शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

प्रभारी मुख्याधिकारी ‘लय भारी?’

By admin | Updated: July 17, 2014 23:52 IST

सत्ताधारी रथी-महारथींनाही भारी

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी रंजना गगे या पालिकेतील सत्ताधारी रथी-महारथींनाही भारी पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याआधी नियमित मुख्याधिकारी व गेल्या चार महिन्यांपासून प्रभारी मुख्याधिकारी असताना सातत्याने त्यांच्या कारभाराविरोधात ओरड करणाऱ्या महायुतीच्या सत्ताधाऱ्यांना त्यांनी नियमांवर बोट ठेवत आपल्या पदाचा हिसका दाखविल्याने सत्ताधारी हैराण झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्याधिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू झाली असून, त्यांना तत्काळ बदलावे, असे निवेदन युतीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. याआधीही अशी तक्रार देण्यात आली होती. मात्र, कारवाई काहीच झाली नव्हती. तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी रंजना गगे या कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची बदली झाली होती. मुख्याधिकारीपदी एम. बी. खोडके असताना सत्ताधारी व प्रशासन या सर्वांनाच सांभाळून घेत कारभार सुरू होता. मात्र, त्या काळातही रत्नागिरीच्या मुख्याधिकारीपदी पुन्हा येण्याचे गगे यांचे प्रयत्न सुरू होते. पालिकेतील जाणता राजा व जुना कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यालाही गगे यांचे रत्नागिरी पालिकेत पुनरागमन व्हावे, असेच वाटत होते. परंतु त्यांची नियुक्ती राजापूर पालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून झाली. मुख्याधिकारी खोडके यांची चार महिन्यांपूर्वी बदली झाल्यानंतर रत्नागिरी पालिकेला तात्पुरता कार्यभार पाहणारे अनेक मुख्याधिकारी मिळाले. त्यानंतर हा कार्यभार राजापूरच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.रत्नागिरी पालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून पूर्वी काम करताना व आता प्रभारी म्हणून काम करताना त्यांची कारकिर्द ही वादग्रस्त ठरली आहे. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे सत्ताधाऱ्यांना मानवणारे नव्हते. त्यामुळे पालिकेतील सध्याचे महायुतीचे पदाधिकारीही त्यांच्या विरोधात आहेत. आता प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम पाहतानाही त्यांनी रस्त्यांची कामे सार्वजनिक विभागाकडे वर्ग करण्यासह अनेक बाबतीत शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करीत सत्ताधारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना ठेंगा दाखवला. पालकमंत्र्यांच्या आडून कारभार पाहतात, असा आरोपही गगे यांच्यावर झाला आहे.आता पुन्हा अनेक विकासकामांवरून महायुती व मुख्याधिकारी यांच्यात जोरदार वाद सुरू असून, त्यातूनच गगे यांची तत्काळ बदली करून पालिकेला नियमित मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)मॅडमपुढे काही चालेना!३० वर्षांपासून पालिकेच्या मारुती मंदिर येथील व्यापारी गाळ्यांचे भाडे थकीत असल्याने या गाळ्यांना सील ठोकण्यात आले. पूर्ण थकबाकी दिल्याशिवाय हे गाळे संबंधितांच्या ताब्यात देऊ नयेत, असा ठरावही महायुतीने सर्वसाधारण बैठकीत केला. ३० वर्षे थकबाकी ठेवणाऱ्यांना दया दाखवणे चुकीचे आहे, अशी महायुतीची भूमिका असतानाही मुख्याधिकारी गगे यांनी पुन्हा आपलाच वरचष्मा दाखवत २५ टक्के रक्कम स्वीकारून थकबाकीदारांना गाळ्यांचा ताबा दिला. त्यामुळे सत्ताधारी महायुतीत प्रचंड संताप आहे. नागरिकांतही रोष आहे. परंतु सत्ताधाऱ्यांचे मॅडमपुढे काही चालेना, अशी स्थिती आहे.