शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाइ

By admin | Updated: December 16, 2014 00:14 IST

पर्यटकांसाठी सुरक्षितता : हातखंबा वाहतूक पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; शिस्त पाळा, अपघात टाळार्

रत्नागिरी : यंदाच्या वर्षातील जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई - गोवा व रत्नागिरी - नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस शाखेच्या हातखंबा पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एकूण १० हजार ९४६ वाहनांवर व चालकांवर कायदेशीर कारवाई करून ११ लाख ६९ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.महामार्ग वाहतूक पोलीस शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरकर यांनी सांगितले की, महामार्ग पोलीस वाहतूक विभाग, महासंचालक ठाणे यांच्या आदेशानुसार महामार्गावरील अवजड व अतिरिक्त भार वाहून नेणारी वाहने, हेल्मेट न वापरणारे दुचाकीस्वार, भरधाव वेगाने वाहन चालविणे, वाहनांच्या काचांवर फिल्म लावणे, सीट बेल्ट न लावणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, वाहनांवर रिफ्लेक्टर न लावणे, मालवाहतूक करताना वाहनातून रस्त्यावर पाणी सांडणे, वाहनाचे टेललॅम्प, इंडिकेटर सुरु नसणे, अवजड ट्रेलर यांसारख्या वाहनातून वाहनांचा फाळका न लावता उघडपणे मोठे पाईप, लोखंडी सळीसारखे साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम डिसेंबर २०१४च्या अखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे. वाहन चालकांना शिस्त लागून अपघात कमी व्हावेत, हा मुख्य उद्देश आहे.कोकणात सध्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. पर्यटन हंगाम असल्याने दोन्ही महामार्गावर वाहतुकीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच काही वाहन चालक नियमांचे उल्लंघन करतात. त्याचा फटका इतर वाहनांना बसतो. प्रसंगी जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे महामार्गावरची वाहतूकही विस्कळीत होते. वाहन चालकांना शिस्त लागण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. दंडात्मक कारवाई ही मुंबई - गोवा महामार्गावरील बावनदी, निवळी ते खारेपाटण, खाडेवाडी व रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील आंबा गाव या टप्प्यामध्ये अनुक्रमे ८५ किलोमीटर ते ७३ किलोमीटरच्या दरम्यान गस्तीच्या वेळी ही कारवाई करण्यात आली. अकरा महिन्यांमध्ये विशेष मोहिमेंतर्गत हेल्मेट न वापरता दुचाकी चालविणे, यामध्ये २६६ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करुन २६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महामार्गावर अती वेगाने वाहन चालविणाऱ्या १५९ चालकांवर कलम १८४ अन्वये कारवाई करुन ७९ हजार ५०० इतका दंड वसूल करण्यात आला. वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावल्याबद्दल २५२ वाहनांवर कारवाई करुन २५ हजार २०० इतका दंड वसूल करण्यात आला. चारचाकी वाहनांमध्ये वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल कारवाई करीत मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. १० हजार २६९ वाहनांवर कारवाई करुन १० लाख ३७ हजार ९०० रुपये इतकी रक्कम वसूल केली. या साऱ्या तपासणीनंतर दोन्ही महामार्गावरील वाहतूक नियमाला अधिन राहून होईल. (प्रतिनिधी)