात आणि भूस्खलन टाळता येते, अशी माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी झाडे आणि खत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाचे जिल्हा वन अधिकारी स्नेहलता पाटील आणि वनरक्षक नीलेश कुंभार यांनी उपलब्ध करून दिले होते. कोरोना संसर्गाच्या खबरदारीचे सर्व उपाय कार्यक्रमादरम्यान घेण्यात आले.

भारतीय तटरक्षक अवस्थानने याआधी आझादी का अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा आणि समुदाय संवाद कार्यक्रम आयोजित केला होता.