शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

चिरेखाणी सताड उघड्याच

By admin | Updated: August 20, 2015 22:03 IST

आदेश धाब्यावर : मालकांना ना चिंता, प्रशासनाला ना काळजी

राजेंद्र यादव -रत्नागिरीउत्खननाचे काम बंद झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश चिरेखाणी उघड्या असतात. संरक्षण कठडा न बांधताच संरक्षित उपाययोजनेच्या दृष्टीने त्या धोकादायक ठरत आहेत. यामुळे लोकांच्या जीवितास धोका पोहोचण्याची आणि अपघात घडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या चिरेखाण व्यवसाय करणे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. त्यामुळे बरेचजण चिरेखाण व्यवसायात गुंतले आहेत. जिल्ह्याचे महसूल खाते फक्त रॉयल्टी घेत आहे. त्यामुळे शासनाचा महसूल वाढत असला तरी तहसीलदारांनी आपल्या मंडल अधिकाऱ्यांना, तलाठ्यांना अथवा तत्सम गावकऱ्यांना आदेश देऊन चिरे खाणीच्या सभोवती संरक्षक कठडा घालून घेणे आवश्यक आहे. खाण मालकांचेही ते कर्तव्य आहे. परंतु जिल्ह्यात तसे कुठेही आढळून येत नाही. पावसाळ्यात या खाणी पाण्याने तुडुंब भरलेल्या असतात. सुटीच्या दिवसात शेतकऱ्यांची मुले जनावरे चारण्यासाठी अथवा कुतूहलापोटी पोहण्यासाठी या खाणीतही खोल पाण्यामध्ये उड्या मारतात. खाणीमधील खोलीचा व पाण्याचा त्या लहान मुलांना अंदाज नसतो. खाणीच्या तळाशी चिकट मातीचा थर जमा झालेला असतो. त्यामुळे या पोहणाऱ्या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू ओढवतो. अशा अनेक घटना यापूर्वी जिल्हाभरामध्ये घडलेल्या आहेत. वन्य प्राणी, पाळीव जनावरे यांचाही तोल जाऊन त्याच्या जीवावर बेतू शकते.हे लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी या चिरेखाणींना कुंपण घालण्याचे आदेश काढले होते. ते आदेश चक्क धाब्यावर बसवण्यात आले आहेत.तहसीलदारांनी या उघड्या चिरेखाणी बंदिस्त करण्यासाठी संबंधितांना आदेश देणे गरजेचे आहे. ज्या उघड्या चिरेखाणी आहेत, त्यांना संरक्षित कठडे बांधून घेणे, हे तेथील तलाठी किंवा ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे. परंतु आतापर्यंत तसे झालेले नाही. प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत असून, अपघाताला आमंत्रण देत आहेत.