शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

शाळांमध्ये स्वच्छ भारत अभियान !

By admin | Updated: November 11, 2014 23:24 IST

दोन बक्षिसे : सगळीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

सागर पाटील - टेंभ्ये -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेले स्वच्छ भारत अभियान सध्या शाळांमधून जोरात सुरु आहे. या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळास्तरावर करण्यात येणार आहे. या उपक्रमामधून शाळास्तरावर वयोगटानुसार दोन क्रमांक काढले जाणार आहेत.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, माध्यमिक शाळांमध्ये सध्या स्वच्छ भारत अभियान उपक्रमाच्या आयोजनाची धावपळ सुरु आहे. शाळा स्वच्छ व सुंदर व्हाव्यात, यादृष्टीने शिक्षण विभाग या अभियानांतर्गत विशेष प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. शाळा स्तरावर स्वच्छतागृह, वर्गखोली, क्रीडांगण, स्वयंपाकगृह, पाण्याची सोय, अभिलेख वर्गीकरण या घटकांची याअंतर्गत पाहणी केली जाणार आहे. तसेच स्वच्छतेसंदर्भात शाळास्तरावर पथनाट्य, प्रभातफेरी, जनजागृतीचे उपक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे. शाळा स्तरावरील अभिलेखांचे वर्गीकरण करुन योग्य त्या साहित्याचे निर्लेखन करणे अपेक्षित आहे. या माध्यमातून कार्यालयीन कागदपत्रांची स्वच्छता अपेक्षित आहे. स्वच्छ भारत अभियानअंतर्गत आवश्यक वाटल्यास शाळांना रंगरंगोटी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यक वाटल्यास शाळेच्या नावाचा बोर्ड रंगवून सुशोभित करणे अपेक्षित आहे.स्वच्छतेसंदर्भात करावयाच्या जनजागृती मोहिमेसाठी शाळांनी युवक मंडळे, लोकप्रतिनिधी, क्रीडा मंडळे, सामाजिक संस्था, शाळा व्यवस्थापक समिती यांचा सहभाग घेऊन जनजागृती मोहीम अधिक व्यापक करणे अपेक्षित आहे. शाळांनी स्वच्छता मोहीम राबवण्यापूर्वीचे दोन व स्वच्छता अभियानानंतरचे दोन फोटो शाळा स्तरावर ठेवणे आवश्यक आहे. यामुळे या मोहिमेअंतर्गत नेमका काय बदल झाला, हे पाहणे शक्य होणार आहे. तसेच शाळांनी स्वच्छता मोहिमेमध्ये किती क्रीयाशील सहभाग घेतला हे निश्चित होणार आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय अधिकाऱ्यांच्या समित्यानी शाळांना भेट देऊन पाहणी केली आहे. या भेटीदरम्यान शाळांमधील स्वच्छता मोहिमेची पाहणी करण्यात येत आहे. शाळांमध्ये स्वच्छतेचा दैनंदिन उपक्रमशाळांमध्ये शालेय परिसर, वर्गखोल्या यांची दैनंदिन स्वच्छता केली जाते. त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये या उपक्रमासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नसल्याचे बोलले जात आहे. शाळांव्यतिरिक्त अन्य शासकीय कार्यालयांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी लोकमतकडे व्यक्त केले.विविध कार्यक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडेही देणार लक्ष.दि. १४ ते १९ दरम्यान शाळा स्तरावर होणार मूल्यमापन.मोहिमेत माध्यमिक स्तरावरील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भाग घेण्याचे आवाहन.माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे देणार लक्ष. शाळांसाठी दिली नवीन. कार्यप्रणाली.