शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दहावी, बारावीचा निकाल २२ टक्के

By admin | Updated: November 26, 2014 00:01 IST

शिक्षण मंडळ : गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढली

टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सप्टेंबर/आॅक्टोबर २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचा आॅनलाईन निकाल दुपारी १ वाजता जाहीर झाला. कोकण विभागीय परीक्षा मंडळाचा दहावीचा निकाल २२.४८%, तर बारावीचा निकाल २२.३४% लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे.दहावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातून ७७८ विद्यार्थी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी रत्नागिरीमधून १८२ विद्यार्थी, तर सिंधुदुर्गमधून ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेच्या शेकडा प्रमाणामध्ये रत्नागिरीने बाजी मारली असून, २३.३९ टक्के विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यातून उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा राज्यात सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा लागला असून, सर्वांत कमी निकाल कोकण विभागाचा लागला आहे.दहावीच्या परीक्षेमध्ये ८३७ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी १८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे शेकडा प्रमाण २२.३४% इतके आहे. सर्वात कमी निकाल एमसीव्हीसी शाखेचा लागला आहे. या शाखेतील ३४ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेच्या २२६ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी २८ विद्यार्थी, कला शाखेचे ३३४ पैकी ६६ विद्यार्थी, तर वाणिज्य शाखेचे २४३ पैकी ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी बाजी मारली असून, मुलींपैकी ७४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ५८३ मुलांपैकी ११३ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेत राज्यात सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. (वार्ताहर)मागील तीन वर्षांतील सर्वाधिक निकालकोकण विभागाचा सप्टेंबर/आॅक्टोबर २०१४ चा निकाल हा मागील तीन वर्षातील सर्वाधिक निकाल आहे. दहावीचा सप्टेंबर/आॅक्टोबर २०१२ मध्ये ११.४४%, तर सप्टेंबर/आॅक्टोबर २०१३ मध्ये ११.४५% निकाल लागला होता. यावर्षी या निकालामध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. बारावीचा सप्टेंबर/आॅक्टोबर २०१२ चा निकाल १८%, तर सप्टेंबर/आॅक्टोबर २०१३ चा निकाल १६.३% लागला होता. यावर्षी या टक्केवारीत जवळपास ६ टक्क्यानी े वाढ झाली आहे. निकालाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार : आर. बी. गिरीया परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वाटचाल जोमाने करावी, त्यांना मिळालेले हे यश त्यांच्या अविरत प्रयत्नांचे फळ आहे. तसेच अयशस्वी विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने प्रयत्न करावेत, असे मत कोकण विभागीय मंडळाचे सचिव आर. बी. गिरी यांनी व्यक्त केले. भविष्यात निकालाचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.