शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

साताऱ्याला बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:37 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अर्चना वाघमळे यांची सातारा येथे बदली झाली आहे. अर्चना ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अर्चना वाघमळे यांची सातारा येथे बदली झाली आहे. अर्चना वाघमळे यांनी जुलै २०१९मध्ये या पदाची सूत्रे हाती घेतली होती. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती.

मागणीत घट

राजापूर : सध्या बाजारात माशांची आवक वाढली आहे. मात्र, श्रावण महिना सुरु असल्याने मागणी कमी असल्याचे चित्र राजापुरात आहे. नारळी पौर्णिमा होताच मच्छिमारांना खोल समुद्रातील मासेमारीला परवानगी मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर मच्छी बाजारात येत आहे. मात्र, श्रावणमास असल्याने खवय्यांनी मच्छी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

स्पर्धकांची बाजी

देवरूख : जे. एस. डब्ल्यू. फाऊंडेशनतर्फे ओ. पी. जिंदल जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत देवरुखमधील पाध्ये स्कूलच्या गुंजन आशिष खवळे हिने आठवी गटात प्रथम, आरोही राजेश सावंत हिने नववी गटात प्रथम, जिज्ञासा कमलाकर कनावजे हिने तिसरा क्रमांक तर श्रुती प्रवीण पाटील हिने उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले आहे.

पुस्तक भेट

राजापूर : तालुक्यातील जुवाठी येथील शिक्षक बी. के. गोंडाळ यांच्या अक्षरमित्र बालग्रंथालय निर्मिती उपक्रमासाठी ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या दीडशे प्रती देणगीदाखल मिळाल्या आहेत. ओणी येथील वासल्य मंदिरचे माजी विद्यार्थी व सध्या कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक संशोधक महेश कुमार यांनी १०० तर कोल्हापूर येथील अभिनंदन प्रकाशनचे मालक त्रिभुवननाथ जोशी यांनी ५० प्रती दिल्या आहेत.

वाहनचालकांची डोकेदुखी

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून पाऊस कमी असला तरी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील विविध भागामध्ये तसेच मुख्य मार्गावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून खड्डे भरण्याचे काम सुरु आहे. मात्र, अजून काही भागात व मुख्य रस्त्यावरील खड्डे भरणे गरजेचे आहे.