शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तातील पोलिसांनी साफ केला घरातील चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:27 IST

अरुण आडिवरेकर। लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्यापासून अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. ...

अरुण आडिवरेकर।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्यापासून अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर भेंदवाडीतील लोक जेव्हा वाचलेल्या घरातील चिखल दोन दोन दिवसापासून उपसत होते. त्यावेळी त्यांना कोणीही मदत करत नव्हते. त्याचवेळी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी स्वत:च कपडे काढून घरातील चिखल काढण्यास सुरूवात केली.धरणफुटीची माहिती मिळताच स्थानिक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दादर पुलावर पाणी आल्याचे सांगताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासमवेत रवाना झाले. तीन दिवस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड तिवरे येथे होते.तेथे गेल्यानंतर नातेवाईकांची होणारी गर्दी थांबविण्यासाठी रात्रीच बंदोबस्त ठेवण्यात आला. गावातील एका ग्रामस्थाने व्यक्तींची यादी तयार केली होती. त्यानंतर सरपंचांच्या घरापासून पोलिसांनी कामाला सुरूवात केली. जिल्हा शल्यचिकित्सकांशी बोलून डॉक्टरांचे पथक बोलाविण्यात आले. मृतदेह शोधण्यासाठी गावातील पोहणाऱ्या मुलांबरोबरच कोल्हापूर व अन्य भागातून मुलांना बोलावण्यात आले. त्यानंतर मृतदेहांचे विच्छेदन थांबू नये, यासाठी पहाटेच पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठीदेखील पोलिसांनी मदत केली.या कामात अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याबरोबरच २०० पोलीस, १२ पोलीस निरीक्षक, २५ ते ३० अधिकारी, उपविभागीय अधिकारी तैनात करण्यात आले होते. या भागातील परिस्थिती आता पूर्ण: नियंत्रणात आली असून, सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या पथकासाठी एक जागा निश्चित करून देण्यात आली आहे. त्याठिकाणाहून त्यांचे कामकाज सुरू असून, वॉकीटॉकीच्या सहाय्याने ते आपल्याशी सतत संपर्कात आहेत. शेवटचा मृतदेह हाती लागेपर्यंत त्यांचे काम सुरूच राहणार असल्याचे विशाल गायकवाड यांनी बोलताना सांगितले.तांत्रिक बाबी तपासणारया प्रकारानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी साºया बाबी तपासल्या जाणार आहेत. या बाबी तपासल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या त्यामध्ये दोष होता हे ठोसपणे सिद्ध होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. त्या समितीचा अहवाल, जिल्हाधिकारी यांचा अहवाल तपासून गुन्हे दाखल करण्याबाबत कार्यवाही होणार आहे.