शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी प्रकल्पासाठी मुख्यमंत्री सहमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे पूर्ण सहमत आहेत. मात्र खासदार विनायक ...

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे पूर्ण सहमत आहेत. मात्र खासदार विनायक राऊत यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. आता त्यांचे कशा प्रकारचे प्रबोधन करायचे ते आपण पाहू, असे भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरीतील भाजप जिल्हा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपच्या जनआशीर्वाद अभियानाची माहिती या वेळी देण्यात आली. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे की, जेथे जास्तीत जास्त पुनर्वसन करावे लागणार नाही, अशा ठिकाणी रिफायनरी व्हावी. बारसू येथे एमआयडीसी जाहीर करण्यात आली आहे. त्याच्या आजूबाजूच्या गावातील ८ ते १० हजार एकर जागा घेऊन रिफायनरी करण्यात यावी, अशी आपली मागणी असल्याचे जठार यांनी सांगितले. कोकणाच्या विकासाची उंची येथील समुद्राच्या खोलीत आहे. त्यासाठी कोकणातील राजकारण्यांनी समुद्राच्या खोलीत जाऊन आपल्या विचाराची खोली वाढवावी, असा सल्लाही जठार यांनी राजकारण्यांना दिला.

ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारने गेल्या ७ वर्षांत केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून आशीर्वाद घेण्यासाठी आणि कोकण विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा महत्त्वाची आहे. त्यात चिपळूण, रत्नागिरीमध्ये आढावा बैठक घेण्यात येणार आहे. ते १९ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीत ही यात्रा करणार आहेत. ९ लोकसभा मतदारसंघ, ३३ विधानसभा मतदारसंघ आणि सुमारे १ हजार किलाेमीटरची ही यात्रा असेल. या यात्रेमध्ये आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींसह २०० जण सहभागी होणार आत्त. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, लोकसभा मतदारसंघ प्रमुख अतुल काळसेकर, राजेश सावंत, भाजप युवा माेर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, सचिन करमरकर, उमेश कुळकर्णी, राजू भाटलेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा ऐश्वर्या जठार व अन्य उपस्थित होते.