शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

चिपळूण देशातील सर्वांत जास्त प्रदूषित शहर

By admin | Updated: June 21, 2017 01:06 IST

हुसेन दलवाई : अहवाल येत्या अधिवेशनात राज्यसभेपुढे ठेवणार, पत्रकार परिषदेतील माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : चिपळूण हे देशातील सर्वांत जास्त प्रदूषित शहर असल्याचा गौप्यस्फोट खासदार हुसेन दलवाई यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत करताना याबाबत माझ्याकडे असलेला अहवाल येत्या अधिवेशनात राज्यसभेपुढे ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी पत्रकार परिषदेला माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे, अ‍ॅड. जीवन रेळेकर, प्रकाश पाथरे आदी उपस्थित होते. खासदार दलवाई म्हणाले की, २० वर्षांपूर्वी सुरु झालेल्या कारखानदारीच्या माध्यमातून खाडी व नदीपात्रात सोडण्यात आलेल्या रासायनिक दूषित पाण्याने संपूर्ण वाशिष्ठी पात्र प्रदूषित झाले आहे. त्याचे परिणाम परिसरातील नैसर्गिक पाणवठ्यावर झाले आहेत. विहिरी व तळ्यांचे पाणी दूषित झाले आहे. कारखानदारांचे रासायनिक दूषित पाणी शुध्द करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) उभारण्यात आला. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. या प्रकल्पाचे अत्याधुनिकरण व नूतनीकरणाचे काम काँग्रेस सरकारच्या काळात मार्गी लागले. परंतु, या प्रकल्पाच्या उभारणीसह नियोजन व खर्च यात प्रचंड गैरव्यवहार झाल्याने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हा निर्जीव व कमकुवत ठरला आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे याविषयात लक्ष वेधले. मात्र, त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही, हे दुर्दैव आहे. तरीही पुन्हा आपण कदम यांना लेखी पत्र देऊन या प्रक्रिया केंद्राबाबत स्वतंत्र कमिटी नेमून संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. काही कारखान्यांतील त्यांचे स्वत:चे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही संशयास्पद आहेत. असे कारखानदार या प्रकल्पाच्या माध्यमातून रासायनिक प्रकल्पात पूर्ण दूषित पाणी थेट सोडतात. तसेच रासायनिक कचरा छुप्या पद्धतीने खड्डा करुन मातीत टाकतात, तर कशेडी, भोस्ते व अन्य परिसरात निर्मनुष्य ठिकाणी रासायनिक प्रदूषित पाणी व कचरा छुप्या पद्धतीने टाकून देण्याचे काम कंपन्यांकडून सुरु आहे. हे सर्व थांबवण्यासाठी सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प योग्य क्षमतेचा व अत्याधुनिक स्वरुपात कार्यान्वित होणे गरजेचे आहे. भविष्यात कोकणात रासायनिक कारखानदारी येऊ नये. त्या बदल्यात प्रदूषण न करणारे कारखाने उभे राहावेत, अशी मागणी दलवाई यांनी केली. खासदार दलवाई यांनी अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्यावर टीका करताना सांगितले की, सातवेळा शिवसेनेच्या ताकदीवर खासदार होणारे गीते केंद्रीय मंत्री झाले. मात्र, त्यांनी कोकणसाठी काय केले, हा एक संशोधनाचा विषय आहे. ज्या कोकणच्या माध्यमातून शिवसेना नेहमीच सत्तेत येते, त्या कोकणसाठी सेना व त्यांच्या नेत्यांनी आजपर्यंत काय दिले, हे कोकणातील जनतेला सांगावे. कोकणाबाबत भाजपकडून आमची कोणतीही अपेक्षा नाही. कोकणात कारखानदारी वाढली, प्रदूषण वाढले. मात्र, रोजगार वाढला नाही. शेतकरी व मच्छिमार उद्ध्वस्त झाला, ही बाब गंभीर आहे. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीचा सर्व दृष्टीने विकास केल्यास पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकते. मात्र, सांडपाण्याने दूषित झालेल्या खाडी व नदीपात्राला प्रदूषणापासून मुक्त करणे गरजेचे आहे. यावेळी दलवाई यांनी लोटे वसाहतीतील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांची नावे जाहीर केली. त्यामध्ये घरडा, रिव्हरसाईड, पुष्कर, ए. बी. मौर्या, एस. आर. ड्रग्ज, सुप्रिया, इंडियन आॅक्सलेट, रॅलिज इंडिया, बहार अ‍ॅग्रो, डाऊ, साफयिस्ट, विनती कंपन्यांचा समावेश आहे.