शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

काेरोनाच्या भीतीने भावकीत आलेय अंतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोरोना कालावधीत माणुसकीचे विविध पैलू नजरेसमोर येत आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : कोरोना कालावधीत माणुसकीचे विविध पैलू नजरेसमोर येत आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंब तसेच त्यांच्या भावकीतील लोकही पुढे येत नाहीत. त्यामुळे गावातील ग्रामसेवकच अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेत आहेत़ तालुक्यातील मार्गताम्हाणे बुद्रुक येथेही असाच प्रकार घडला. बाधित व्यक्तीचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कारासाठी कोणीही आले नाही. अखेर ग्रामसेवकाने पुढाकार घेतल्यावर चौघेजण तयार झाले आणि अंत्यविधी पार पडला. अशा घटनांमुळे भावकी - भावकीत अंतर निर्माण झाल्याचे चित्र बहुतांशी ठिकाणी पाहायला मिळत आहे.

काेराेनाच्या काळात ग्रामीण भागात शासकीय यंत्रणेला काम करताना तितक्याच अडचणींना सामाेरे जावे लागते आहे. विशेषतः कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर या अडचणी निर्माण होत आहेत. अनेकदा मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह स्वीकारला जात नाही किंवा त्यावर अंत्यविधी करण्यासाठी मृत व्यक्तीची भावकी, नातेवाईक, कुटुंबीय आणि ग्रामस्थ पुढाकार घेत नसल्याचे धक्कादायक प्रकार पुढे येऊ लागले आहेत. तालुक्यातील मार्गताम्हाणे बुद्रुक येथे एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांना व ग्रामस्थांना कल्पना देण्यात आली. त्यानंतर मृताचा भाऊ व भावकीतील एक सदस्य पुढे आले. ग्रामकृती दलातील सदस्यांनी अंत्यविधीची तयारी केली. रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत मृतास नेण्यासाठी चार व्यक्ती उपस्थित नव्हत्या. शेवटी ग्रामसेवक मनोहर शंकर गायकवाड यांनी याकामी पुढाकार घेतल्यावर रुग्णवाहिकेचे चालकही तयार झाले. सर्वांनी पीपीई कीट घालून मृतास स्मशानशेडपर्यंत नेले. तिथे अंत्यसंस्कार झाल्यावर सर्वजण परतले. ग्रामसेवक गायकवाड यांनी पुढाकार घेऊन अशापद्धतीने पाच व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले आहेत.

काही ठिकाणी ग्रामकृतीदलही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत नसल्याने अडचणी येऊ लागल्या आहेत. कोरोना कालावधीत भीतीपोटी भावकीत वाढलेले अंतर कमी करण्यासाठी ग्रामकृती दलातून प्रयत्न होण्याची गरज आहे.

----------------------------

कोरोनाबाधित मृतदेहांचा अंत्यविधी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तयारी ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता पीपीई कीट व अन्य यंत्रणा ग्रामपंचायतीने उपलब्ध केल्यास अडचणी येणार नाही. गावा-गावांमधून अशाच पद्धतीने अंत्यविधी पार पडत आहेत. त्यामुळे शहरातील स्मशानभूमीवर अवलंबून राहता त्या-त्या गावांतील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी भावकी, ग्रामकृतीदलाने पुढे येण्याची गरज आहे. प्रशासनावर अधिक भार टाकणे योग्य नाही.

- शौकत मुकादम, माजी सभापती, चिपळूण पंचायत समिती