शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

चिपळूणचे पाणीही आता महाग

By admin | Updated: July 20, 2014 22:46 IST

कठोर उपाय : अर्धा इंच पाणीपट्टीतही ३०० रुपये वाढ

उत्तमकुमार जाधव- चिपळूणदिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तुंबरोबर अन्य वस्तूंचे दर वाढत आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला महिन्याचे बजेट भागवताना उसनवार करावी लागत आहे. आता चिपळूण नगरपरिषद प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागातर्फे चालू वर्षात पाणीपट्टीत वाढ केली जाणार आहे. सर्वसाधारण नळधारकाला पूर्वीपेक्षा ३०० रुपये जास्त नळपट्टी भरावी लागणार आहे. नगरपरिषद प्रशासनातर्फे शहर परिसराला पाणी पुरवठा केला जातो. वीजनिर्मिती केल्यानंतर कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी खेर्डी येथील पंपहाऊसद्वारे उचलले जाते. हे पाणी परिसरातील उपनगर विभागाला पुरविले जाते. दिवसेंदिवस पाण्याची आवश्यकता वाढत आहे. त्यामुळे नळ जोडणीधारकांची संख्याही जास्त आहे. नगरपरिषद प्रशासनातर्फे गेल्या ७ वर्षांपूर्वी सुरु झालेली सुधारित नळपाणी योजना अद्याप कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे काही भागात कमी दाबानेही पाणीपुरवठा होत आहे. गोवळकोट येथे पंपहाऊस असून, या परिसरालाही गेल्या काही महिन्यापूर्वी गढूळ व मचूळ पाणी पिण्याची वेळ आली. सध्या पाऊस सुरु झाला असल्याने पाणी समस्या तेवढी जाणवत नाही. मात्र, नगर परिषदेच्या ३० जुलै २०१३ च्या मुख्य सभेमध्ये या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वाढवण्याचा ठराव करण्यात आला. त्या ठरावानुसार आता याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अर्धा इंची घरगुती पाणीपट्टी १ हजार २००, अर्धा इंची व्यापारी ३ हजार ५८०, पावणाइंची घरगुती ३०००, पावणाइंची व्यापारी ७ हजार ११८ रुपये अशी सुधारित नळपाणी पट्टी असून, पूर्वीचे दर ९००, १ हजार ६५०, २०००, ५००० असे होते. दरामध्ये वाढ करण्यात आली असून, नवीन पाणी दरानुसार पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. नगरपरिषद प्रशासनाचा जास्त खर्च हा पाणी पुरवठ्यावर होत आहे. हा खर्च नियंत्रणात आणण्याबाबत दरवर्षी होणाऱ्या अंदाजपत्रकाच्या बैठकीत चर्चा होते. मात्र, हा खर्च दरवर्षी वाढतच आहे. अत्यावश्यक सेवा असल्याने प्रशासनाला पाणी पुरवठा बंद करणे अशक्य आहे. मात्र, जे नळपट्टीधारक थकीत आहेत. त्यांना नोटीस पाठविण्यात आली असून, दिलेल्या मुदतीत नळपट्टी भरली नाही तर नळ कनेक्शन तोडण्याची कार्यवाहीही केली जाणार आहे. वाढीव नळपट्टीबाबत अद्यापही सर्वजण मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येत आहे. चिपळूण शहरासाठी अंदाजे १२ कोटीची सुधारित नळपाणी योजना राबविण्यात येणार असून, या योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. डिसेंबरअखेर योजना पूर्ण होईल, असे आश्वासन ठेकेदार चंद्रकांत सुवार यांनी दिले होते. पाण्याची वाढणारी मागणी लक्षात घेऊन काही नागरिकांनी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता ही योजना सुरु होण्यास अजूनही काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.