शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

बंदोबस्तातील पोलिसांनी साफ केला घरातील चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:27 IST

अरुण आडिवरेकर। लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्यापासून अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. ...

अरुण आडिवरेकर।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्यापासून अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर भेंदवाडीतील लोक जेव्हा वाचलेल्या घरातील चिखल दोन दोन दिवसापासून उपसत होते. त्यावेळी त्यांना कोणीही मदत करत नव्हते. त्याचवेळी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी स्वत:च कपडे काढून घरातील चिखल काढण्यास सुरूवात केली.धरणफुटीची माहिती मिळताच स्थानिक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दादर पुलावर पाणी आल्याचे सांगताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासमवेत रवाना झाले. तीन दिवस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड तिवरे येथे होते.तेथे गेल्यानंतर नातेवाईकांची होणारी गर्दी थांबविण्यासाठी रात्रीच बंदोबस्त ठेवण्यात आला. गावातील एका ग्रामस्थाने व्यक्तींची यादी तयार केली होती. त्यानंतर सरपंचांच्या घरापासून पोलिसांनी कामाला सुरूवात केली. जिल्हा शल्यचिकित्सकांशी बोलून डॉक्टरांचे पथक बोलाविण्यात आले. मृतदेह शोधण्यासाठी गावातील पोहणाऱ्या मुलांबरोबरच कोल्हापूर व अन्य भागातून मुलांना बोलावण्यात आले. त्यानंतर मृतदेहांचे विच्छेदन थांबू नये, यासाठी पहाटेच पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठीदेखील पोलिसांनी मदत केली.या कामात अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याबरोबरच २०० पोलीस, १२ पोलीस निरीक्षक, २५ ते ३० अधिकारी, उपविभागीय अधिकारी तैनात करण्यात आले होते. या भागातील परिस्थिती आता पूर्ण: नियंत्रणात आली असून, सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या पथकासाठी एक जागा निश्चित करून देण्यात आली आहे. त्याठिकाणाहून त्यांचे कामकाज सुरू असून, वॉकीटॉकीच्या सहाय्याने ते आपल्याशी सतत संपर्कात आहेत. शेवटचा मृतदेह हाती लागेपर्यंत त्यांचे काम सुरूच राहणार असल्याचे विशाल गायकवाड यांनी बोलताना सांगितले.तांत्रिक बाबी तपासणारया प्रकारानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी साºया बाबी तपासल्या जाणार आहेत. या बाबी तपासल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या त्यामध्ये दोष होता हे ठोसपणे सिद्ध होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. त्या समितीचा अहवाल, जिल्हाधिकारी यांचा अहवाल तपासून गुन्हे दाखल करण्याबाबत कार्यवाही होणार आहे.