शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे वचन पूर्ण करावे : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST

खेड : कोकणात निसर्ग व तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांचा सात-बारा ...

खेड : कोकणात निसर्ग व तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे दिलेले वचन त्यांनी पूर्ण करावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

खेड तालुक्यातील बोरज घोसाळकरवाडी येथील प्रकाश व वंदना घोसाळकर या दाम्पत्याचा तौक्ते चक्रीवादळदरम्यान ३३ हजार व्होल्टेजची विजेची तार अंगावर पडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर कोकण दौऱ्यावर असलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि २० रोजी) प्रकाश व वंदना घोसाळकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, सरकारने घोसाळकर कुटुंबाला चार लाख मदत देऊ केली आहे. ही मदत कमी असून, किमान दहा लाख रुपयांची मदत देण्याची मागणी मी राज्य सरकारकडे करतो. कोकणात मोठ्या प्रमाणात निसर्ग व तौक्ते या दोन वादळात शेती, आंबा व नारळ बागायती यांचे नुकसान झाले आहे. कोकणी माणसाचे झालेलं हे नुकसान भरून निघणे कठीण आहे़. राज्य सरकारने येथील जनतेला साथ देणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू असून, या वादळात नुकसानीचा आढावा घेऊन मी स्वतः केंद्र सरकारकडूनही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले़.

कोकणात निसर्ग वादळात ज्यांचे नुकसान झाले, त्यांच्यापैकी काहींना अद्याप मदत मिळालेली नाही, असे समजत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे वचन दिले आहे. या परिस्थितीत त्यांनी ते पूर्ण करावे, असे आठवले म्हणाले.

यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद, निरीक्षक नीशा जाधव, आरपीआयचे कोकण प्रभारी सुशांत सकपाळ, आदेश मर्चंडे, सुरेंद्र तांबे, बोरज प्रभारी सरपंच विशाल घोसाळकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.