शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

सभागृहाला श्रेयवादाचा फटका

By admin | Updated: January 8, 2016 00:04 IST

नानी - नानी पार्क स्वप्नच : ४७ लाखांचा निधी मिळूनही मुदतीनंतर काम रखडलेले

जिल्ह्यात साडेसहा लाख पशुधन : प्रतिमाह एक लाख मे. टन चाऱ्याची गरजअमरावती : जिल्ह्यात पशुधनासाठी प्रतिमाह सरासरी १ लाख ४ हजार ६०६ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. यंदाच्या खरीप व रबी हंगामाच्या पेरेपत्रकानुसार व अन्य मार्गाने उपलब्ध होणारा चारा ६ लाख ६९ हजार ५५९ मेट्रिक टन असल्याने हा चारा गुरांना केवळ ८ महिने पुरेल इतका आहे. त्यामुळे यंदा जानेवारी अखेरनंतर जिल्ह्यात वैरणटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात १९ व्या पशुगणनेनुसार गाय व म्हैसवर्गीय लहान जनावरांची संख्या १ लाख ३८ हजार १६८ इतकी व मोठ्या गुरांची संख्या ५ लाख १२ हजार ६ अशी एकूण ६ लाख ५० हजार २२८ इतकी आहे. या पशुधनासाठी सन २०१५-१६ वर्षामध्ये या पशुधनासाठी प्रतिमाह १ लाख ४ हजार ६०६ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील चारा जानेवारीपर्यंत पुरणार असल्याने नंतरच्या काळात चाराटंचाई सदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाद्वारा कामधेनू योजना तसेच जिल्हा विकास निधीतून वैरण बियाणे वाटप कार्यक्रम तसेच निकृष्ट चारा सकस करण्याबाबत प्रात्याक्षिक देण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात ५०४ हायड्रोपोनिक संच निर्मित करुन हिरवी वैरण उपलब्ध करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. मोठ्या जनावरांमध्ये (गाय/म्हैस) प्रतिदिन १५ किलोग्रॅम हिरवा चारा किंवा ६ किलोग्रॅम वाळला चारा व ३५ ते ४० लिटर पाण्याची आवश्यकता असते. लहान जनावरांना हिरवा चारा ७.५ किलोग्रॅम किंवा वाळलेल्या ३ किलो चाऱ्याची व १० ते १५ लिटर पाण्याची आवश्यकता असते. वेळीच नियोजन न झाल्यास जिल्ह्यातील पशुधनाला वैरणटंचाई भेडसावणार आहे. हे धोक्याचे संकेत मिळाले आहेत. जून २०१६ पर्यंत ७ लाख ३२ हजार मेट्रिक टन चाऱ्याची गरजजिल्ह्यातील ६,५०,२२८ पशुधनासाठी दरदिवशी ३,४८७ मे.टन चाऱ्याची गरज आहे. यंदा १,५९,६३३ मे.टन अपेक्षित चारा उत्पादन होण्याची शक्यता आहे. वनजमीन, गायरान व पडिक जमिनीद्वारे ४७,२२० मे. टन चारा असा एकूण ८,२९,१९७ मे. टन इतका चारा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील पशुधनाला दरमहा १०४,६०६ इतका चारा लागतो. जानेवारी ते जून २०१६ पर्यंत ७,३२,२४२ मे.टन इतका चारा आहे. मात्र, जिल्ह्यात उपलब्ध असणारा चारा हा ८ महिने पुरेल इतका असल्याने अन्य ४ महिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.