शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

नव्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर दुसरी लाट परतविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST

रत्नागिरी : सध्या दुसरी लाट हळूहळू कमी होण्याची लक्षणे दिसत असली, तरीही अजून कोरोना रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. ...

रत्नागिरी : सध्या दुसरी लाट हळूहळू कमी होण्याची लक्षणे दिसत असली, तरीही अजून कोरोना रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. त्यामुळे अजूनही काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली राहण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या कमी होत आली असली, तरी या वर्षी गणेशोत्सवात पुन्हा मुंबईकर मोठ्या प्रमाणावर गावाला येणार असल्याने पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे नवीन जिल्हाधिकारी डाॅ.बी.एन. पाटील यांच्यासमोर दुसऱ्या लाटेतच वाढणारी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.

गेल्या वर्षी २३ मार्चपासून लाॅकडाऊन सुरू झाले होते. ३ मार्चला काही अंशी त्यात शिथिलता येताच, कोरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबईतून मुंबईकर मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी परतले ते काेरोनाची भेट घेऊनच. त्यामुळे जून महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढला. त्यात गणेशोत्सवातही मोठ्या प्रमाणावर गावी आलेल्या गणेशभक्तांमुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला. याच काळात बंद असलेली कोकण रेल्वे, एसटी बसेस, खासगी वाहनांना सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे गणपती उत्सवात कोरोनाचा उद्रेक अधिकच वाढला. अखेर शासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केल्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कोरोना रुग्णसंख्या घटू लागली.

डिसेंंबरपर्यंत ही संख्या कमी होती. मात्र, जानेवारी, २०२१ मध्ये पुन्हा लाॅकडाऊन शिथिल झाले. जिल्ह्यांतर्गत बंदी उठल्याने सुमारे सात-आठ महिने घरात अडकलेल्या नागरिकांचा पर्यटन, अन्य कामांसाठी प्रवास वाढला. लोकांचे फिरणे वाढल्याने पुन्हा हळूहळू कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडू लागली. जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा होती. मार्चमध्येेे होळीच्या सणात पुन्हा गणेशोत्सव काळात वाढलेल्या कोरोना रुग्णवाढीची पुनरावृत्ती होणार, हे निश्चित होते.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात शिमग्याला सुरुवात होताच, चाकरमानी मोठ्या प्रमाणावर पुन्हा गावी परतले. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा फटका जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर बसला. वर्षभरात १० हजार असलेल्या रुग्णांची संख्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच एकदम दुप्पट झाली आणि गेल्या चार महिन्यांत यात जवळपास ५७ हजारांची वाढ झाली आहे. दर दिवशी सातशेपर्यंत असलेली रुग्णसंख्या आता ३०० वर आली असली, तरीही ही संख्याही लक्षणीय आहे. नवीन जिल्हाधिकारी डाॅ.बी.एन. पाटील यांनी महिनाभरात दुसरी लाट संपविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी दिवसाला १० हजार चाचण्या करण्याचे नियोजन आरोग्य विभागाला करण्यास सांगितले आहे. मात्र, दुसरी लाट संपवितानाच ती लाट पुन्हा वाढणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान जिल्हाधिकारी यांच्यासमोर राहणार आहे.