शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरीसाठी मुख्यमंत्री बारसूचा विचार करतील : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST

राजापूर : नाणार कदापि नाही, मात्र रिफायनरीसाठी मुख्यमंत्री बारसूचा विचार करतील. त्यासाठी आपली रिफायनरी प्रकल्पाची मागणी जशीच्या तशी मुख्यमंत्री ...

राजापूर : नाणार कदापि नाही, मात्र रिफायनरीसाठी मुख्यमंत्री बारसूचा विचार करतील. त्यासाठी आपली रिफायनरी प्रकल्पाची मागणी जशीच्या तशी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहाेचवू, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरी समर्थक शिष्टमंडळाला राजापूर येथे दिली. या वेळी बारसू, सोलगाव भागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रिफायनरीबाबत खासदार राऊत यांनी दिलेल्या आश्वासनामुळे शिवसेनेकडून रिफायनरीचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे.

राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव, नाटे दशक्राेशीतील शेकडो ग्रामस्थांनी राजापुरातील डॉक्टर, वकील, व्यापारी, आंबा बागायतदार, मच्छीमार यांच्या सोबतीने खासदार विनायक राऊत यांची राजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी भेट घेतली. या वेळी आमदार राजन साळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर उपस्थित होते. या भेटीदरम्यान रिफायनरी समर्थक समन्वय समितीचे ॲड. शशिकांत सुतार यांनी बारसू, सोलगाव परिसरात रिफायनरी उभी करण्याबाबतचे निवेदन दिले.

अपुरा रोजगार, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, कोविडनंतरची उद्भवलेली परिस्थिती, व्यवसायवृद्धी, गावातील तरुणांची लक्षणीयरीत्या कमी होत जाणारी संख्या, आंबा बागायतदारांच्या व्यथा, मच्छीमार, महिला बचतगटांच्या समस्या व त्यांच्या आर्थिक वृद्धीचे उपाय अशा अनेक समस्या खासदारांपुढे मांडल्या. रिफायनरीसारखा प्रकल्प आल्यास या सर्व समस्यांचे निराकरण होईल या हेतूने हा रिफायनरी प्रकल्प बारसू, सोलगाव, नाटे परिसरात व्हावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. समर्थकांची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे जशीच्या तशी मांडण्यात येईल. मुख्यमंत्री यावर लवकरच याेग्य ताे निर्णय घेतील, असे खासदार राऊत यांनी या वेळी सांगितले.

बारसू सोलगाव भागात हा प्रकल्प आल्यास एकही घर अथवा मंदिराचे विस्थापनही होत नाही ही बाब संबंधितांकडून प्रकर्षाने अधोरेखित करण्यात आली. प्रकल्पाविषयी असलेल्या प्रदूषणाच्या अफवांची माहिती घेऊन संबंधित ग्रामस्थांनी त्याचे योग्य व्यक्तींकडून निराकरण करून घेतले आहे, याचीही माहिती या वेळी शिष्टमंडळातर्फे देण्यात आली.

या बैठकीला रिफायनरी समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार, नगराध्यक्ष जमीर खलिफे, बागायतदार हनिफ काजी, धोपेश्वर सरपंच दत्ताराम करंबेळकर, सोलगाव माजी सरपंच भाई पाटील, गोवळ येथील गौरव परांजपे, भाजपचे तालुका संपर्कप्रमुख सुरज पेडणेकर, सोलगाव ग्रामपंचायत सदस्य दीक्षा गुरव व रामचंद्र गुरव, बचतगट प्रतिनिधी व शिवसेना महिला संघटक मनाली करजवकर, पंचायत समिती सदस्य उन्नती वाघरे, नाटे माजी सरपंच संजय बांदकर, सरपंच योगिता बांदकर, राजू बांदकर, महेश कोठारकर, सुबोध आंबोळकर, श्रुतिका बांदकर, सचिन बांदकर, युवासेना उपविभाग प्रमुख दुष्यंत पाथरे, माजी विभागप्रमुख डॉ. सुनील राणे, उपविभागप्रमुख संतोष चव्हाण, कोदवली विभागप्रमुख संतोष हातणकर, पंचायत समिती सदस्य सुभाष गुरव, राष्ट्रवादी युवक तालुकाप्रमुख मनोहर गुरव, सोलगावचे ग्रामस्थ राजाराम गुरव, देवाचे गोठणे येथील ग्रामस्थ विनायक दीक्षित, माजी सरपंच प्राची शिर्के, ॲड. यशवंत कावतकर उपस्थित होते.

-----------------------------

नाणारबाबतचे निवेदन स्वीकारलेच नाही

नाणार येथे रिफायनरी प्रकल्प हाेण्यासाठी एक शिष्टमंडळ खासदार विनायक राऊत यांना निवेदन देण्यासाठी आले हाेते. त्या वेळी खासदार राऊत यांनी या शिष्टमंडळाला भेट नाकारत नाणार हा विषय संपलेला आहे, तेथे प्रकल्प आता हाेणार नाही, असे सांगून शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले नाही.