शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सावधानता गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:31 IST

परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी येता-जाता कोरोना चाचणी गरजेची आहे. काही देशामध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांना विलगीकरणाचा सक्ती आहे. तर काही नागरिक ...

परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी येता-जाता कोरोना चाचणी गरजेची आहे. काही देशामध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांना विलगीकरणाचा सक्ती आहे. तर काही नागरिक अन्य राज्यात विमानाने येऊन आपल्या घरी परतत आहेत. यामुळे विलगीकरणास फाटा मारत शासन नियमांचे उल्लंघन केले जात आहे. काही देशांनी विलगीकरणच बंद केले आहे. मात्र कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्यांनाच विमानातून प्रवासासाठी प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे विमानातून प्रवास करणारी मंडळी शंभर टक्के कोरोना चाचणी केलेले असल्याने संसर्गाचा धोका कमी होत आहे. परदेशात नोकरी, व्यवसायासाठी स्थायिक असलेली मंडळी सुट्टीसाठी मायदेशात परततात. मोजकेच दिवस सुट्टी असल्याने विलगीकरणासाठी विशेष महत्त्व देत नाहीत. विलगीकरण चुकविण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले जातात. मात्र हे कशासाठी? परदेशातील निर्णय पालन करण्यासाठी असतात तर मायदेशातील नियम धुडकावण्यासाठी असतात का? अशी शंका येते.

परदेशात काम करीत असताना, तेथील नियमावली व त्याचे पालन काटेकोरपणे करावे लागते. मात्र ही मंडळी मायदेशात आल्यानंतर परदेशातील नियमांचे गोडवे गात असतात. गोडवे गाणे जरी योग्य असले तरी आपल्या देशातील कायद्याचे पालन करणे तितकेच महत्त्वपूर्ण आहे, याची जाणीव या मंडळींना का बरे होत नाही?

कोरोना रुग्ण वाढत असले तरी लग्नसमारंभातील गर्दी काही कमी होत नाही. ५० लोकांमध्ये कार्य उरकण्याची सूचना असतानाही, गर्दी काही कमी होत नाही. संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापर सक्तीचा आहे. विनामास्क कारवाई होऊ नये यासाठी मास्क हनुवटीला अडकवून खुलेआम हिंडणारी मंडळी कमी नाहीत. हेल्मेट वापरणारी कित्येक मंडळी तर मास्कच वापरत नाहीत. दुचाकीवरून जातात रस्त्यात थुंकण्याचेही प्रकार कमी झालेले नाहीत. एकूणच काय तर कोरोना कुठे आहे? याच आविर्भावात मंडळी वावरत असतात. स्वत:बरोबर इतरांच्या आरोग्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापर, सोशल डिस्टन्सिग गरजेचे आहे. परंतु कोरोनाबाबत गांभीर्य बाळगण्याऐवजी बेफिकिरीने वागणेच वाढले आहे.

पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू असून कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करून शाळा भरविल्या जात आहेत. लहान मुले शाळेत येता-जाता मास्क वापर प्राधान्याने करीत आहेत. शाळेत सॅनिटायझर सुविधा उपलब्ध असली तरी प्रत्येक मुलांच्या दप्तरात पालकांकडून सॅनिटायझरची बाटली दिली जात आहे. काही पालकांची बेफिकिरी वाढू लागल्यानेच मुलांमध्येही हा बदल दिसू लागला आहे. शाळेच्या आवारात मास्क सक्तीने वापरला जात असला तरी शालेय आवाराबाहेर आल्यानंतर मास्क काढला जातो. एखाद्या जागृत नागरिकांनी याबाबत विचारले तर उलट उत्तरे दिली जातात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची दररोजची वाढती संख्या व त्याचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे. लाॅकडाऊनचा फटका सर्व क्षेत्रांना बसला होता. कित्येक कुटुंबे विस्कळीत झाली. एकूणच अनुभव ताजा असल्याने प्रत्येकांने गांभीर्याने वागले तर कोरोनाचा धोका नक्की टळू शकेल; मात्र याबाबत प्रत्येकाने स्वत:पासून सुरू करण्याची आवश्यकता आहे.