शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

घंटानाद करत चिपळूण बचाव समितीचा हल्लाबाेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:33 IST

चिपळूण : घंटा बजाव....चिपळूण बचाव...पूर संकटाला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करा...अशा जोरदार घोषणा देत व घंटानाद करत चिपळूण बचाव समितीने ...

चिपळूण : घंटा बजाव....चिपळूण बचाव...पूर संकटाला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करा...अशा जोरदार घोषणा देत व घंटानाद करत चिपळूण बचाव समितीने चिपळूण नगर परिषद व पाटबंधारे कार्यालयावर धडक दिली. चिपळूणला आलेल्या महापुराला कारणीभूत कोण, त्याची कारणे कोणती, भविष्यात असे संकट येणार नाही त्याबाबत काय उपाययोजना आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित करत चिपळूण बचाव समितीच्या पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

चिपळूण शहरातील पूररेषा आणि त्यामुळे शहर विकासावर होणारे अनिष्ट परिणामांमुळे वातावरण ढवळून निघाले. मात्र, चिपळुणात आलेल्या महापुराबाबत अद्याप कोणतीच कारणे पुढे येत नसल्याने चिपळूण येथील व्यापारी व नागरिकांनी भविष्यातील धोका ओळखून चिपळूण बचाव समितीची स्थापन करत थेट संबंधित प्राधिकरणाला जाब विचरण्यासाठी पुढाकार घेतला. प्रत्येकवर्षी जर अशाच पद्धतीने पुराचे पाणी घुसत राहिले, तर चिपळूण शहरात वास्तव्य करणे कठीण होणार आहे. त्यामुळे आतापासून चिपळूण बचाव ही चळवळ उभी करण्याचा व शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न या समितीकडून केला जाणार आहे.

शिरीष काटकर, किशोर रेडीज, अरुण भोजने, उदय ओतरी, समीर जानवळकर, शहनवाज शहा, राम रेडीज, सतीश कदम, महेंद्र कासेकर, गुलमहमंद शहा असे व्यापारी व नागरिक एकत्र आले. त्यांनी थेट चिपळूण नगर परिषद कार्यालयावर धडक देत घंटानाद केला. येथील मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची भेट घेत पुराची माहिती नगर परिषदेला होती का, माहिती असूनही नागरिकांना सतर्क का केले नाही, कोणत्या धरणामधून पाणी सोडले गेले, त्यावेळी चिपळूणमध्ये किती मिलिमीटर पाऊस पडला, यापुढे अशी पूरस्थिती निर्माण झाल्यास नगर परिषदेची तयारी काय, कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित करत चिपळूण बचाव समितीने आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना सादर केले. त्यानंतर समिती पदाधिकाऱ्यांनी थेट पाटबंधारे कार्यालयावर धडक दिली. या ठिकाणीही घंटानाद करण्यात आला.

चिपळुणात आलेला महापूर हा मानवनिर्मित असल्याचा थेट आरोप उपस्थितांनी केला. त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न करत यामध्ये दोषी असणाऱ्यांची नावे समोर आणा. त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत पाठलाग सोडणार नाही, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला. तसेच भविष्यात अशा पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती उपाययोजना तयार आहे त्याची माहिती द्या, अशी मागणी करून निवेदन सादर केले.