शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

चिपळूण बाजारपूल मागी

By admin | Updated: February 6, 2015 00:40 IST

नगर परिषद : पूल जोडणार विकासाचा सेर्तू

उत्तमकुमार जाधव - चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवर बांधण्यात येणाऱ्या, बाजारपुलाच्या कामाला गती देण्यात आली असून, हे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत संबंधित ठेकेदाराला देण्यात आली आहे. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर हा पूल उभा होणार असल्याने, शहराच्या विकासात या पुलामुळे विशेष भर पडणार आहे. शहरातील नाईक कंपनीसमोरील वाशिष्ठी नदीवर १९६०-६१च्या दरम्यान पूल बांधण्यात आला होता. गोवळकोट, पेठमाप आदी भागातील नागरिकांच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे. २००५मध्ये आलेल्या महापुरामुळे या पुलाला धोका निर्माण झाला. तत्कालीन नगराध्यक्ष उषा लवेकर यांच्या कारकीर्दीत तत्कालीन नगर विकास मंत्री सुनील तटकरे यांच्याकडे पुलाच्या कामाबाबत २००६मध्ये पत्रव्यवहार करण्यात आला. तत्कालीन नगराध्यक्ष हेमलता बुरटे यांनी २००८ मध्ये बाजारपूल होण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे पुलाच्या बांधकामासाठी निधी मिळावा, यासाठी माजी आमदार रमेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रव्यवहार सुरु केला. तत्कालीन नगराध्यक्ष अजमल पटेल यांच्या कारकीर्दीत २ सप्टेंबर २०१०मध्ये या पुलाचे बांधकाम करण्यासाठी जीवन प्राधिकरण विभाग यांच्याकडे ठराव प्रारित करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर ७ जानेवारी २०१० मध्ये पुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. मात्र, हे काम २ वर्ष रखडल्याने या भागातील रहिवाशांनीही पुलाचे काम त्वरित सुरु करण्याबाबत नगर परिषदेवर धडक मोर्चाही दिला होता. त्यानुसार, १९ जुलै २०१२ रोजी नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सभेत अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. आर्किटेक्ट आगरकर यांच्याकडून या पुलाच्या बांधकामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून घेण्यात आले. त्यानुसार, ७ जुलै २०१३ रोजी पुलाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. त्यानुसार, ९ जून २०१४ रोजी या पुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ६ कोटी ९८ लाख २५ हजार ३७५ची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार, १३ जून २०१४ रोजी या पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सध्या नदीमध्ये ३० फूट अंतरावर ६ पाईल्स टाकण्यात आले आहेत. पुढील काही दिवसात आणखी ६ पाईल्स टाकल्या जाणार आहेत. एकूण २४ पाईल्स टाकल्यानंतर उर्वरित काम हाती घेतले जाणार आहे. एस. डी. इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबई या कंपनीस हे काम देण्यात आले आहे. सप्टेंबर २०१५ अखेर या पुलाचे काम करण्याची मुदत ठेकेदारास देण्यात आली असून, मुदतीत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ९० मीटर लांबीचा व ८.२५ मीटर रुंदीचा हा पूल उभा होणार असल्याने, शहराच्या वैभवात या पुलामुळे भर पडणार आहे. तांत्रिक अडचणी दूर करुन मुदतीत पूल रहिवाशांसाठी खुला करण्याच्यासाठी कामाला गती देण्यात आली आहे.अठरा महिन्यांत काम पूर्ण करणारवाशिष्ठी नदीत ३० फूटाचे ६ पाईल्स (खांब) टाकण्याचे अधिकांश काम पूर्ण.२४ पाईल्स टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, उर्वरित काम सुरु होणार. येत्या आठवड्यात आणखी ६ पाईल्स. ६ कोटी ९८ लाख २५ हजार ३७५ रुपयांचे अंदाजपत्रक. कामाची मुदत १८ महिन्यांची.