शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

दहावी, बारावीचा निकाल २२ टक्के

By admin | Updated: November 26, 2014 00:01 IST

शिक्षण मंडळ : गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढली

टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सप्टेंबर/आॅक्टोबर २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचा आॅनलाईन निकाल दुपारी १ वाजता जाहीर झाला. कोकण विभागीय परीक्षा मंडळाचा दहावीचा निकाल २२.४८%, तर बारावीचा निकाल २२.३४% लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे.दहावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातून ७७८ विद्यार्थी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी रत्नागिरीमधून १८२ विद्यार्थी, तर सिंधुदुर्गमधून ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेच्या शेकडा प्रमाणामध्ये रत्नागिरीने बाजी मारली असून, २३.३९ टक्के विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यातून उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा राज्यात सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा लागला असून, सर्वांत कमी निकाल कोकण विभागाचा लागला आहे.दहावीच्या परीक्षेमध्ये ८३७ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी १८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे शेकडा प्रमाण २२.३४% इतके आहे. सर्वात कमी निकाल एमसीव्हीसी शाखेचा लागला आहे. या शाखेतील ३४ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेच्या २२६ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी २८ विद्यार्थी, कला शाखेचे ३३४ पैकी ६६ विद्यार्थी, तर वाणिज्य शाखेचे २४३ पैकी ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी बाजी मारली असून, मुलींपैकी ७४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ५८३ मुलांपैकी ११३ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेत राज्यात सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. (वार्ताहर)मागील तीन वर्षांतील सर्वाधिक निकालकोकण विभागाचा सप्टेंबर/आॅक्टोबर २०१४ चा निकाल हा मागील तीन वर्षातील सर्वाधिक निकाल आहे. दहावीचा सप्टेंबर/आॅक्टोबर २०१२ मध्ये ११.४४%, तर सप्टेंबर/आॅक्टोबर २०१३ मध्ये ११.४५% निकाल लागला होता. यावर्षी या निकालामध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. बारावीचा सप्टेंबर/आॅक्टोबर २०१२ चा निकाल १८%, तर सप्टेंबर/आॅक्टोबर २०१३ चा निकाल १६.३% लागला होता. यावर्षी या टक्केवारीत जवळपास ६ टक्क्यानी े वाढ झाली आहे. निकालाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार : आर. बी. गिरीया परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वाटचाल जोमाने करावी, त्यांना मिळालेले हे यश त्यांच्या अविरत प्रयत्नांचे फळ आहे. तसेच अयशस्वी विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने प्रयत्न करावेत, असे मत कोकण विभागीय मंडळाचे सचिव आर. बी. गिरी यांनी व्यक्त केले. भविष्यात निकालाचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.