शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जुन्या पुस्तकांवर मुले करत आहेत अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाईन अध्यापनासाठी परवानगी दिली आहे. शिक्षण ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाईन अध्यापनासाठी परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील एक लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पाठ्यपुस्तकांची मागणी ‘बालभारती’कडे करण्यात आली होती. मात्र, अद्याप पाठ्यपुस्तके प्राप्त न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्याच पुस्तकांद्वारे अध्यापन करावे लागत आहे.

एप्रिलमध्ये कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने मुलांना सरसकट पास करण्यात आले. त्याचवेळी गतवर्षीची पुस्तके विद्यार्थ्यांकडून संकलित करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके संकलित केली होती.

शाळा दि.१५ जुलैपासून सुरू झाल्या असल्या तरी कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. मात्र, अध्यापन करताना मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वीच पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली आहेत. त्यामुळे मुले जुनीच पुस्तके वापरत आहेत. शाळेच्या सूचनेचे पालन करत पालकांनी दिलेल्या शंभर टक्के प्रतिसादामुळे मुलांचे नुकसान झाले नाही. पहिली ते आठवीच्या ऊर्दू माध्यम व मराठी माध्यमाच्या १ ते ५ वर्गांना स्वाध्याय पुस्तिका दिल्या आहेत.

n जुन्या पुस्तकांचे संकलन करून शिक्षकांनी केले वितरण

n पहिली ते पाचवीच्या मराठी माध्यमातील मुलांना स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध

n पहिली ते आठवीपर्यत ऊर्दू माध्यमांच्या मुलांना स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण

n सहावी ते आठवीपर्यंत मराठी माध्यमांच्या मुलांसाठी स्वाध्याय पुस्तिकांचे काम सुरू.

दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पुस्तके दिली जातात. गेल्यावर्षी शाळा भरल्या नव्हत्या परंतु नवीन पुस्तके मिळाली होती. त्यामुळे गुरुजींनी दिलेल्या जुन्या पुस्तकांवरच अभ्यास करत आहोत.

- सीया माेरे, विद्यार्थिनी, लांजा

गेल्यावर्षी परीक्षा झाल्याच नाहीत, परंतु पुस्तके सरांनी शाळेत जमा करून घेतली. शाळा सुरू होण्यापूर्वी सरांनी पुस्तके पाठवून दिली. मात्र, जुनीच पुस्तके आहेत. नवीन पुस्तके प्राप्त झाल्यावर देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

- दुर्वेश बागकर, विद्यार्थी, रत्नागिरी

‘बालभारती’कडे एक लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. नवीन पुस्तके प्राप्त होताच विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहेत. मात्र, तोपर्यंत मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी जुनी पुस्तके वितरीत करण्यात आली आहेत.

- नीशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी.