शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

मात्र सावधानता हवीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST

गेले दीड वर्ष कोरोनाचे पडसाद विविध क्षेत्रावर उमटले आहेत. उद्योग, व्यवसायावर झालेल्या परिणामामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ...

गेले दीड वर्ष कोरोनाचे पडसाद विविध क्षेत्रावर उमटले आहेत. उद्योग, व्यवसायावर झालेल्या परिणामामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत कित्येक कुटुंबांनी आपले सदस्य, निकटवर्ती गमावले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांमध्ये निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. अनेक मुलांचे पालक कोरोनामुळे दगावले असल्याने मुले पोरकी झाली आहे. शासनाने या मुलांसाठी आर्थिक साहाय्य घोषित केले असून, काही संस्थांनी शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली आहे. परंतु या मुलांच्या भविष्याचा प्रश्नही अवघड आहे. एकूणच कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी धोका मात्र कमी झालेला नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवताना लहान मुलांना धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तरीही शाळा सुरू करण्यासाठी सरकार घाई करीत आहे.

अद्याप लसीकरण संथ गतीने सुरू आहे. कित्येकांना पहिलाच डोस अद्याप प्राप्त झालेला नाही. प्रशासनाने किमान लसीकरण तरी जलद गतीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून धोका कमी होण्यास मदत होईल. प्रशासनाने सर्व व्यवहार खुले करण्यासाठी सवलत दिली आहे. मात्र त्या सवलतीचा फायदा किती घ्यावा, हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. पावसाळी सहली, धबधबे, समुद्रकिनाऱ्यावरील सहलींचे आयोजन सध्या जाेमाने सुरू आहे. मुलांचे ऑनलाइन वर्ग असल्याने नोकरदार आईवडील सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन वीकेंड साजरा करीत आहेत. पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. आनंदाच्या ओघात सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापर असो वा अन्य कोरोना नियमावलींचे पालन करण्याचा विसर पडत आहे. गणेशोत्सवही अगदी तोंडावर आहे. त्यामुळे येणारा सण आनंदाने साजरा करण्यासाठी व कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी शासकीय नियमावलींचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. थोडीशी सावधानता नक्कीच लाट रोखण्यास मदत करणार आहे. शासनाकडून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत. मात्र या उपाययोजना राबविणे जितके गरजेचे आहे, तितकेच लाट रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. गेले दीड वर्ष जनतेची प्रगती खुंटली आहे. विकासाच्या नावाने बोंबच आहे. महागाईचे संकट तर आ वासून उभेच आहे. एकूणच विदारक परिस्थितीचा सामना करताना सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे. जर तिसरी लाट आली तर नक्कीच विषमतेला सामोरे जावे लागणार आहे. याचे तीव्र पडसाद सर्व स्तरावर उमटले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडीशी सावधानता घेतली तर नक्कीच कोरोना हद्दपार होण्यास मदत होईल.