शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बंदोबस्तातील पोलिसांनी साफ केला घरातील चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:27 IST

अरुण आडिवरेकर। लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्यापासून अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. ...

अरुण आडिवरेकर।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्यापासून अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर भेंदवाडीतील लोक जेव्हा वाचलेल्या घरातील चिखल दोन दोन दिवसापासून उपसत होते. त्यावेळी त्यांना कोणीही मदत करत नव्हते. त्याचवेळी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी स्वत:च कपडे काढून घरातील चिखल काढण्यास सुरूवात केली.धरणफुटीची माहिती मिळताच स्थानिक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दादर पुलावर पाणी आल्याचे सांगताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासमवेत रवाना झाले. तीन दिवस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड तिवरे येथे होते.तेथे गेल्यानंतर नातेवाईकांची होणारी गर्दी थांबविण्यासाठी रात्रीच बंदोबस्त ठेवण्यात आला. गावातील एका ग्रामस्थाने व्यक्तींची यादी तयार केली होती. त्यानंतर सरपंचांच्या घरापासून पोलिसांनी कामाला सुरूवात केली. जिल्हा शल्यचिकित्सकांशी बोलून डॉक्टरांचे पथक बोलाविण्यात आले. मृतदेह शोधण्यासाठी गावातील पोहणाऱ्या मुलांबरोबरच कोल्हापूर व अन्य भागातून मुलांना बोलावण्यात आले. त्यानंतर मृतदेहांचे विच्छेदन थांबू नये, यासाठी पहाटेच पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठीदेखील पोलिसांनी मदत केली.या कामात अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याबरोबरच २०० पोलीस, १२ पोलीस निरीक्षक, २५ ते ३० अधिकारी, उपविभागीय अधिकारी तैनात करण्यात आले होते. या भागातील परिस्थिती आता पूर्ण: नियंत्रणात आली असून, सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या पथकासाठी एक जागा निश्चित करून देण्यात आली आहे. त्याठिकाणाहून त्यांचे कामकाज सुरू असून, वॉकीटॉकीच्या सहाय्याने ते आपल्याशी सतत संपर्कात आहेत. शेवटचा मृतदेह हाती लागेपर्यंत त्यांचे काम सुरूच राहणार असल्याचे विशाल गायकवाड यांनी बोलताना सांगितले.तांत्रिक बाबी तपासणारया प्रकारानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी साºया बाबी तपासल्या जाणार आहेत. या बाबी तपासल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या त्यामध्ये दोष होता हे ठोसपणे सिद्ध होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. त्या समितीचा अहवाल, जिल्हाधिकारी यांचा अहवाल तपासून गुन्हे दाखल करण्याबाबत कार्यवाही होणार आहे.