शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

शाळांमध्ये स्वच्छ भारत अभियान !

By admin | Updated: November 11, 2014 23:24 IST

दोन बक्षिसे : सगळीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

सागर पाटील - टेंभ्ये -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेले स्वच्छ भारत अभियान सध्या शाळांमधून जोरात सुरु आहे. या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळास्तरावर करण्यात येणार आहे. या उपक्रमामधून शाळास्तरावर वयोगटानुसार दोन क्रमांक काढले जाणार आहेत.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, माध्यमिक शाळांमध्ये सध्या स्वच्छ भारत अभियान उपक्रमाच्या आयोजनाची धावपळ सुरु आहे. शाळा स्वच्छ व सुंदर व्हाव्यात, यादृष्टीने शिक्षण विभाग या अभियानांतर्गत विशेष प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. शाळा स्तरावर स्वच्छतागृह, वर्गखोली, क्रीडांगण, स्वयंपाकगृह, पाण्याची सोय, अभिलेख वर्गीकरण या घटकांची याअंतर्गत पाहणी केली जाणार आहे. तसेच स्वच्छतेसंदर्भात शाळास्तरावर पथनाट्य, प्रभातफेरी, जनजागृतीचे उपक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे. शाळा स्तरावरील अभिलेखांचे वर्गीकरण करुन योग्य त्या साहित्याचे निर्लेखन करणे अपेक्षित आहे. या माध्यमातून कार्यालयीन कागदपत्रांची स्वच्छता अपेक्षित आहे. स्वच्छ भारत अभियानअंतर्गत आवश्यक वाटल्यास शाळांना रंगरंगोटी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यक वाटल्यास शाळेच्या नावाचा बोर्ड रंगवून सुशोभित करणे अपेक्षित आहे.स्वच्छतेसंदर्भात करावयाच्या जनजागृती मोहिमेसाठी शाळांनी युवक मंडळे, लोकप्रतिनिधी, क्रीडा मंडळे, सामाजिक संस्था, शाळा व्यवस्थापक समिती यांचा सहभाग घेऊन जनजागृती मोहीम अधिक व्यापक करणे अपेक्षित आहे. शाळांनी स्वच्छता मोहीम राबवण्यापूर्वीचे दोन व स्वच्छता अभियानानंतरचे दोन फोटो शाळा स्तरावर ठेवणे आवश्यक आहे. यामुळे या मोहिमेअंतर्गत नेमका काय बदल झाला, हे पाहणे शक्य होणार आहे. तसेच शाळांनी स्वच्छता मोहिमेमध्ये किती क्रीयाशील सहभाग घेतला हे निश्चित होणार आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय अधिकाऱ्यांच्या समित्यानी शाळांना भेट देऊन पाहणी केली आहे. या भेटीदरम्यान शाळांमधील स्वच्छता मोहिमेची पाहणी करण्यात येत आहे. शाळांमध्ये स्वच्छतेचा दैनंदिन उपक्रमशाळांमध्ये शालेय परिसर, वर्गखोल्या यांची दैनंदिन स्वच्छता केली जाते. त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये या उपक्रमासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नसल्याचे बोलले जात आहे. शाळांव्यतिरिक्त अन्य शासकीय कार्यालयांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी लोकमतकडे व्यक्त केले.विविध कार्यक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडेही देणार लक्ष.दि. १४ ते १९ दरम्यान शाळा स्तरावर होणार मूल्यमापन.मोहिमेत माध्यमिक स्तरावरील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भाग घेण्याचे आवाहन.माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे देणार लक्ष. शाळांसाठी दिली नवीन. कार्यप्रणाली.