शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाइ

By admin | Updated: December 16, 2014 00:14 IST

पर्यटकांसाठी सुरक्षितता : हातखंबा वाहतूक पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; शिस्त पाळा, अपघात टाळार्

रत्नागिरी : यंदाच्या वर्षातील जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई - गोवा व रत्नागिरी - नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस शाखेच्या हातखंबा पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एकूण १० हजार ९४६ वाहनांवर व चालकांवर कायदेशीर कारवाई करून ११ लाख ६९ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.महामार्ग वाहतूक पोलीस शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरकर यांनी सांगितले की, महामार्ग पोलीस वाहतूक विभाग, महासंचालक ठाणे यांच्या आदेशानुसार महामार्गावरील अवजड व अतिरिक्त भार वाहून नेणारी वाहने, हेल्मेट न वापरणारे दुचाकीस्वार, भरधाव वेगाने वाहन चालविणे, वाहनांच्या काचांवर फिल्म लावणे, सीट बेल्ट न लावणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, वाहनांवर रिफ्लेक्टर न लावणे, मालवाहतूक करताना वाहनातून रस्त्यावर पाणी सांडणे, वाहनाचे टेललॅम्प, इंडिकेटर सुरु नसणे, अवजड ट्रेलर यांसारख्या वाहनातून वाहनांचा फाळका न लावता उघडपणे मोठे पाईप, लोखंडी सळीसारखे साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम डिसेंबर २०१४च्या अखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे. वाहन चालकांना शिस्त लागून अपघात कमी व्हावेत, हा मुख्य उद्देश आहे.कोकणात सध्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. पर्यटन हंगाम असल्याने दोन्ही महामार्गावर वाहतुकीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच काही वाहन चालक नियमांचे उल्लंघन करतात. त्याचा फटका इतर वाहनांना बसतो. प्रसंगी जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे महामार्गावरची वाहतूकही विस्कळीत होते. वाहन चालकांना शिस्त लागण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. दंडात्मक कारवाई ही मुंबई - गोवा महामार्गावरील बावनदी, निवळी ते खारेपाटण, खाडेवाडी व रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील आंबा गाव या टप्प्यामध्ये अनुक्रमे ८५ किलोमीटर ते ७३ किलोमीटरच्या दरम्यान गस्तीच्या वेळी ही कारवाई करण्यात आली. अकरा महिन्यांमध्ये विशेष मोहिमेंतर्गत हेल्मेट न वापरता दुचाकी चालविणे, यामध्ये २६६ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करुन २६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महामार्गावर अती वेगाने वाहन चालविणाऱ्या १५९ चालकांवर कलम १८४ अन्वये कारवाई करुन ७९ हजार ५०० इतका दंड वसूल करण्यात आला. वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावल्याबद्दल २५२ वाहनांवर कारवाई करुन २५ हजार २०० इतका दंड वसूल करण्यात आला. चारचाकी वाहनांमध्ये वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल कारवाई करीत मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. १० हजार २६९ वाहनांवर कारवाई करुन १० लाख ३७ हजार ९०० रुपये इतकी रक्कम वसूल केली. या साऱ्या तपासणीनंतर दोन्ही महामार्गावरील वाहतूक नियमाला अधिन राहून होईल. (प्रतिनिधी)