शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे वचन पूर्ण करावे : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

खेड : कोकणात निसर्ग व तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांचा सात-बारा ...

खेड : कोकणात निसर्ग व तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे दिलेले वचन त्यांनी पूर्ण करावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

खेड तालुक्यातील बोरज घोसाळकरवाडी येथील प्रकाश व वंदना घोसाळकर या दाम्पत्याचा तौक्ते चक्रीवादळदरम्यान ३३ हजार व्होल्टेजची विजेची तार अंगावर पडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर कोकण दौऱ्यावर असलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि २० रोजी) प्रकाश व वंदना घोसाळकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, सरकारने घोसाळकर कुटुंबाला चार लाख मदत देऊ केली आहे. ही मदत कमी असून, किमान दहा लाख रुपयांची मदत देण्याची मागणी मी राज्य सरकारकडे करतो. कोकणात मोठ्या प्रमाणात निसर्ग व तौक्ते या दोन वादळात शेती, आंबा व नारळ बागायती यांचे नुकसान झाले आहे. कोकणी माणसाचे झालेलं हे नुकसान भरून निघणे कठीण आहे़. राज्य सरकारने येथील जनतेला साथ देणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू असून, या वादळात नुकसानीचा आढावा घेऊन मी स्वतः केंद्र सरकारकडूनही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले़.

कोकणात निसर्ग वादळात ज्यांचे नुकसान झाले, त्यांच्यापैकी काहींना अद्याप मदत मिळालेली नाही, असे समजत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे वचन दिले आहे. या परिस्थितीत त्यांनी ते पूर्ण करावे, असे आठवले म्हणाले.

यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद, निरीक्षक नीशा जाधव, आरपीआयचे कोकण प्रभारी सुशांत सकपाळ, आदेश मर्चंडे, सुरेंद्र तांबे, बोरज प्रभारी सरपंच विशाल घोसाळकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.