शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

चिपळूण, राजापूरला उत्पन्नवाढीची संधी

By admin | Updated: July 23, 2014 21:54 IST

एस. टी. महामंडळ : ‘आगार बंद’चा निर्णय स्थगित

रत्नागिरी : उत्पन्न कमी असणारे एस. टी. आगार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तूर्त स्थगिती दिली असल्यामुळे राजापूर व चिपळूण या दोन आगारांना दिलासा मिळाला आहे. शिवाय उत्पन्न वाढीची संधीही त्यांना उपलब्ध झाली आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरे यांनी भेट देऊन रत्नागिरी विभागीय कार्यालयातील कामकाजाची पाहणी केली. राज्यातील एकूण ५८ तोट्यात चालणारे आगार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या त्यांना स्थगिती देण्यात आली असली तरी उत्पन्न वाढणे गरजेचे आहे. राजापूर, चिपळुणात खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे येथील एस. टी. आगारांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.एस. टी.चे अधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीतून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. गाड्या वेळेवर सोडणे, स्वच्छ गाड्या, नम्र वागणूक या त्रिसूत्रीचे पालन केल्यास एस. टी. निश्चितच फायद्यात येईल, असे तोरे यांनी सांगितले.शासनाकडून आतापर्यंत १७.५० टक्के कर एस. टी.कडून वसूल केला जात होता. आता कर कपातीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापुढे १० टक्के कर वसुली करण्यात येईल, त्यामुळे एस. टी. आता काही प्रमाणात फायद्यात येणार आहे. राजापूर, चिपळूण या तोट्यातील आगारांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.रत्नागिरी बसस्थानक बीओटी तत्त्वावर बांधण्यात येणार असून, लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे. एस. टी.तर्फे गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबईतून येणाऱ्या गाड्यांचे आरक्षण सुरू आहे. मात्र, परतीला जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण किमान महिनाभर आधीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे तोरे यांनी सांगितले.कामात हलगर्जीपणा करणाऱ्या, बेशिस्त वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असा आदेश तोरे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)-राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरे यांनी रत्नागिरी विभागीय कार्यालयातील कामकाजाची केली पाहणी.-राज्यातील एकूण ५८ तोट्यात असणारे एस. टी. आगार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.-राजापूर, चिपळुणात खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे आगाराच्या उत्पन्नावर परिणाम.-शासनातर्फे एस. टी.कडून आतापर्यंत १७.५० टक्के करवसुली.-कर कपातीचा प्रशासनाचा निर्णय.-परतीला जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण किमान महिनाभर आधीपासून सुरू करण्याचा निर्णय.