शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

नव्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर दुसरी लाट परतविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST

रत्नागिरी : सध्या दुसरी लाट हळूहळू कमी होण्याची लक्षणे दिसत असली, तरीही अजून कोरोना रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. ...

रत्नागिरी : सध्या दुसरी लाट हळूहळू कमी होण्याची लक्षणे दिसत असली, तरीही अजून कोरोना रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. त्यामुळे अजूनही काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली राहण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या कमी होत आली असली, तरी या वर्षी गणेशोत्सवात पुन्हा मुंबईकर मोठ्या प्रमाणावर गावाला येणार असल्याने पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे नवीन जिल्हाधिकारी डाॅ.बी.एन. पाटील यांच्यासमोर दुसऱ्या लाटेतच वाढणारी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.

गेल्या वर्षी २३ मार्चपासून लाॅकडाऊन सुरू झाले होते. ३ मार्चला काही अंशी त्यात शिथिलता येताच, कोरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबईतून मुंबईकर मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी परतले ते काेरोनाची भेट घेऊनच. त्यामुळे जून महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढला. त्यात गणेशोत्सवातही मोठ्या प्रमाणावर गावी आलेल्या गणेशभक्तांमुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला. याच काळात बंद असलेली कोकण रेल्वे, एसटी बसेस, खासगी वाहनांना सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे गणपती उत्सवात कोरोनाचा उद्रेक अधिकच वाढला. अखेर शासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केल्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कोरोना रुग्णसंख्या घटू लागली.

डिसेंंबरपर्यंत ही संख्या कमी होती. मात्र, जानेवारी, २०२१ मध्ये पुन्हा लाॅकडाऊन शिथिल झाले. जिल्ह्यांतर्गत बंदी उठल्याने सुमारे सात-आठ महिने घरात अडकलेल्या नागरिकांचा पर्यटन, अन्य कामांसाठी प्रवास वाढला. लोकांचे फिरणे वाढल्याने पुन्हा हळूहळू कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडू लागली. जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा होती. मार्चमध्येेे होळीच्या सणात पुन्हा गणेशोत्सव काळात वाढलेल्या कोरोना रुग्णवाढीची पुनरावृत्ती होणार, हे निश्चित होते.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात शिमग्याला सुरुवात होताच, चाकरमानी मोठ्या प्रमाणावर पुन्हा गावी परतले. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा फटका जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर बसला. वर्षभरात १० हजार असलेल्या रुग्णांची संख्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच एकदम दुप्पट झाली आणि गेल्या चार महिन्यांत यात जवळपास ५७ हजारांची वाढ झाली आहे. दर दिवशी सातशेपर्यंत असलेली रुग्णसंख्या आता ३०० वर आली असली, तरीही ही संख्याही लक्षणीय आहे. नवीन जिल्हाधिकारी डाॅ.बी.एन. पाटील यांनी महिनाभरात दुसरी लाट संपविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी दिवसाला १० हजार चाचण्या करण्याचे नियोजन आरोग्य विभागाला करण्यास सांगितले आहे. मात्र, दुसरी लाट संपवितानाच ती लाट पुन्हा वाढणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान जिल्हाधिकारी यांच्यासमोर राहणार आहे.