शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बालकांना शिक्षणात आणण्याची धडपड

By admin | Updated: November 6, 2014 22:07 IST

वात्सल्य मंदिर : शिक्षण आणि आरोग्यासाठी दुर्गम भागात अविरत चळवळ --आधारवड

२६ जानेवारी १९७७ रोजी देवरूखच्या मातृमंदिर संस्थेच्या दवाखान्याची एक शाखा ओणी (ता. राजापूर) येथे सुरू झाली. यासाठी ओणी आणि कोदवली ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे होते. तेव्हाचे खासदार स्वर्गीय प्रा. मधु दंडवते हे या संस्थेचे पदाधिकारी होते. एके दिवशी ते ओणीत आले असता या ग्रामस्थांनी या भागात आरोग्य सुविधा सुरू व्हायला हवी, असे सांगितले. दंडवते यांनी संस्थेसमोर हा प्रस्ताव ठेवत ओणीत दवाखाना सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आणि १९७७ साली ओणी येथे दोन खोल्यांमध्ये दवाखाना सुरू केला. या दवाखान्याचे उद्घाटन प्रमिला दंडवते, नानासाहेब गोरे यांच्या हस्ते झाले. या रूग्णालयाला पी. बी. मंडलिक ट्रस्टने आर्थिक हात दिल्याने या रूग्णालयाचे नाव पी. बी. मंडलिक रूग्णालय असे झाले. याचवेळी डॉ. महेंद्र मोहन गुजर हे मुंबईत काम करीत होते. खेड्याकडे जाऊन काहीतरी कार्य करावे, ही त्यांच्या मनात प्रबळ इच्छा होती. त्याचवेळी या रूग्णालयात काम करण्यासाठी त्यांना विचारणा करण्यात आली. ही संधी वाया न दवडता डॉ. महेंद्र गुजर यांनी या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवाभावी वृत्तीने धुरा सांभाळण्यास सुरूवात केली. या रूग्णालयाचा लाभ आजूबाजूच्या अनेक गावातील लोकांना होऊ लागला. संस्थेचे कार्य सुरू झाले, पण त्यानंतर अनेक समस्यांचा सामना या संस्थेला करावा लागला. पिण्याचे पाणी, अंधश्रध्दा अस्पृश्यता, निरक्षरता आदी आरोग्याशी निगडीत असणाऱ्या समस्या संस्थेपुढे उभ्या राहिल्या. मात्र, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य यांच्या सहकार्याने या समस्यांवरही उपाय मिळू लागले. पुढे मातृमंदिर संस्थेच्या बालगृहातील मुले ओणीत आणून ठेवली गेली. मात्र, पुढे आलेल्या अनेक तांत्रिक अडचणींमुळे ओणी आणि देवरूख संस्था वेगवेगळ्या असणे गरजेचे वाटू लागले आणि स्वायत्त अशा ‘वात्सल्य मंदिर संस्थे’ची स्थापना १९९८ मध्ये झाली. आणि मग या संस्थेचे कार्य स्वतंत्रपणे सुरू झाले.शिक्षण आणि आरोग्य या दोन मुद्द्यांवर काम करण्यासाठी डॉ. महेंद्र गुजर यांनी या संस्थेच्या माध्यमातून माता - बाल संगोपन यांसारखे उपक्रम राबविले. हे कार्य करताना एक बाब लक्षात आली की, दवाखान्यात येणारा बहुतांश वर्ग हा खाणकामगार होता. त्यामुळे या वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी डॉ. गुजर यांनी या कामगारवर्गाला एकत्र आणण्याच्या दृष्टीने कामगार संघटना तयार केली. या कामगारांच्या आर्थिक दुर्बलतेचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत होता. त्यामुळे संस्थेने पोल्ट्री फॉर्म आणि सहकारी दूध सोसायटी तयार केली. हे कार्य करताना सरकारी योजना तळागाळात पोहोचविण्याचे कामही ही संस्था करीत आहे. या संस्थेचे १०० मुलांचे बालकाश्रम आहे. २००५ सालापासून जलस्वराज्य प्रकल्पही या संस्थेने राबविला आहे. कौटुंबीक हिंसाचारासारख्या ज्वलंत सामाजिक समस्याच्या निराकरणासाठी तयार झालेल्या कायद्याबाबत प्रबोधन आणि त्याची अंमलबजावणीसाठीही ही संस्था काम करतेय. डॉ. गुजर यांनी १९८० ते ८६ या कालावधीत कुटुंब नियोजनाच्या प्रचारासाठी प्रभावीपणे कार्य केले. त्यामुळे आतापर्यंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात अग्र क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे आंतरजातीय विवाहासाठीही डॉ. गुजर यांचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्र सेवा दल तसेच अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे खरे कार्यकर्ते असलेल्या डॉ. गुजर यांनी या भागात लोकचळवळीचे अतिशय चांगले काम केले आहे. संस्थेच्या माध्यमातून ओणी, वडवली आणि आता वडदहसोळ अशा तीन शाळा सुरू झाल्या आहेत. हसोळ येथे टेक्निकल स्कूल सुरू करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. गावात संस्थेने व्यायामशाळाही सुरू केली आहे. राजापूर तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या मुलांना अजूनही पुढे काय करायचे, यासाठी योग्य मार्गदशन मिळत नाही. यासाठी राजापूर तालुक्यात उन्हाळ्यात तसेच हिवाळ्यात मार्गदर्शन केंद्र सुरू करायचे आहे. तालुक्यातील एकही मुलगा वा मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी संस्था प्रयत्न करीत आहे. त्याकरिता डॉ. गुजर यांनी आपल्या आई-वडिलांच्या नावे ‘कमल - मोहन ट्रस्ट’ची निर्मिती केली आहे. संबंधित ट्रस्टच्या माध्यमातून अनेक मुलांना शिक्षणाचा आधार मिळतोय. या संस्थेतून आजपर्यंत १४५ विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. संस्थेच्या या कार्याची दखल घेत चंदूभाई मेहता सामाजिक कार्य पुरस्कार, धन्वंतरी पुरस्कार, हेल्प फाऊंडेशन फॉर सोशल ग्रोथ, समाज गौरव आदी पुरस्काराने संस्थेला गौरविले आहे. अनेक आव्हाने झेलत ही संस्था कार्य करीत आहे. - शोभना कांबळेतरूण पिढीही सामाजिक कार्यात पुढे येतेयवात्सल्य मंदिरच्या कार्याने प्रभावित होऊन तरूण पिढी या संस्थेला हातभार लावण्यासाठी पुढे येतेय. या मुलांना योग्य दिशा दिली आणि त्यांच्यासमोर उद्दिष्टे ठेवली तर हीच मुले अतिशय चांगल्या तऱ्हेने समाजात कार्य करू शकतील, असा विश्वास संस्थेचे संचालक डॉ. महेंद्र गुजर व्यक्त करतात, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या युवकांचे योगदान बहुमोल ठरणार आहे. यात संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे. संस्थेसाठी कार्य करण्याच्या त्यांच्या या तळमळीतूनच संस्थेच्या कार्याला भविष्यात नक्कीच गती मिळणार आहे आणि संस्थेच्या कार्याची ही खरी पोचपावती असल्याचे डॉ. गुजर सांगतात.