शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

चिमुकली अपहरणाचा तपास थंडावला

By admin | Updated: March 28, 2016 00:19 IST

पोलिसांसमोर आव्हान : अपहरणकर्ते दाम्पत्य ठिकाण बदलत असल्याने अडथळा

लांजा : रात्री आईच्या कुशीत झोपी गेलेल्या सहा महिन्यांच्या तान्हुल्या मुलीचे अपहरण करणारे जोडपे सातत्याने आपले ठिकाण बदलत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या जोडप्याचा शोध घेण्यात लांजा पोलीस अपयशी ठरले आहेत.सांगली जिल्ह्यातील अजित दस्तगीर जमादार हा ट्रकचालक आपल्या दोन मुली व पत्नीसह आंजणारी येथील शिंदे यांच्या चाळीमध्ये भाड्याने राहात होता. शेजारी राहणारी पूजा, तिचा नवरा प्रसाद, पूजाची आई संगीता तसेच विश्वास नामक एक व्यक्ती यांच्या आधीपासून ४ ते ५ दिवसांपूर्वी राहावयास आली होती. सहा महिन्यांची स्नेहल गोंडस असल्याने तिला खेळवण्यासाठी हे जोडपे घेऊन जात असे. पूजा हिला मूलबाळ नसल्याने पूजाची आई संगीता हिने अजित यांची पत्नी सारिका हिला तुझी लहान मुलगी आम्हाला देशील का? अशी विचारणाही केली असल्याचे तपासात स्पष्ट झाले.दिनांक २३ मार्च रोजी प्रसादने रात्री मद्यपान करून जमादार यांच्या खोलीच्या दरवाजावर लाथा मारल्याने त्यांच्यात भांडण झाले होते. शिमगोत्सव असल्याने चालक मिळत नव्हते. अजित हा बदली चालक म्हणून गोवा येथे ट्रक घेऊन गेला होता. खोलीमध्ये सारीका, तिची अडीच वर्षांची मुलगी आणि सहा महिन्यांची स्नेहल हिला घेऊन ती झोपी गेली होती. रात्री १ ते ४ दरम्याने प्रसाद व पूजा यांनी स्नेहल हिचे अपहरण केल्याचे सकाळी सारीकाच्या लक्षात आले. तिने आपल्या पतीला घडल्या प्रकाराची माहिती दिली. आंजणारी येथे आल्यानंतर अजित याने प्रसादला फोन केला. त्यावेळी मुलगी माझ्याकडे आहे. दुपारपर्यंत घरी आणून सोडतो, असे सांगितले. मात्र, सायंकाळपर्यंत मुलगी परत न आल्याने सारीका जमादार हिने लांजा पोलिसात अपहरणाची फिर्याद दिली. अपहरण केल्यानंतर पूजा व प्रसाद या जोडप्याने आंजणारी येथील आपली खोली सोडली. त्याच्या समवेत पूजाची आई संगीता व विश्वास हीदेखील असावेत, असा अंदाज लांजा पोलिसांनी वर्तविला आहे.गेल्या चार दिवसांपासून लांजा पोलीस पूजा व प्रसाद या जोडप्याचा शोध घेण्यासाठी प्रसाद याच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन तपासत आहेत. प्रसाद चार दिवसांपासून आपल्या राहण्याच्या जागा सतत बदलत असल्याने लांजा पोलीसदेखील चिंतेत सापडले आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर या ठिकाणचे प्रसादचे लोकेशन दिसत आहे. मात्र, संशयित आरोपींचे फोटो सध्या कोणाकडेही उपलब्ध नसल्याने शोध घेणे अवघड बनले असल्याचे पोलिसांनी सांगितले.या सहा महिन्यांच्या तान्हुल्या मुलीचे अपहरण नेमके कशासाठी करण्यात आले, कोणता अंधश्रद्धेचा भाग तर नसावा ना, अशी शंका आता वाटू लागली आहे. लांजा पोलीस अद्यापही या जोडप्याचा कसून शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)अपहरणकर्त्या जोडप्याचा विविध अंदाजाने शोध घेतला जात आहे. एकीकडे टॉवरचे ठिकाण जाणून घेण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु त्या ठिकाणापर्यंत पोलीस पोहोचण्यापूर्वीच दाम्पत्य ते ठिकाण बदलत असल्याने पोलिसांसमोर अपहरणकर्त्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.अपहरणकर्त्या दाम्पत्याचे छायाचित्रही नसल्याने तपास थंडावला.अपहरणकर्ते वारंवार ठिकाण बदलत असल्याने मोबाईल टॉवरचे नेमके ठिकाण सापडेना.गेल्या चार दिवसात कोल्हापूर, रायगड येथे अपहरणकर्त्यांचा वावर.दाम्पत्याची हुशारीपोलिसांना मोबाईलवरून टॉवरचे नेमके ठिकाण मिळू नये, यासाठीच दाम्पत्य सावधगिरीने ठिकाण वारंवार बदलत असल्याचा पोलिसांचा कयास आहे.