शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
4
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
5
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
6
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
7
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
8
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
9
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
10
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
11
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
12
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
13
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
14
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
15
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
16
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
17
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
18
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
19
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
20
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?

वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी मुख्य अभियंते ‘फिल्ड’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST

रत्नागिरी : अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे चिपळूण येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा ...

रत्नागिरी : अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे चिपळूण येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद करावा लागला होता. चिपळूण येथे वीज पुरवठा करणाऱ्या तीन उपकेंद्रांतून १६ वाहिन्यांद्वारे वीज पुरवठा देण्यात येतो. यापैकी एका उपकेंद्रात पूर परिस्थितीला उतार आल्यानंतर चार फिडरद्वारे वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर व महावितरणची सर्व टीम त्यासाठी धडपडत आहे.

चिपळूण शहर व परिसरातील ३६ गावात पूर आला होता. त्यापैकी पाच गावातील वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. अद्याप १,१३५ ट्रान्सफॉर्मरपैकी केवळ ३४६ ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यात येऊन ५०,९७५ वीज जोडण्यांपैकी १६,३०३ वीज जोडण्या पुन्हा सुरू करणे शक्य झाले आहे.

अनेक ठिकाणी प्रत्यक्ष वीज मीटर, ट्रान्सफॉर्मर चिखल आणि गाळाने भरून गेले आहेत. याठिकाणी वीज प्रवाह धोकादायक ठरू शकतो, यासाठी खबरदारी घेण्यात येत असतानाच वीज पुरवठा सुरू केलेला नाही. मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर हे स्वत: चिपळूण येथे पूरस्थळी कार्यरत झाले आहेत. त्यामुळे उर्वरित दोन्ही उपकेंद्र सुरू करणे, उर्वरित ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू करणे याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येत आहे.

चिपळूण येथील वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साधन सामुग्री तातडीने उपलब्ध करण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा कोकण प्रादेशिक कार्यालय येथील प्रभारी प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे घेत आहेत. चिपळूण तसेच पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील विद्युत पुरवठा लवकरच पूर्वपदावर येईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.