शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

उपनगराध्यक्ष पदासाठी सेनेत शीतयुद्ध

By admin | Updated: November 21, 2015 23:58 IST

रत्नागिरी नगर परिषद : संजय साळवी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतील युतीमधील धूसफूस गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी मुदत संपल्यानंतरही सेनेसाठी पद रिक्त केलेले नाही. त्यामुळे सेनेचा रुसवा कायम आहे. तर सेनेचे संजय साळवी यांच्या उपनगराध्यक्षपदालाही वर्षाचा काळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीचे जोर धरला आहे. नगराध्यक्षपद मिळणार नसेल तर उपनगराध्यक्षपदावर सेनेच्याच दुसऱ्या नगरसेवकाला संधी मिळायला हवी, यावरून शिवसेनेतच शीतयुध्द रंगले आहे. त्याबाबत सेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. चार वर्षांपूर्वी रत्नागिरी पालिकेतील राष्ट्रवादी आघाडीची सत्ता उलथवून रत्नागिरीकरांनी मोठ्या अपेक्षा ठेवत सेना-भाजप युतीच्या हाती सत्तेच्या चाव्या सुपूर्द केल्या होत्या. त्यानुसार या दोन्ही पक्षांचा संसार पहिल्या अडीच वर्षासाठी कसाबसा चालला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील युती तुटली अन् त्याचे पडसाद राज्यातील राजकारणातही उमटले. अनेक ठिकाणी सेना-भाजप यांनी फारकत घेतली. रत्नागिरीत पाच वर्षातील सव्वा वर्षांच्या नगराध्यक्षपदाची तिसरी टर्म सेनेची असतानाही विधानसभा निवडणूक असल्याचे निमित्त करून भाजपनेच सेनेकडून सहा महिन्यांसाठी पुन्हा नगराध्यक्षपद मिळवले. मात्र, सहा महिनेच काय दीड वर्षानंतरही भाजपने हे पद सोडलेले नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सेनेत प्रचंड अस्वस्थता, संताप आहे. भाजप नगराध्यक्षपद सोडत नसली तरी उपाध्यक्षपद सेनेकडेच आहे. त्या पदावरील सेनेचे संजय साळवी यांचीही सव्वा वर्षाची मुदत संपली आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद मिळणार नसेल तर उपनगराध्यक्षपदावर सेनेच्याच दुसऱ्या नगरसेवकाला संधी मिळणे आवश्यक असल्याची मागणी सेनेतूनच होत आहे. या विषयावरून शिवसेनेत अंतर्गत शीतयुध्दही रंगले आहे. याबाबतचा चेंडू सेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात असल्याने त्याबाबत निर्णय होणार का? झाला तर उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (प्रतिनिधी) अनेकजण इच्छुक : निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या हाती... रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेनेचे २७ पैकी १४ नगरसेवक आहेत. संजय साळवी यांनी राजिनामा दिला तरी सेनेचा नवीन उपनगराध्यक्ष निवडून आणण्यात कोणतीही अडचण नाही. हे पद रिक्त होणार असेल तर ती संधी आपल्याला मिळावी, असे पत्र सेनेचे नगरसेवक विनय तथा भैय्या मलुष्टे यांनी सेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यासह पक्ष संघटनेला दिले आहे. या पदासाठी सेनेतीलच रशिदा गोदड तसेच अन्य काही नगरसेवकही इच्छूक आहेत. या स्थितीत संजय साळवी यांना त्यांची सव्वा वर्षाची मुदत पूर्ण झाल्याने पक्षनेते राजिनामा देण्यास सांगणार काय? २०१६मध्येसेना स्वबळावर भाजपने ठरल्याप्रमाणे नगराध्यक्षपद न सोडल्याने सेना नेते संतप्त आहेत. त्यामुळे खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत यांनीही २०१६ मध्ये होणाऱ्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘एकला चलोर’े ची तयारी करण्याचे निर्देश सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून २०१६ च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. सात प्रभागांऐवजी नव्या रचनेनुसार २८ वॉर्डचे ३० वॉर्डमध्ये रुपांतर होणार आहे.