शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे वचन पूर्ण करावे : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

खेड : कोकणात निसर्ग व तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांचा सात-बारा ...

खेड : कोकणात निसर्ग व तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे दिलेले वचन त्यांनी पूर्ण करावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

खेड तालुक्यातील बोरज घोसाळकरवाडी येथील प्रकाश व वंदना घोसाळकर या दाम्पत्याचा तौक्ते चक्रीवादळदरम्यान ३३ हजार व्होल्टेजची विजेची तार अंगावर पडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर कोकण दौऱ्यावर असलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि २० रोजी) प्रकाश व वंदना घोसाळकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, सरकारने घोसाळकर कुटुंबाला चार लाख मदत देऊ केली आहे. ही मदत कमी असून, किमान दहा लाख रुपयांची मदत देण्याची मागणी मी राज्य सरकारकडे करतो. कोकणात मोठ्या प्रमाणात निसर्ग व तौक्ते या दोन वादळात शेती, आंबा व नारळ बागायती यांचे नुकसान झाले आहे. कोकणी माणसाचे झालेलं हे नुकसान भरून निघणे कठीण आहे़. राज्य सरकारने येथील जनतेला साथ देणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू असून, या वादळात नुकसानीचा आढावा घेऊन मी स्वतः केंद्र सरकारकडूनही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले़.

कोकणात निसर्ग वादळात ज्यांचे नुकसान झाले, त्यांच्यापैकी काहींना अद्याप मदत मिळालेली नाही, असे समजत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे वचन दिले आहे. या परिस्थितीत त्यांनी ते पूर्ण करावे, असे आठवले म्हणाले.

यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद, निरीक्षक नीशा जाधव, आरपीआयचे कोकण प्रभारी सुशांत सकपाळ, आदेश मर्चंडे, सुरेंद्र तांबे, बोरज प्रभारी सरपंच विशाल घोसाळकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.