शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी संकटामुळे चिपळूणला महाप्रलयाचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

यावर्षी जूनमध्ये पडलेल्या पावसाने काहीशी निराशा केली. जुलैच्या पंधरवड्यापर्यंत पावसाने म्हणावी तशी हजेरी न लावल्याने प्रतीक्षा करावी लागली. मात्र, ...

यावर्षी जूनमध्ये पडलेल्या पावसाने काहीशी निराशा केली. जुलैच्या पंधरवड्यापर्यंत पावसाने म्हणावी तशी हजेरी न लावल्याने प्रतीक्षा करावी लागली. मात्र, १५ जुलैपासून पावसाने हजेरी लावली तीच जोरदार. जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले. बळीराजाची रखडलेली शेतीची कामे आता मार्गी लागणार म्हणून तो खुश झाला. काही दिवसच झाले. हवामान खात्याने २० ते २२ जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची अतिवृष्टी काही ठिकाणी होण्याचा अंदाज व्यक्त केला आणि यावेळी तो अचूक ठरला. बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, रात्री अचानक जोर वाढला. कमी वेळात पावसाचे तांडव जणू सुरू झाले. चिपळूणला याचा तडाखा अधिक बसला. जणूकाही ढगफुटीसारखा पाऊस पडू लागल्याने चिपळूण आणि परिसरात पाणी भरू लागले.

समुद्र जवळ असल्याने पूर आला तरी त्याचा निचरा कमी वेळेत होतो. खाड्या आणि नद्यांमधून पाणी समुद्राला मिळते आणि पुराचे पाणी काही तासातच ओसरते. मात्र, बुुधवारी रात्री अतिमुसळधार पाऊस सुरू झाला. त्यातच पहाटे ३ वाजता भरती सुरु झाली. त्यामुळे खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी पाणी आत येऊ लागले. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास वाव मिळाला नाही आणि बहुतांश भागाला पुराच्या पाण्याने दणका दिला. गुरूवारी परिस्थिती भीषण झाली. चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदी, खेडमध्ये जगबुडी नदी, रत्नागिरी तालुक्यात सोमेश्वरची खाडी, काजळी नदी यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. मात्र, भरतीमुळे पावसाचे पाणी वाहून गेले नाही. त्यामुळे या सर्व ठिकाणी पूर आला. त्यातच कोळकेवाडी धरण पूर्णपणे वाहू लागले. भेगा पडू लागल्याने फुटण्याचा धोकाही होता. त्यामुळे त्यातून विसर्ग करणे गरजेचे होते. त्यामुळे तो विसर्गही वाशिष्ठी नदीत सुरू झाला. त्यामुळे तर वाशिष्ठी नदीचे रूपही भयावह झाले.

यावर्षीच्या पावसाने २००५चा उच्चांक मागे टाकला. कोयना येथे ६१० मिलिमीटर, नवजा येथे ७४६, महाबळेश्वर ५३५ आणि चिपळूण परिसरात ६०० मिलिमीटर पाऊस झाला. कोयना, नवजा आणि महाबळेश्वर येथे पाऊस पडला की, हे पाणी चिपळूणमध्ये जाते. त्यामुळे गुरूवारी चिपळूणमध्ये महाभयंकर स्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना महापूर आले आणि सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.

बुधवारी रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने धुमाकूळ घातला, भरतीचे पाणी आणि कोळकेवाडी धरण भरल्याने करावा लागणारा विसर्ग यामुळे चिपळूणला या तिहेरी संकटाचा सामना झेलत महापुराला सामोरे जावे लागले. त्यातच वाशिष्ठी नदीच्या नवीन पुलावर सुरू असलेल्या पिलरच्या बांधकामामुळे पाण्याला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पहिल्यांदाच मुंबई - गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने वाहतूक ठप्प झाली. चिपळूण शहर आणि परिसराला या तिहेरी कारणामुळे महाप्रलयाचा सामना करावा लागला.