शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात २६ जूनला चक्का जाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST

रत्नागिरी : ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम महाराष्ट्र सरकार करीत आहे, असा आरोप करीत ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या ...

रत्नागिरी : ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम महाराष्ट्र सरकार करीत आहे, असा आरोप करीत ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या विरोधात २६ जूनला राज्यभरात १००० ठिकाणी भाजपतर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, मागासवर्ग आयोग स्थापन करण्याची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पडून होती, अशी धक्कादायक माहिती आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे गेले १४ महिने मागासवर्ग आयोगाची फाईल पाडून ठेवली होती. २२ दिवसांपूर्वी वडेट्टीवार यांनी सांगितले होते की मागासवर्ग आयोग स्थापन करतो. इम्पेरिकल डाटा बनवितो. तो तयार झाला नाही. तसेच चार दिवसांपूर्वी त्यांनी सांगितले होते की, जोपर्यंत ओबीसींचा आयोग स्थापन होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. हे सर्व ते मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने बोलले. मंगळवारी निवडणूक आयोगाने ८५ जिल्हा परिषदा आणि १४५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर केल्या. याचाच अर्थ ओबीसींच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचे काम या राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तत्काळ राजीनामा देण्याची आपली मागणी आहे, असे त्या म्हणाल्या.

ज्या पद्धतीने मराठा समाजासोबत केले, त्याच पद्धतीने ओबीसींच्या आरक्षणासोबत खेळण्याचा त्यांचा राजकीय डाव आहे. तो आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीही नाही. आमच्यामध्ये दुफळी माजविण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. मराठा समाजाला त्यांचे आरक्षण मिळालेच पाहिजे. त्याचबरोबरीने ओबीसींचे आरक्षण हे पूर्ववत व्हायलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आज सर्वांनी एकत्रित येऊन ताबडतोब सुप्रीम कोर्टात जाऊन या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी करणे आवश्यक आहे. हे न करता आंदोलने, चिंतन बैठका सुरू आहेत. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकही शब्द बाेलत नाहीत. सरकारची भूमिका फसवी व डोळ्यात धूळ फेकणारी आहे हे राज्यातील जनता पाहत आहे. म्हणूनच वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, माजी आमदार विनय नातू, राजेश सावंत, राजन कापडी व अन्य उपस्थित होते.