शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
3
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
4
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
5
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
6
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
7
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
8
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
9
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
10
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
11
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
12
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
13
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
14
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
15
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
16
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
17
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
19
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
20
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...

वाऱ्यामुळे आंबा पडून शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: April 7, 2015 01:30 IST

संकटामागून संकटे : आता सामना धुळीच्या वादळाशी

रत्नागिरी : कोकणचे मुख्य पीक असलेल्या हापूस आंब्यामागील संकटांचे शुक्लकाष्ठ संपता संपेना. मार्चमध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. उरलेली कसर धुळीचे वादळ व प्रचंड वेगाने वाहणारे वादळी वारे भरून काढत असल्याचे दिसून येत आहे. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या कोसळणे शिवाय तयार फळे पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ६४,८७४ शेतकऱ्यांचे आंबा व काजूपिकाचे एकूण ३१,८१४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पैकी २०,७१८ हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक, तर ११०९६ हेक्टर क्षेत्रावरील काजू पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातील पीक वाया गेल्याने कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.गेले तीन चार दिवस प्रचंड वेगाने वारे वाहात आहेत. वाऱ्यामुळे फळधारणा झालेली झाडे कोसळणे किंवा फांद्या मोडण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणावर आंबा वाऱ्याने पडून वाया जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘आगीतून फुफाट्यात’ अशी झाली आहे. धूळ प्रचंड प्रमाणात उडत असल्यामुळे आंब्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आंब्याचा नैसर्गिक रंग बदलून धुरकट होण्याची शक्यता आहे.आंबापीक उत्पादनासाठी वर्षभर शेतकऱ्यांना घ्यावी लागणारी प्रचंड मेहनत तसेच करावा लागणारा खर्च लक्षात घेता यावर्षी उत्पादित पिकाचे नुकसानच मोठ्या प्रमाणावर झाल्याचे निदर्शनास येत आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा आदेश असतानासुध्दा कृषी विभागाच्या दिरंगाईमुळे महिनाभराने अहवालप्राप्त झाला. परंतु धुळीचे वादळ यामुळे होणाऱ्या नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने पाठविणे गरजेचे आहे. अवकाळीतून बचावलेला आंबा शेतकऱ्यांनी विक्रीस पाठविण्याची सुरूवात केली आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना वादळी वाऱ्यांचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)धुळीमुळे आंब्याचा मूळ रंग बदलण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. आंबा पुसावा लागणार आहे. मात्र, पुसल्यामुळे नैसर्गिक रंगात बदल होईल, पुन्हा दर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. आंबा व्यवसाय शेतकऱ्यांना तारण्याऐवजी नुकसानाचा धक्का सोसावा लागणार आहे.