शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पुस्तकांवर मुले करत आहेत अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाईन अध्यापनासाठी परवानगी दिली आहे. शिक्षण ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाईन अध्यापनासाठी परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील एक लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पाठ्यपुस्तकांची मागणी ‘बालभारती’कडे करण्यात आली होती. मात्र, अद्याप पाठ्यपुस्तके प्राप्त न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्याच पुस्तकांद्वारे अध्यापन करावे लागत आहे.

एप्रिलमध्ये कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्याने मुलांना सरसकट पास करण्यात आले. त्याचवेळी गतवर्षीची पुस्तके विद्यार्थ्यांकडून संकलित करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके संकलित केली होती.

शाळा दि.१५ जुलैपासून सुरू झाल्या असल्या तरी कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. मात्र, अध्यापन करताना मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वीच पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली आहेत. त्यामुळे मुले जुनीच पुस्तके वापरत आहेत. शाळेच्या सूचनेचे पालन करत पालकांनी दिलेल्या शंभर टक्के प्रतिसादामुळे मुलांचे नुकसान झाले नाही. पहिली ते आठवीच्या ऊर्दू माध्यम व मराठी माध्यमाच्या १ ते ५ वर्गांना स्वाध्याय पुस्तिका दिल्या आहेत.

n जुन्या पुस्तकांचे संकलन करून शिक्षकांनी केले वितरण

n पहिली ते पाचवीच्या मराठी माध्यमातील मुलांना स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध

n पहिली ते आठवीपर्यत ऊर्दू माध्यमांच्या मुलांना स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण

n सहावी ते आठवीपर्यंत मराठी माध्यमांच्या मुलांसाठी स्वाध्याय पुस्तिकांचे काम सुरू.

दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पुस्तके दिली जातात. गेल्यावर्षी शाळा भरल्या नव्हत्या परंतु नवीन पुस्तके मिळाली होती. त्यामुळे गुरुजींनी दिलेल्या जुन्या पुस्तकांवरच अभ्यास करत आहोत.

- सीया माेरे, विद्यार्थिनी, लांजा

गेल्यावर्षी परीक्षा झाल्याच नाहीत, परंतु पुस्तके सरांनी शाळेत जमा करून घेतली. शाळा सुरू होण्यापूर्वी सरांनी पुस्तके पाठवून दिली. मात्र, जुनीच पुस्तके आहेत. नवीन पुस्तके प्राप्त झाल्यावर देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

- दुर्वेश बागकर, विद्यार्थी, रत्नागिरी

‘बालभारती’कडे एक लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. नवीन पुस्तके प्राप्त होताच विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहेत. मात्र, तोपर्यंत मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी जुनी पुस्तके वितरीत करण्यात आली आहेत.

- नीशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी.