शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

चिपळूण बाजारपूल मागी

By admin | Updated: February 6, 2015 00:40 IST

नगर परिषद : पूल जोडणार विकासाचा सेर्तू

उत्तमकुमार जाधव - चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवर बांधण्यात येणाऱ्या, बाजारपुलाच्या कामाला गती देण्यात आली असून, हे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत संबंधित ठेकेदाराला देण्यात आली आहे. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर हा पूल उभा होणार असल्याने, शहराच्या विकासात या पुलामुळे विशेष भर पडणार आहे. शहरातील नाईक कंपनीसमोरील वाशिष्ठी नदीवर १९६०-६१च्या दरम्यान पूल बांधण्यात आला होता. गोवळकोट, पेठमाप आदी भागातील नागरिकांच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे. २००५मध्ये आलेल्या महापुरामुळे या पुलाला धोका निर्माण झाला. तत्कालीन नगराध्यक्ष उषा लवेकर यांच्या कारकीर्दीत तत्कालीन नगर विकास मंत्री सुनील तटकरे यांच्याकडे पुलाच्या कामाबाबत २००६मध्ये पत्रव्यवहार करण्यात आला. तत्कालीन नगराध्यक्ष हेमलता बुरटे यांनी २००८ मध्ये बाजारपूल होण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे पुलाच्या बांधकामासाठी निधी मिळावा, यासाठी माजी आमदार रमेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रव्यवहार सुरु केला. तत्कालीन नगराध्यक्ष अजमल पटेल यांच्या कारकीर्दीत २ सप्टेंबर २०१०मध्ये या पुलाचे बांधकाम करण्यासाठी जीवन प्राधिकरण विभाग यांच्याकडे ठराव प्रारित करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर ७ जानेवारी २०१० मध्ये पुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. मात्र, हे काम २ वर्ष रखडल्याने या भागातील रहिवाशांनीही पुलाचे काम त्वरित सुरु करण्याबाबत नगर परिषदेवर धडक मोर्चाही दिला होता. त्यानुसार, १९ जुलै २०१२ रोजी नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सभेत अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. आर्किटेक्ट आगरकर यांच्याकडून या पुलाच्या बांधकामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून घेण्यात आले. त्यानुसार, ७ जुलै २०१३ रोजी पुलाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. त्यानुसार, ९ जून २०१४ रोजी या पुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ६ कोटी ९८ लाख २५ हजार ३७५ची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार, १३ जून २०१४ रोजी या पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सध्या नदीमध्ये ३० फूट अंतरावर ६ पाईल्स टाकण्यात आले आहेत. पुढील काही दिवसात आणखी ६ पाईल्स टाकल्या जाणार आहेत. एकूण २४ पाईल्स टाकल्यानंतर उर्वरित काम हाती घेतले जाणार आहे. एस. डी. इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबई या कंपनीस हे काम देण्यात आले आहे. सप्टेंबर २०१५ अखेर या पुलाचे काम करण्याची मुदत ठेकेदारास देण्यात आली असून, मुदतीत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ९० मीटर लांबीचा व ८.२५ मीटर रुंदीचा हा पूल उभा होणार असल्याने, शहराच्या वैभवात या पुलामुळे भर पडणार आहे. तांत्रिक अडचणी दूर करुन मुदतीत पूल रहिवाशांसाठी खुला करण्याच्यासाठी कामाला गती देण्यात आली आहे.अठरा महिन्यांत काम पूर्ण करणारवाशिष्ठी नदीत ३० फूटाचे ६ पाईल्स (खांब) टाकण्याचे अधिकांश काम पूर्ण.२४ पाईल्स टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, उर्वरित काम सुरु होणार. येत्या आठवड्यात आणखी ६ पाईल्स. ६ कोटी ९८ लाख २५ हजार ३७५ रुपयांचे अंदाजपत्रक. कामाची मुदत १८ महिन्यांची.