शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चारसुत्री भात शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

कोकणातील व घाट विभागातील हवामान, जमीन व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन चारसुत्री भातशेती विकसित केली आहे. सन १९९३ ...

कोकणातील व घाट विभागातील हवामान, जमीन व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन चारसुत्री भातशेती विकसित केली आहे. सन १९९३ ते १९९६ या हंगामात २०० आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर केलेल्या प्रयोगात सुत्र ३ व ४ वापरून सर्वसाधारणपणे सरासरी चार टन भात इतके उत्पादन आले व भात शेती किफायतशीर झाल्याचे सिध्द झाले आहे.

भाताच्या तुसामधील व पेंढ्यामधील पालाश व सिलिकाॅनचा फेरवापर व मर्यादित गिरीपुष्प हिरवळीच्या खताचा वापर नियमितपणे केला तर बऱ्याच प्रमाणात रोग व किडीचा प्रतिकारक (औषधे न वापरता) होऊ शकेल व खाचरात जमिनीची उत्पादनक्षमता टिकवता येईल. महिला शेतकऱ्यांना भाताचे उत्पादन वाढीची भरीव कामगिरी करून दाखवता येईल. कारण स्वयंपाकासाठी तुसाची शेगवडी वापरून रोप वाफ्यात टाकण्यासाठी राख उपलब्ध करून देता येईल. अप्रत्यक्षपणे वन संरक्षण होऊ शकेल. नियंत्रित लावणी करून युरिया ब्रिकेटचा वापर महिला कामगार सहजासहजी शिकतात व स्वतंत्रपणे करू शकतात. एकत्रितपणे संपूर्ण चारसुत्री भात शेती पध्दतीमुळे एकूण खर्चात बचत करता येईल.

शिफारशीपेक्षा ४४ टक्के रासायनिक खताची बचत होऊ शकेल. बियाण्याची ४० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकेल. त्यामुळे त्याच प्रमाणात रोप तयार करण्याचा, उपटण्याचा व लावण्याचा खर्च कमी होऊ शकेल. हेक्टरी रोपांची संख्या शिफारस केलेल्या रोपांच्या संख्येपेक्षा कमी केल्यामुळे लावणीत व काणी मजुरीत बचत होऊ शकते.

रासायनिक खताच्या कार्यक्षम वापरामुळे तणांचा त्रास कमी होतो व तण काढण्यासाठी लागणारी मजुरी वाचेल. थोडक्यात चारसुत्री भात शेतीमुळे हवा, पाणी, जमीन, जंगलातील झाडे या सर्वांचे मोठ्या प्रमाणावर संरक्षण होऊन भात उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकेल. युरिया ब्रिकेट खताचा वापर केला तर ४०-४५ टक्क्यांपर्यंत मजुरीची बचत होते. ४४ टक्के कमी खत वापरून ३० टक्के कमी बी वापरून ५० टक्क्यांपर्यंत भाताचे व पेंढ्याचे उत्पादन वाढत आहे.