शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

जुन्या पुस्तकांवर मुले करत आहेत अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाईन अध्यापनासाठी परवानगी दिली आहे. शिक्षण ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाईन अध्यापनासाठी परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील एक लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पाठ्यपुस्तकांची मागणी ‘बालभारती’कडे करण्यात आली होती. मात्र, अद्याप पाठ्यपुस्तके प्राप्त न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्याच पुस्तकांद्वारे अध्यापन करावे लागत आहे.

एप्रिलमध्ये कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने मुलांना सरसकट पास करण्यात आले. त्याचवेळी गतवर्षीची पुस्तके विद्यार्थ्यांकडून संकलित करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके संकलित केली होती.

शाळा दि.१५ जुलैपासून सुरू झाल्या असल्या तरी कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. मात्र, अध्यापन करताना मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वीच पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली आहेत. त्यामुळे मुले जुनीच पुस्तके वापरत आहेत. शाळेच्या सूचनेचे पालन करत पालकांनी दिलेल्या शंभर टक्के प्रतिसादामुळे मुलांचे नुकसान झाले नाही. पहिली ते आठवीच्या ऊर्दू माध्यम व मराठी माध्यमाच्या १ ते ५ वर्गांना स्वाध्याय पुस्तिका दिल्या आहेत.

n जुन्या पुस्तकांचे संकलन करून शिक्षकांनी केले वितरण

n पहिली ते पाचवीच्या मराठी माध्यमातील मुलांना स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध

n पहिली ते आठवीपर्यत ऊर्दू माध्यमांच्या मुलांना स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण

n सहावी ते आठवीपर्यंत मराठी माध्यमांच्या मुलांसाठी स्वाध्याय पुस्तिकांचे काम सुरू.

दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पुस्तके दिली जातात. गेल्यावर्षी शाळा भरल्या नव्हत्या परंतु नवीन पुस्तके मिळाली होती. त्यामुळे गुरुजींनी दिलेल्या जुन्या पुस्तकांवरच अभ्यास करत आहोत.

- सीया माेरे, विद्यार्थिनी, लांजा

गेल्यावर्षी परीक्षा झाल्याच नाहीत, परंतु पुस्तके सरांनी शाळेत जमा करून घेतली. शाळा सुरू होण्यापूर्वी सरांनी पुस्तके पाठवून दिली. मात्र, जुनीच पुस्तके आहेत. नवीन पुस्तके प्राप्त झाल्यावर देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

- दुर्वेश बागकर, विद्यार्थी, रत्नागिरी

‘बालभारती’कडे एक लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. नवीन पुस्तके प्राप्त होताच विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहेत. मात्र, तोपर्यंत मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी जुनी पुस्तके वितरीत करण्यात आली आहेत.

- नीशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी.