शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

प्रभारी मुख्याधिकारी ‘लय भारी?’

By admin | Updated: July 17, 2014 23:52 IST

सत्ताधारी रथी-महारथींनाही भारी

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी रंजना गगे या पालिकेतील सत्ताधारी रथी-महारथींनाही भारी पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याआधी नियमित मुख्याधिकारी व गेल्या चार महिन्यांपासून प्रभारी मुख्याधिकारी असताना सातत्याने त्यांच्या कारभाराविरोधात ओरड करणाऱ्या महायुतीच्या सत्ताधाऱ्यांना त्यांनी नियमांवर बोट ठेवत आपल्या पदाचा हिसका दाखविल्याने सत्ताधारी हैराण झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्याधिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू झाली असून, त्यांना तत्काळ बदलावे, असे निवेदन युतीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. याआधीही अशी तक्रार देण्यात आली होती. मात्र, कारवाई काहीच झाली नव्हती. तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी रंजना गगे या कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची बदली झाली होती. मुख्याधिकारीपदी एम. बी. खोडके असताना सत्ताधारी व प्रशासन या सर्वांनाच सांभाळून घेत कारभार सुरू होता. मात्र, त्या काळातही रत्नागिरीच्या मुख्याधिकारीपदी पुन्हा येण्याचे गगे यांचे प्रयत्न सुरू होते. पालिकेतील जाणता राजा व जुना कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यालाही गगे यांचे रत्नागिरी पालिकेत पुनरागमन व्हावे, असेच वाटत होते. परंतु त्यांची नियुक्ती राजापूर पालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून झाली. मुख्याधिकारी खोडके यांची चार महिन्यांपूर्वी बदली झाल्यानंतर रत्नागिरी पालिकेला तात्पुरता कार्यभार पाहणारे अनेक मुख्याधिकारी मिळाले. त्यानंतर हा कार्यभार राजापूरच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.रत्नागिरी पालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून पूर्वी काम करताना व आता प्रभारी म्हणून काम करताना त्यांची कारकिर्द ही वादग्रस्त ठरली आहे. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे सत्ताधाऱ्यांना मानवणारे नव्हते. त्यामुळे पालिकेतील सध्याचे महायुतीचे पदाधिकारीही त्यांच्या विरोधात आहेत. आता प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम पाहतानाही त्यांनी रस्त्यांची कामे सार्वजनिक विभागाकडे वर्ग करण्यासह अनेक बाबतीत शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करीत सत्ताधारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना ठेंगा दाखवला. पालकमंत्र्यांच्या आडून कारभार पाहतात, असा आरोपही गगे यांच्यावर झाला आहे.आता पुन्हा अनेक विकासकामांवरून महायुती व मुख्याधिकारी यांच्यात जोरदार वाद सुरू असून, त्यातूनच गगे यांची तत्काळ बदली करून पालिकेला नियमित मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)मॅडमपुढे काही चालेना!३० वर्षांपासून पालिकेच्या मारुती मंदिर येथील व्यापारी गाळ्यांचे भाडे थकीत असल्याने या गाळ्यांना सील ठोकण्यात आले. पूर्ण थकबाकी दिल्याशिवाय हे गाळे संबंधितांच्या ताब्यात देऊ नयेत, असा ठरावही महायुतीने सर्वसाधारण बैठकीत केला. ३० वर्षे थकबाकी ठेवणाऱ्यांना दया दाखवणे चुकीचे आहे, अशी महायुतीची भूमिका असतानाही मुख्याधिकारी गगे यांनी पुन्हा आपलाच वरचष्मा दाखवत २५ टक्के रक्कम स्वीकारून थकबाकीदारांना गाळ्यांचा ताबा दिला. त्यामुळे सत्ताधारी महायुतीत प्रचंड संताप आहे. नागरिकांतही रोष आहे. परंतु सत्ताधाऱ्यांचे मॅडमपुढे काही चालेना, अशी स्थिती आहे.