शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

चिरा उत्खनन; कारवाईवर सुनावणी पुढे ढकलली

By admin | Updated: February 23, 2016 00:44 IST

तहसीलदार : व्यावसायिकांची मागणी मान्य

राजापूर : उत्खनन प्रकरणी राजापूर तहसीलदारांनी लावलेली सुनावणी चिरेखाण व्यावसायिकांच्या मागणीनुसार पुढे ढकलण्यात आली असून, आता ती २५ फेब्रुवारीला होणार आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी राजापुरातील चिरेखाणींवर अचानक धाड टाकून सुमारे पाच खाणी बंद करताना तेथे असलेल्या मशिन्सना सील लावले होते. त्यानंतर तालुका प्रशासनाकडून रितसर झालेल्या बेकायदेशीर उत्खननाची पाहणी करुन त्याचा अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार सुमारे ३ हजार २५१ ब्रास चिऱ्यांचे बेकायदा उत्खनन करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या चिरेखाणवाल्यांनी परवानगीपेक्षा अधिक उत्खनन केले आहे. त्यामध्ये प्रमोद घाडी ३७१ ब्रास, अजित धुमाळे ९३० ब्रास, नारायण गार्डी १५८ ब्रास तर रस्त्यापासून अंतर सोडण्याच्या नियमाचा भंग केल्यामुळे अनिल पांगरे यांना ६२६ ब्रास, मनोज पवार २९६ ब्रास व कुमार इपलकर यांनी ८७० ब्रास बेकायदेशीर उत्खनन झाले आहे. या सर्वांविरुध्द प्रती ब्रास २२०० प्रमाणे त्याच्या पाचपट व प्रती ब्रास १०० रुपयांप्रमाणे रॉयल्टी या स्वरुपात दंड ठोठावण्यात आलेला आहे. त्यानुसार ही दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी संबंधित खाणवाल्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी महसूल प्रशासनाने संधी देताना सोमवारी सुनावणी आयोजित केली होती. त्याची नोटीस संबंधितांना पाठविण्यात आली होती. मात्र, चिरेखाण चालकांकडील कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने त्यांनी पुढील तारीख म्हणणे मांडण्यासाठी दिली जावी, अशी मागणी तहसीलदार सचिन भालेराव यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून, पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी) ४जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकून केले होते पाच ठिकाणी मशिन्सना सील. ४खाणवाल्यांना बाजू मांडण्यासाठी सुनावणी.