शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकली अपहरणाचा तपास थंडावला

By admin | Updated: March 28, 2016 00:19 IST

पोलिसांसमोर आव्हान : अपहरणकर्ते दाम्पत्य ठिकाण बदलत असल्याने अडथळा

लांजा : रात्री आईच्या कुशीत झोपी गेलेल्या सहा महिन्यांच्या तान्हुल्या मुलीचे अपहरण करणारे जोडपे सातत्याने आपले ठिकाण बदलत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या जोडप्याचा शोध घेण्यात लांजा पोलीस अपयशी ठरले आहेत.सांगली जिल्ह्यातील अजित दस्तगीर जमादार हा ट्रकचालक आपल्या दोन मुली व पत्नीसह आंजणारी येथील शिंदे यांच्या चाळीमध्ये भाड्याने राहात होता. शेजारी राहणारी पूजा, तिचा नवरा प्रसाद, पूजाची आई संगीता तसेच विश्वास नामक एक व्यक्ती यांच्या आधीपासून ४ ते ५ दिवसांपूर्वी राहावयास आली होती. सहा महिन्यांची स्नेहल गोंडस असल्याने तिला खेळवण्यासाठी हे जोडपे घेऊन जात असे. पूजा हिला मूलबाळ नसल्याने पूजाची आई संगीता हिने अजित यांची पत्नी सारिका हिला तुझी लहान मुलगी आम्हाला देशील का? अशी विचारणाही केली असल्याचे तपासात स्पष्ट झाले.दिनांक २३ मार्च रोजी प्रसादने रात्री मद्यपान करून जमादार यांच्या खोलीच्या दरवाजावर लाथा मारल्याने त्यांच्यात भांडण झाले होते. शिमगोत्सव असल्याने चालक मिळत नव्हते. अजित हा बदली चालक म्हणून गोवा येथे ट्रक घेऊन गेला होता. खोलीमध्ये सारीका, तिची अडीच वर्षांची मुलगी आणि सहा महिन्यांची स्नेहल हिला घेऊन ती झोपी गेली होती. रात्री १ ते ४ दरम्याने प्रसाद व पूजा यांनी स्नेहल हिचे अपहरण केल्याचे सकाळी सारीकाच्या लक्षात आले. तिने आपल्या पतीला घडल्या प्रकाराची माहिती दिली. आंजणारी येथे आल्यानंतर अजित याने प्रसादला फोन केला. त्यावेळी मुलगी माझ्याकडे आहे. दुपारपर्यंत घरी आणून सोडतो, असे सांगितले. मात्र, सायंकाळपर्यंत मुलगी परत न आल्याने सारीका जमादार हिने लांजा पोलिसात अपहरणाची फिर्याद दिली. अपहरण केल्यानंतर पूजा व प्रसाद या जोडप्याने आंजणारी येथील आपली खोली सोडली. त्याच्या समवेत पूजाची आई संगीता व विश्वास हीदेखील असावेत, असा अंदाज लांजा पोलिसांनी वर्तविला आहे.गेल्या चार दिवसांपासून लांजा पोलीस पूजा व प्रसाद या जोडप्याचा शोध घेण्यासाठी प्रसाद याच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन तपासत आहेत. प्रसाद चार दिवसांपासून आपल्या राहण्याच्या जागा सतत बदलत असल्याने लांजा पोलीसदेखील चिंतेत सापडले आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर या ठिकाणचे प्रसादचे लोकेशन दिसत आहे. मात्र, संशयित आरोपींचे फोटो सध्या कोणाकडेही उपलब्ध नसल्याने शोध घेणे अवघड बनले असल्याचे पोलिसांनी सांगितले.या सहा महिन्यांच्या तान्हुल्या मुलीचे अपहरण नेमके कशासाठी करण्यात आले, कोणता अंधश्रद्धेचा भाग तर नसावा ना, अशी शंका आता वाटू लागली आहे. लांजा पोलीस अद्यापही या जोडप्याचा कसून शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)अपहरणकर्त्या जोडप्याचा विविध अंदाजाने शोध घेतला जात आहे. एकीकडे टॉवरचे ठिकाण जाणून घेण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु त्या ठिकाणापर्यंत पोलीस पोहोचण्यापूर्वीच दाम्पत्य ते ठिकाण बदलत असल्याने पोलिसांसमोर अपहरणकर्त्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.अपहरणकर्त्या दाम्पत्याचे छायाचित्रही नसल्याने तपास थंडावला.अपहरणकर्ते वारंवार ठिकाण बदलत असल्याने मोबाईल टॉवरचे नेमके ठिकाण सापडेना.गेल्या चार दिवसात कोल्हापूर, रायगड येथे अपहरणकर्त्यांचा वावर.दाम्पत्याची हुशारीपोलिसांना मोबाईलवरून टॉवरचे नेमके ठिकाण मिळू नये, यासाठीच दाम्पत्य सावधगिरीने ठिकाण वारंवार बदलत असल्याचा पोलिसांचा कयास आहे.