शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकली अपहरणाचा तपास थंडावला

By admin | Updated: March 28, 2016 00:19 IST

पोलिसांसमोर आव्हान : अपहरणकर्ते दाम्पत्य ठिकाण बदलत असल्याने अडथळा

लांजा : रात्री आईच्या कुशीत झोपी गेलेल्या सहा महिन्यांच्या तान्हुल्या मुलीचे अपहरण करणारे जोडपे सातत्याने आपले ठिकाण बदलत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या जोडप्याचा शोध घेण्यात लांजा पोलीस अपयशी ठरले आहेत.सांगली जिल्ह्यातील अजित दस्तगीर जमादार हा ट्रकचालक आपल्या दोन मुली व पत्नीसह आंजणारी येथील शिंदे यांच्या चाळीमध्ये भाड्याने राहात होता. शेजारी राहणारी पूजा, तिचा नवरा प्रसाद, पूजाची आई संगीता तसेच विश्वास नामक एक व्यक्ती यांच्या आधीपासून ४ ते ५ दिवसांपूर्वी राहावयास आली होती. सहा महिन्यांची स्नेहल गोंडस असल्याने तिला खेळवण्यासाठी हे जोडपे घेऊन जात असे. पूजा हिला मूलबाळ नसल्याने पूजाची आई संगीता हिने अजित यांची पत्नी सारिका हिला तुझी लहान मुलगी आम्हाला देशील का? अशी विचारणाही केली असल्याचे तपासात स्पष्ट झाले.दिनांक २३ मार्च रोजी प्रसादने रात्री मद्यपान करून जमादार यांच्या खोलीच्या दरवाजावर लाथा मारल्याने त्यांच्यात भांडण झाले होते. शिमगोत्सव असल्याने चालक मिळत नव्हते. अजित हा बदली चालक म्हणून गोवा येथे ट्रक घेऊन गेला होता. खोलीमध्ये सारीका, तिची अडीच वर्षांची मुलगी आणि सहा महिन्यांची स्नेहल हिला घेऊन ती झोपी गेली होती. रात्री १ ते ४ दरम्याने प्रसाद व पूजा यांनी स्नेहल हिचे अपहरण केल्याचे सकाळी सारीकाच्या लक्षात आले. तिने आपल्या पतीला घडल्या प्रकाराची माहिती दिली. आंजणारी येथे आल्यानंतर अजित याने प्रसादला फोन केला. त्यावेळी मुलगी माझ्याकडे आहे. दुपारपर्यंत घरी आणून सोडतो, असे सांगितले. मात्र, सायंकाळपर्यंत मुलगी परत न आल्याने सारीका जमादार हिने लांजा पोलिसात अपहरणाची फिर्याद दिली. अपहरण केल्यानंतर पूजा व प्रसाद या जोडप्याने आंजणारी येथील आपली खोली सोडली. त्याच्या समवेत पूजाची आई संगीता व विश्वास हीदेखील असावेत, असा अंदाज लांजा पोलिसांनी वर्तविला आहे.गेल्या चार दिवसांपासून लांजा पोलीस पूजा व प्रसाद या जोडप्याचा शोध घेण्यासाठी प्रसाद याच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन तपासत आहेत. प्रसाद चार दिवसांपासून आपल्या राहण्याच्या जागा सतत बदलत असल्याने लांजा पोलीसदेखील चिंतेत सापडले आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर या ठिकाणचे प्रसादचे लोकेशन दिसत आहे. मात्र, संशयित आरोपींचे फोटो सध्या कोणाकडेही उपलब्ध नसल्याने शोध घेणे अवघड बनले असल्याचे पोलिसांनी सांगितले.या सहा महिन्यांच्या तान्हुल्या मुलीचे अपहरण नेमके कशासाठी करण्यात आले, कोणता अंधश्रद्धेचा भाग तर नसावा ना, अशी शंका आता वाटू लागली आहे. लांजा पोलीस अद्यापही या जोडप्याचा कसून शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)अपहरणकर्त्या जोडप्याचा विविध अंदाजाने शोध घेतला जात आहे. एकीकडे टॉवरचे ठिकाण जाणून घेण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु त्या ठिकाणापर्यंत पोलीस पोहोचण्यापूर्वीच दाम्पत्य ते ठिकाण बदलत असल्याने पोलिसांसमोर अपहरणकर्त्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.अपहरणकर्त्या दाम्पत्याचे छायाचित्रही नसल्याने तपास थंडावला.अपहरणकर्ते वारंवार ठिकाण बदलत असल्याने मोबाईल टॉवरचे नेमके ठिकाण सापडेना.गेल्या चार दिवसात कोल्हापूर, रायगड येथे अपहरणकर्त्यांचा वावर.दाम्पत्याची हुशारीपोलिसांना मोबाईलवरून टॉवरचे नेमके ठिकाण मिळू नये, यासाठीच दाम्पत्य सावधगिरीने ठिकाण वारंवार बदलत असल्याचा पोलिसांचा कयास आहे.