शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST

राजापूर शहरात एक जण वाहून गेला आहे . लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुका आणि ...

राजापूर शहरात एक जण वाहून गेला आहे .

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : रविवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुका आणि शहर परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्जुना आणि काेदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने राजापूर शहराला वेढा घातला आहे. शहरातील जवाहर चाैकात पुराचे पाणी शिरले असून, पुराच्या पाण्यात एक जण वाहून बेपत्ता झाला आहे. तर अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ हाेत असल्याने मुंबई - गाेवा महामार्गावरील राजापूर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने या वर्षी दुसऱ्यांदा शहराला वेढा घातला आहे. रविवारी रात्री उशिरा जवाहर चौकामध्ये धडक देणाऱ्या पुराच्या पाण्याने साेमवारी सायंकाळपर्यंत ठिय्या मांडला आहे. जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा सुमारे २४ तासांहून अधिक काळ शहराला वेढा राहिला आहे. संततधार पावसाने पूरस्थितीमध्ये वाढ होत असल्याने व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडविली आहे.

शहरातील बंदरधक्का, मुन्शीनाका परिसर, वरचीपेठ परिसर, शिवाजीपथ, भटाळीतील कोदवली नदीलगतचा भाग, गुजराळी आदी भाग पुराच्या पाण्याखाली आहे. तर, शहरालगतचा शीळ, गोठणेदोनिवडे-चिखलगाव आदी गावांचा संपर्क तुटला आहे. उन्हाळे, दोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नद्यांच्या काठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, तहसीलदार प्रतिभा वराळे आदींनी शहरातील पूरस्थितीची पाहणी करून लोकांसह व्यापाऱ्यांना सतर्कततेचा इशारा दिला आहे.

शिवाजी पथ रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले. पाणीपातळीत वाढ झाल्याने व्यापाऱ्यांनी दुकानामध्ये पाणी घुसण्याच्या शक्यतेने तातडीने दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी रात्रीच हलविला. त्यामुळे व्यापाऱ्यांचे फारसे नुकसान झालेले नाही.

राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी माहिती देताना सांगितले की, पुराच्या पाण्यात कोंढेतड पुलाजवळून सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एक जण वाहून गेला असून, त्याचा शोध सुरू झाला आहे. अंदाजे ४५ वर्षे वयाचा पुरुष असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

------------------------

काेल्हापूर मार्ग बंद

राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे अर्जुना नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे ओणी - अणस्कुरा कोल्हापूर मार्गावर सौंदळ, रायपाटण या ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे हा मार्ग बंद पडला आहे. तर रायपाटण येतील एका पुलावर पाणी आल्याने काही वाड्यांचा संपर्क तुटला आहे.

------------------------

पुराचे पाणी शेतात

राजापूर तालुक्यातील तारळ प्रिंदावण भागातून वाहणाऱ्या सुक नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी मळे शेतीमध्ये घुसले आहे. या ठिकाणीही अनेक शेतकऱ्यांची अवजारे वाहून गेल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सुक नदीचे पाणी शेतामध्ये घुसून या भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.