शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पुराच्या धसक्याने चिपळूणच्या चाकरमान्यांची उत्सवाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/ चिपळूण : गतवर्षी कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद होत्या. यंदा मात्र कोकण रेल्वे मार्गावर तब्बल ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे/ चिपळूण : गतवर्षी कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद होत्या. यंदा मात्र कोकण रेल्वे मार्गावर तब्बल २२४ गणेशोत्सव विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच एस. टी. बसही जादा सोडण्यात आल्या आहेत. या सर्वच गाड्यांचे बुकिंग फुल होते. चिपळुणात आतापर्यंत १६ हजारांहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. मात्र, चिपळुणात पुराच्या धसक्याने अनेकांनी गणेशोत्सवाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत चाकरमान्यांची संख्या कमीच आहे.

चिपळुणात १६,५०० घरगुती तर १५ सार्वजनिक गणेशमूर्ती स्थानापन्न झाल्या आहेत. काेराेनामुळे सार्वजनिक गणपतींपैकी ५ गणपतींचे प्रथमच दीड दिवसाने विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवारी या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाला चाकरमानी कोकणात एक दिवस का होईना हजेरी लावतो. गतवर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे फार चाकरमानी गावी आले नाहीत. मात्र, यावर्षी काहीशी परिस्थिती नियंत्रणात असल्याने व रेल्वे आणि बस सेवा सुरू आहेत. कोकणात येणारी प्रत्येक गाडी हाऊसफुल आहे; परंतु चिपळूणच्या बाबतीत काहीशी वेगळी परिस्थिती आहे.

चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुरात अतोनात नुकसान झाले. अजूनही येथील परिस्थिती स्थिर झालेली नाही. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुराचा धसका घेत अनेक चाकरमान्यांनी चिपळुणात येणे टाळल्याचे पुढे येत आहे. आतापर्यंत ७५ एस. टी. बस व खासगी वाहनांतून सुमारे १६ हजारांहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. आतापर्यंत अन्य बस स्थानकातून ४०० बस फेऱ्या येथील आगारात दाखल झाल्या असून, अजूनही गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे सध्या रेल्वे स्टेशनसह बस स्थानकात आलेल्या चाकरमान्यांची लगबग पाहायला मिळत असली तरी ही संख्याही कमीच आहे.

----------------------

मुंबई, पुण्यातील ६० टक्के चाकरमान्यांचे लसीकरण

कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि प्रशासनाने केले आहे. सुरुवातीला प्रशासनाने दोन डोस न घेतलेल्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. मात्र, चाकरमान्यांच्या तोबा गर्दीमुळे ती शक्य नसल्याने ती चाचणी रॅपिडवर आणण्यात आली. मात्र, तेही शक्य नसल्याने चाकरमान्यांची नोंदणी त्या त्या रेल्वेस्थानकांवर, बसस्थानकांवर करण्यात येत आहे. त्यानुसार ६० टक्के चाकरमान्यांनी दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिली.