शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

घंटानाद करत चिपळूण बचाव समितीचा हल्लाबाेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:33 IST

चिपळूण : घंटा बजाव....चिपळूण बचाव...पूर संकटाला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करा...अशा जोरदार घोषणा देत व घंटानाद करत चिपळूण बचाव समितीने ...

चिपळूण : घंटा बजाव....चिपळूण बचाव...पूर संकटाला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करा...अशा जोरदार घोषणा देत व घंटानाद करत चिपळूण बचाव समितीने चिपळूण नगर परिषद व पाटबंधारे कार्यालयावर धडक दिली. चिपळूणला आलेल्या महापुराला कारणीभूत कोण, त्याची कारणे कोणती, भविष्यात असे संकट येणार नाही त्याबाबत काय उपाययोजना आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित करत चिपळूण बचाव समितीच्या पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

चिपळूण शहरातील पूररेषा आणि त्यामुळे शहर विकासावर होणारे अनिष्ट परिणामांमुळे वातावरण ढवळून निघाले. मात्र, चिपळुणात आलेल्या महापुराबाबत अद्याप कोणतीच कारणे पुढे येत नसल्याने चिपळूण येथील व्यापारी व नागरिकांनी भविष्यातील धोका ओळखून चिपळूण बचाव समितीची स्थापन करत थेट संबंधित प्राधिकरणाला जाब विचरण्यासाठी पुढाकार घेतला. प्रत्येकवर्षी जर अशाच पद्धतीने पुराचे पाणी घुसत राहिले, तर चिपळूण शहरात वास्तव्य करणे कठीण होणार आहे. त्यामुळे आतापासून चिपळूण बचाव ही चळवळ उभी करण्याचा व शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न या समितीकडून केला जाणार आहे.

शिरीष काटकर, किशोर रेडीज, अरुण भोजने, उदय ओतरी, समीर जानवळकर, शहनवाज शहा, राम रेडीज, सतीश कदम, महेंद्र कासेकर, गुलमहमंद शहा असे व्यापारी व नागरिक एकत्र आले. त्यांनी थेट चिपळूण नगर परिषद कार्यालयावर धडक देत घंटानाद केला. येथील मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची भेट घेत पुराची माहिती नगर परिषदेला होती का, माहिती असूनही नागरिकांना सतर्क का केले नाही, कोणत्या धरणामधून पाणी सोडले गेले, त्यावेळी चिपळूणमध्ये किती मिलिमीटर पाऊस पडला, यापुढे अशी पूरस्थिती निर्माण झाल्यास नगर परिषदेची तयारी काय, कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित करत चिपळूण बचाव समितीने आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना सादर केले. त्यानंतर समिती पदाधिकाऱ्यांनी थेट पाटबंधारे कार्यालयावर धडक दिली. या ठिकाणीही घंटानाद करण्यात आला.

चिपळुणात आलेला महापूर हा मानवनिर्मित असल्याचा थेट आरोप उपस्थितांनी केला. त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न करत यामध्ये दोषी असणाऱ्यांची नावे समोर आणा. त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत पाठलाग सोडणार नाही, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला. तसेच भविष्यात अशा पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती उपाययोजना तयार आहे त्याची माहिती द्या, अशी मागणी करून निवेदन सादर केले.