शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शहर विकास आघाडी दुभंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 15:55 IST

राज्यात सत्ता समीकरणे बदलून महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीची समीकरणेही बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनावगळता अन्य पक्षांनी स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीमध्ये आता उभी फूट पडली आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शहर विकास आघाडी दुभंगली कॉँग्रेस, मनसे, स्वाभिमान आघाडीबाहेर

रत्नागिरी : राज्यात सत्ता समीकरणे बदलून महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीची समीकरणेही बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनावगळता अन्य पक्षांनी स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीमध्ये आता उभी फूट पडली आहे.

राष्ट्रीय कॉँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर विकास आघाडीतून बाहेर पडली आहे. तर स्वाभिमान पक्षाचे भाजपमध्ये विलिनीकरण झाले आहे. आघाडीत मोठी फूट पडल्याने शिवसेनेचा विजयाचा मार्ग सोपा झाल्याची चर्चा आहे.रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक २०१६च्या अखेरीस झाली होती. त्यानंतर शिवसेनेचे थेट नगराध्यक्ष म्हणून राहुल पंडित निवडून आले होते. पक्षांतर्गत ठरल्यानुसार त्यांनी आपल्या पदाचा दोन वर्षांच्या कालावधीनंतर राजीनामा दिला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते.

रिक्त पदावर शिवसेनेचे बंड्या साळवी हे सध्या प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आता थेट नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक २९ डिसेंबर २०१९ रोजी होणार आहे, तर मतमोजणी व निकाल ३० डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या हालचालींना जोर आला आहे.दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉँग्रेस, बसपा व अन्य पक्षांतर्फे रत्नागिरीत पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी शहर विकास आघाडी कायम असून, मिलिंद कीर हेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांनी केली होती. मात्र, त्यानंतर कॉँग्रेसने या आघाडीत काँग्रेस नसल्याने जाहीर केले आहे. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावयाचा याबाबत कोणताही निर्णय कॉँग्रेसने घेतलेला नाही, असे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी स्पष्ट केले आहे.तसेच नगराध्यक्ष निवडणूक व अन्य विषयांबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी सकाळी कॉँग्रेस भुवन, रत्नागिरी येथे शहर व तालुका कॉँग्रेसची बैठक बोलविण्यात आली आहे. कॉँग्रेस, मनसे व स्वाभिमान पक्ष शहर विकास आघाडीतून बाहेर पडल्याने आघाडी कमकुवत झाली आहे. राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या समीकरणामुळे रत्नागिरीतही नगराध्यक्ष निवडणूक महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून लढविली जाणार का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.शिवसेनेसाठी पेपर सोपा?रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपद निवडणुकीत शिवसेना व शहर विकास आघाडी असा सामना रंगण्याची आधी शक्यता होती. मात्र, आघाडीत फूट पडल्याने आता शिवसेनेबरोबरच भाजप तसेच कॉँग्रेस, मनसे यांचे उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी