शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

कोरोना काळात नागरिकांनीही पुढे येणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST

गुहागर : तालुक्यात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींना संबंधित ग्रामपंचायत महसूल कर्मचारी व नगरपंचायत गुहागरच्या कर्मचाऱ्यांमार्फतच दिला जात आहे. शासनाच्या ...

गुहागर : तालुक्यात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींना संबंधित ग्रामपंचायत महसूल कर्मचारी व नगरपंचायत गुहागरच्या कर्मचाऱ्यांमार्फतच दिला जात आहे. शासनाच्या नियमानुसार शासकीय कर्मचारी म्हणून आपले कर्तव्य बजावत असले तरी मृत रुग्णाच्या नातेवाइकांसह सामाजिक बांधिलकी म्हणून नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अग्नी देताना शासकीय कर्मचाऱ्यांसोबत मृत रुग्णाचे नातेवाईकसुद्धा सोबत येत नाहीत. आठवडाभरात तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरळ, गिमवी, वेळंब, पालशेतबरोबर गुहागर शहरातील एकाचा समावेश आहे. या मयत रुग्णांना नगरपंचायतीमार्फत अग्नी देण्यात आला. मात्र यामध्ये एक वेगळाच अनुभव नगरपंचायत कर्मचाऱ्यांना अनुभववास मिळाला. सर्व मृतांना अग्नी देताना सोबत एक तरी नातेवाईक उपस्थित होता. गिमवी येथील एक वृद्ध सुरुवातीला शृंगारतळी येथील रेम्बो लॉजिंग येथील खासगी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होता. या रुग्णाची तब्बेत गंभीर झाल्यानंतर गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. पुढील मृतदेहाला अग्नी देण्याचे कर्तव्य नगरपंचायत गुहागरने पार पाडले. मात्र यावेळी या रुग्णाचा नातेवाईक गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे उपस्थित असूनही एकही व्यक्ती स्मशानभूमीत आली नाही.

तालुक्यात अनेक रुग्ण उपचार घेताना ज्याच्याबरोबर आपण वर्षानुवर्षे राहिलो अशा आईवडील तसेच नातेवाइकांना घाबरून पाहण्यासाठीसुद्धा येत नाहीत अशी विदारक स्थिती पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत, महसूल, पोलीस व नगरपंचायत कर्मचारी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत असताना अद्याप तालुक्यात एकही सामाजिक संस्था, व्यक्ती पुढे आलेली नाही ही वस्तुस्थिती आहे.