शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

चिपळूणचे पाणीही आता महाग

By admin | Updated: July 20, 2014 22:46 IST

कठोर उपाय : अर्धा इंच पाणीपट्टीतही ३०० रुपये वाढ

उत्तमकुमार जाधव- चिपळूणदिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तुंबरोबर अन्य वस्तूंचे दर वाढत आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला महिन्याचे बजेट भागवताना उसनवार करावी लागत आहे. आता चिपळूण नगरपरिषद प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागातर्फे चालू वर्षात पाणीपट्टीत वाढ केली जाणार आहे. सर्वसाधारण नळधारकाला पूर्वीपेक्षा ३०० रुपये जास्त नळपट्टी भरावी लागणार आहे. नगरपरिषद प्रशासनातर्फे शहर परिसराला पाणी पुरवठा केला जातो. वीजनिर्मिती केल्यानंतर कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी खेर्डी येथील पंपहाऊसद्वारे उचलले जाते. हे पाणी परिसरातील उपनगर विभागाला पुरविले जाते. दिवसेंदिवस पाण्याची आवश्यकता वाढत आहे. त्यामुळे नळ जोडणीधारकांची संख्याही जास्त आहे. नगरपरिषद प्रशासनातर्फे गेल्या ७ वर्षांपूर्वी सुरु झालेली सुधारित नळपाणी योजना अद्याप कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे काही भागात कमी दाबानेही पाणीपुरवठा होत आहे. गोवळकोट येथे पंपहाऊस असून, या परिसरालाही गेल्या काही महिन्यापूर्वी गढूळ व मचूळ पाणी पिण्याची वेळ आली. सध्या पाऊस सुरु झाला असल्याने पाणी समस्या तेवढी जाणवत नाही. मात्र, नगर परिषदेच्या ३० जुलै २०१३ च्या मुख्य सभेमध्ये या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वाढवण्याचा ठराव करण्यात आला. त्या ठरावानुसार आता याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अर्धा इंची घरगुती पाणीपट्टी १ हजार २००, अर्धा इंची व्यापारी ३ हजार ५८०, पावणाइंची घरगुती ३०००, पावणाइंची व्यापारी ७ हजार ११८ रुपये अशी सुधारित नळपाणी पट्टी असून, पूर्वीचे दर ९००, १ हजार ६५०, २०००, ५००० असे होते. दरामध्ये वाढ करण्यात आली असून, नवीन पाणी दरानुसार पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. नगरपरिषद प्रशासनाचा जास्त खर्च हा पाणी पुरवठ्यावर होत आहे. हा खर्च नियंत्रणात आणण्याबाबत दरवर्षी होणाऱ्या अंदाजपत्रकाच्या बैठकीत चर्चा होते. मात्र, हा खर्च दरवर्षी वाढतच आहे. अत्यावश्यक सेवा असल्याने प्रशासनाला पाणी पुरवठा बंद करणे अशक्य आहे. मात्र, जे नळपट्टीधारक थकीत आहेत. त्यांना नोटीस पाठविण्यात आली असून, दिलेल्या मुदतीत नळपट्टी भरली नाही तर नळ कनेक्शन तोडण्याची कार्यवाहीही केली जाणार आहे. वाढीव नळपट्टीबाबत अद्यापही सर्वजण मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येत आहे. चिपळूण शहरासाठी अंदाजे १२ कोटीची सुधारित नळपाणी योजना राबविण्यात येणार असून, या योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. डिसेंबरअखेर योजना पूर्ण होईल, असे आश्वासन ठेकेदार चंद्रकांत सुवार यांनी दिले होते. पाण्याची वाढणारी मागणी लक्षात घेऊन काही नागरिकांनी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता ही योजना सुरु होण्यास अजूनही काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.