शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

पंचेचाळीस वर्षांवरील लसीकरणाची जबाबदारी केंद्राची : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:33 IST

राजापूर : १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासन लस पुरवत असून, त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यांचे लसीकरण सुरळीतपणे ...

राजापूर : १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासन लस पुरवत असून, त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यांचे लसीकरण सुरळीतपणे होत आहे, मात्र ४५ वर्षांवरील वयोगटातील जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी आमची नसून ती केंद्र सरकारची आहे. त्यामुळे केंद्र सरकार ज्यावेळी लस पुरवेल त्यातूनच त्यांचे लसीकरण होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजापूर येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही सामंत यांच्या या म्हणण्याला दुजोरा दिला. केंद्र शासनाकडून लस उपलब्ध करण्याबाबत काय उपयायोजना वा मागणी केली आहे, असा प्रश्न करण्यात आला. त्यावर मागणी केलेली आहे, ती आल्यानंतरच ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मिळेल, असे सांगण्यात आले.

राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांनी उपलब्ध करून दिलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर राजापूर तालुक्याला भेट देण्यासाठी शुक्रवार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी राजापूर तहसीलदार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. लसीकरणाबाबत सुरू असलेल्या सावळा गोंंधळाबाबत यावेळी पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू आहे, मात्र ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद आहे, तर यापूर्वी ज्या ४५ वर्षांवरील लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांच्या दुसऱ्या डोसची मुदत संपूनही त्यांना दुसरा डोस उपलब्ध झालेला नाही, या प्रश्नावर मंत्री सामंत म्हणाले की, ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी पहिला आणि दुसरा डोस हा केंद्र सरकार पुरवित असून, या वयोगटातील नागरिकांची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. मग त्या ४५ वर्षांवरील नागरिकांनी करायचे काय, असा प्रतिप्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता, केंद्राकडून लस उपलब्ध झाल्यावर ती त्या वयोगटातील नागरिकांना दिली जाईल, असे सांगण्यात आले. अशा प्रकारे ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या किती असू शकते, या पत्रकारांच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाकडे मतदार यादी आहे, त्यामुळे केंद्र सरकार ती तपासू शकते असे सांगत ४० टक्के जनता या वयोगटात असल्याची पुष्टी यावेळी मंत्र्यांनी जोडली.

या पत्रकार परिषदेला खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, माजी आमदार अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, तहसीलदार प्रतिभा वराळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे उपस्थित होते.

ओणी काेविड रुग्णालयाचा मुहूर्त कधीचा?

आमदार राजन साळवी यांनी पुढील आठ दिवसांत ओणी येथील कोविड रुग्णालय सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आढावा बैठकीत सांगितले हाेते, मात्र पत्रकार परिषदेत पंधरा दिवस तरी हे रुग्णालय सुरू होण्यासाठी जातील असे मंत्री सामंत यांनी सांगितले. तर पुन्हा एकदा राजापूर व रायपाटण ग्रामीण रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट उभारण्याची घोषणा केली, मात्र कधी, त्याची तारीख जाहीर करण्यात आली नाही.