शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गडकिल्ल्यांची होणार स्वच्छता

By admin | Updated: September 18, 2016 00:07 IST

स्वच्छता अभियान : अभियानासाठी गड संवर्धन समितीची स्थापना

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला प्रतिसाद देत महाराष्ट्रात गड-किल्ले स्वच्छता अभियानाला प्रांरभ करण्यात आला आहे. हे स्वच्छता अभियान १५ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील विविध किल्ल्यांवर होणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, आदी विभागांमधील १०० किल्ल्यांवर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यात इतिहासाची साक्ष देणारे किल्ले आजही उभे आहेत. जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, दापोली, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी याठिकाणी हे किल्ले अस्तित्वात आहेत. मात्र, यातील काही किल्ल्यांची अवस्था दयनीय असून, तेथे जाणेही कठीण बनले आहे. त्यामुळे हे किल्ले दुर्लक्षित राहिले आहेत. स्वच्छता मोहिमेमुळे दुर्लक्षित राहिलेल्या किल्ल्यांची स्वच्छता होऊन ते पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरतील. स्वच्छता अभियानामुळे जिल्ह्यातील दुर्लक्षित राहिलेल्या किल्ल्यांना ऊर्जितावस्था प्राप्त होण्याची आशा निर्माण झाली आहे.महाराष्ट्राला गड-किल्ल्यांचा वैभवशाली इतिहास असून, राज्यात साधारणत: ३५० किल्ले आहेत. सदर वारसा जतन करण्याचे काम राज्य शासनाचा पुरातत्त्व विभाग, क्रेंद्रीय पुरातत्त्व विभाग, गड-संवर्धन समिती तसेच गड-संवर्धन निगडीत स्वयंसेवी संस्था यांचा या स्वच्छता मोहिमेत सहभाग राहणार आहे. मुंबईतील शिवडी, सेंट जॉर्ज किल्ला, वरळी येथील किल्ल्यांवरील स्वच्छता मोहिमेला १७ सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात आला.सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन योग्य पध्दतीने व्हावे, यासाठी महाराष्ट्रातील इतिहास आणि गड-किल्ले तज्ज्ञ मंडळीचा समावेश असलेल्या गड-संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांना एक उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. त्याअंतर्गतचे ही गड-किल्ले स्वच्छता अभियान मोहीम राबविली जाणार आहे.राम गणेश गडकरी यांनी ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असे राज्याचे यथार्थ वर्णन केले आहे. या राज्याचा राकटपणा, कणखर आणि दणकट दगडांच्या वास्तू किल्ल्यांच्या रुपाने आजही टिकून आहेत. दुर्गवैभव हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि वारश्याचा गाभा आहे. किल्ल्यांची देखभाल करणे, त्यांचे जतन व संवर्धन करणे व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.राज्यातील विविध भागात असलेल्या गड-किल्ल्यांच्या भागातील संबंधित पालकमंत्री, खासदार, आमदार, महानगरपालिका, नगरपालिका, गडप्रेमी संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, समाजसेवी संस्था यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन विनोद तावडे यांनी केले आहे.महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता मोहिमेत कचरा, प्लास्टिक स्वच्छता करण्यात येणार आहे. प्लास्टिकमुक्त गड-किल्ले असा या अभियानाचा गाभा आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या काळात किल्ल्यांच्या पायऱ्यांवर जमा झालेले शेवाळ काढण्यात येणार असून, या मोहिमेला सर्व गडप्रेमींनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन तावडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)पावसाचा अटकाव : पुन्हा मोहीम राबवणारशासनाने हाती घेतलेल्या गड- किल्ल्यांच्या स्वच्छता अभियानात पावसाचा अडसर येण्याची चिन्हे आहेत. पावसामुळे गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहिमेला अडथळा आल्यास त्या गडांवरील स्वच्छता मोहीम पुढे घेण्यात येणार आहे. त्यामुळे पावसानंतर पुन्हा ही मोहीम राबविण्यात येणार आहे.