शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कातळशिल्पांचा युनेस्कोकडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:28 IST

रत्नागिरी : युनेस्कोतर्फे जागतिक स्तरावर जनजागृतीसाठी दरवर्षी जागतिक वारसा दिन दि.१८ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. यावर्षी ‘जटिल भूतकाळ ...

रत्नागिरी : युनेस्कोतर्फे जागतिक स्तरावर जनजागृतीसाठी दरवर्षी जागतिक वारसा दिन दि.१८ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. यावर्षी ‘जटिल भूतकाळ व वैविध्यपूर्ण भविष्य’ही थीम घेण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यातर्फे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणातर्फे ‘कातळशिल्पासह सैनिकी स्थापत्याचा’ प्रस्ताव युनेस्कोकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर कोकणच्या कातळशिल्पांना भविष्यात सर्वोच्च स्थान प्राप्त होणार आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडे एकूण १८ प्रस्ताव नामांकनासाठी दाखल झाले होते. त्यातील चार प्रस्तावांना मान्यता दर्शविण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या दोन प्रस्तावांची निवड झाली आहे. कातळशिल्पासह सैनिकी स्थापत्याचे प्रस्ताव नामांकनासाठी दाखल करण्यात आले आहेत. युनेस्कोकडून या प्रस्तावांना मंजुरी मिळताच तज्ज्ञांच्या टीमकडून त्यावर स्वतंत्र प्रस्ताव तयार केला जाणार आहे.

सैनिकी स्थापत्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे डोंगरी व समुद्री किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा/रांगणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग कुलाबा आदी किल्ल्यांचा समावेश आहे.

पुरातत्व व वास्तुसंग्रहालये संचालनालयातर्फे व इनटॅक संस्थेच्या मदतीने जागतिक वारसा स्थळासाठी युनेस्कोकडून नामांकन मिळविण्यासाठी विस्तृत प्रस्ताव पाठविण्यात आला हाेता. महाराष्ट्रातील किल्ल्यांचे महत्त्व जागतिक पातळीवर वाढले, तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ सुरू होऊन स्थानिक अर्थकारणात भर पडेल. तसेच कातळशिल्पांमुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांमुळे दुर्लक्षित कोकणचे सड्यांनाही नावलाैकिक लाभेल. अश्मयुगीन कातळशिल्पांमुळे कलेचा हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास समोर येणार आहे. कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरूण उक्षी, कुडोपी या महाराष्ट्रातील तसेच गोवा राज्यातील फणसईमाळ या कातळशिल्पांना नामांकन प्राप्त झाले आहे. कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असून युनेस्कोकडून मान्यता प्राप्त होताच जागतिक स्तरावर कातळशिल्पांना स्थान प्राप्त होऊन जिल्ह्याच्या नावलाैकिकात आणखी भर पडणार आहे.

कोट घ्यावा

२०१४-१५ पासून सुरू झालेल्या कातळशिल्प शोधमोहिमेस यश प्राप्त होत आहे. देशपातळीवर दखल घेण्यात आल्यानेच युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मान्यतेनंतर जागतिक स्तरावर काेकणच्या सड्यांना सर्वोच्च स्थान प्राप्त होईल. त्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, तसेच इतिहासप्रेमींचे सहकार्य लाभत आहे.

- सुधीर रिसबूड, कातळशिल्प शोधकर्ते