शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दहावी, बारावीचा निकाल २२ टक्के

By admin | Updated: November 26, 2014 00:01 IST

शिक्षण मंडळ : गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढली

टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सप्टेंबर/आॅक्टोबर २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचा आॅनलाईन निकाल दुपारी १ वाजता जाहीर झाला. कोकण विभागीय परीक्षा मंडळाचा दहावीचा निकाल २२.४८%, तर बारावीचा निकाल २२.३४% लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे.दहावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातून ७७८ विद्यार्थी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी रत्नागिरीमधून १८२ विद्यार्थी, तर सिंधुदुर्गमधून ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेच्या शेकडा प्रमाणामध्ये रत्नागिरीने बाजी मारली असून, २३.३९ टक्के विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यातून उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा राज्यात सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा लागला असून, सर्वांत कमी निकाल कोकण विभागाचा लागला आहे.दहावीच्या परीक्षेमध्ये ८३७ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी १८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे शेकडा प्रमाण २२.३४% इतके आहे. सर्वात कमी निकाल एमसीव्हीसी शाखेचा लागला आहे. या शाखेतील ३४ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेच्या २२६ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी २८ विद्यार्थी, कला शाखेचे ३३४ पैकी ६६ विद्यार्थी, तर वाणिज्य शाखेचे २४३ पैकी ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी बाजी मारली असून, मुलींपैकी ७४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ५८३ मुलांपैकी ११३ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेत राज्यात सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. (वार्ताहर)मागील तीन वर्षांतील सर्वाधिक निकालकोकण विभागाचा सप्टेंबर/आॅक्टोबर २०१४ चा निकाल हा मागील तीन वर्षातील सर्वाधिक निकाल आहे. दहावीचा सप्टेंबर/आॅक्टोबर २०१२ मध्ये ११.४४%, तर सप्टेंबर/आॅक्टोबर २०१३ मध्ये ११.४५% निकाल लागला होता. यावर्षी या निकालामध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. बारावीचा सप्टेंबर/आॅक्टोबर २०१२ चा निकाल १८%, तर सप्टेंबर/आॅक्टोबर २०१३ चा निकाल १६.३% लागला होता. यावर्षी या टक्केवारीत जवळपास ६ टक्क्यानी े वाढ झाली आहे. निकालाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार : आर. बी. गिरीया परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वाटचाल जोमाने करावी, त्यांना मिळालेले हे यश त्यांच्या अविरत प्रयत्नांचे फळ आहे. तसेच अयशस्वी विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने प्रयत्न करावेत, असे मत कोकण विभागीय मंडळाचे सचिव आर. बी. गिरी यांनी व्यक्त केले. भविष्यात निकालाचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.