शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाइ

By admin | Updated: December 16, 2014 00:14 IST

पर्यटकांसाठी सुरक्षितता : हातखंबा वाहतूक पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; शिस्त पाळा, अपघात टाळार्

रत्नागिरी : यंदाच्या वर्षातील जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई - गोवा व रत्नागिरी - नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस शाखेच्या हातखंबा पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एकूण १० हजार ९४६ वाहनांवर व चालकांवर कायदेशीर कारवाई करून ११ लाख ६९ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.महामार्ग वाहतूक पोलीस शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरकर यांनी सांगितले की, महामार्ग पोलीस वाहतूक विभाग, महासंचालक ठाणे यांच्या आदेशानुसार महामार्गावरील अवजड व अतिरिक्त भार वाहून नेणारी वाहने, हेल्मेट न वापरणारे दुचाकीस्वार, भरधाव वेगाने वाहन चालविणे, वाहनांच्या काचांवर फिल्म लावणे, सीट बेल्ट न लावणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, वाहनांवर रिफ्लेक्टर न लावणे, मालवाहतूक करताना वाहनातून रस्त्यावर पाणी सांडणे, वाहनाचे टेललॅम्प, इंडिकेटर सुरु नसणे, अवजड ट्रेलर यांसारख्या वाहनातून वाहनांचा फाळका न लावता उघडपणे मोठे पाईप, लोखंडी सळीसारखे साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम डिसेंबर २०१४च्या अखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे. वाहन चालकांना शिस्त लागून अपघात कमी व्हावेत, हा मुख्य उद्देश आहे.कोकणात सध्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. पर्यटन हंगाम असल्याने दोन्ही महामार्गावर वाहतुकीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच काही वाहन चालक नियमांचे उल्लंघन करतात. त्याचा फटका इतर वाहनांना बसतो. प्रसंगी जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे महामार्गावरची वाहतूकही विस्कळीत होते. वाहन चालकांना शिस्त लागण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. दंडात्मक कारवाई ही मुंबई - गोवा महामार्गावरील बावनदी, निवळी ते खारेपाटण, खाडेवाडी व रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील आंबा गाव या टप्प्यामध्ये अनुक्रमे ८५ किलोमीटर ते ७३ किलोमीटरच्या दरम्यान गस्तीच्या वेळी ही कारवाई करण्यात आली. अकरा महिन्यांमध्ये विशेष मोहिमेंतर्गत हेल्मेट न वापरता दुचाकी चालविणे, यामध्ये २६६ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करुन २६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महामार्गावर अती वेगाने वाहन चालविणाऱ्या १५९ चालकांवर कलम १८४ अन्वये कारवाई करुन ७९ हजार ५०० इतका दंड वसूल करण्यात आला. वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावल्याबद्दल २५२ वाहनांवर कारवाई करुन २५ हजार २०० इतका दंड वसूल करण्यात आला. चारचाकी वाहनांमध्ये वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल कारवाई करीत मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. १० हजार २६९ वाहनांवर कारवाई करुन १० लाख ३७ हजार ९०० रुपये इतकी रक्कम वसूल केली. या साऱ्या तपासणीनंतर दोन्ही महामार्गावरील वाहतूक नियमाला अधिन राहून होईल. (प्रतिनिधी)