शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

काेरोनाच्या भीतीने भावकीत आलेय अंतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोरोना कालावधीत माणुसकीचे विविध पैलू नजरेसमोर येत आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : कोरोना कालावधीत माणुसकीचे विविध पैलू नजरेसमोर येत आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंब तसेच त्यांच्या भावकीतील लोकही पुढे येत नाहीत. त्यामुळे गावातील ग्रामसेवकच अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेत आहेत़ तालुक्यातील मार्गताम्हाणे बुद्रुक येथेही असाच प्रकार घडला. बाधित व्यक्तीचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कारासाठी कोणीही आले नाही. अखेर ग्रामसेवकाने पुढाकार घेतल्यावर चौघेजण तयार झाले आणि अंत्यविधी पार पडला. अशा घटनांमुळे भावकी - भावकीत अंतर निर्माण झाल्याचे चित्र बहुतांशी ठिकाणी पाहायला मिळत आहे.

काेराेनाच्या काळात ग्रामीण भागात शासकीय यंत्रणेला काम करताना तितक्याच अडचणींना सामाेरे जावे लागते आहे. विशेषतः कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर या अडचणी निर्माण होत आहेत. अनेकदा मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह स्वीकारला जात नाही किंवा त्यावर अंत्यविधी करण्यासाठी मृत व्यक्तीची भावकी, नातेवाईक, कुटुंबीय आणि ग्रामस्थ पुढाकार घेत नसल्याचे धक्कादायक प्रकार पुढे येऊ लागले आहेत. तालुक्यातील मार्गताम्हाणे बुद्रुक येथे एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांना व ग्रामस्थांना कल्पना देण्यात आली. त्यानंतर मृताचा भाऊ व भावकीतील एक सदस्य पुढे आले. ग्रामकृती दलातील सदस्यांनी अंत्यविधीची तयारी केली. रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत मृतास नेण्यासाठी चार व्यक्ती उपस्थित नव्हत्या. शेवटी ग्रामसेवक मनोहर शंकर गायकवाड यांनी याकामी पुढाकार घेतल्यावर रुग्णवाहिकेचे चालकही तयार झाले. सर्वांनी पीपीई कीट घालून मृतास स्मशानशेडपर्यंत नेले. तिथे अंत्यसंस्कार झाल्यावर सर्वजण परतले. ग्रामसेवक गायकवाड यांनी पुढाकार घेऊन अशापद्धतीने पाच व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले आहेत.

काही ठिकाणी ग्रामकृतीदलही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत नसल्याने अडचणी येऊ लागल्या आहेत. कोरोना कालावधीत भीतीपोटी भावकीत वाढलेले अंतर कमी करण्यासाठी ग्रामकृती दलातून प्रयत्न होण्याची गरज आहे.

----------------------------

कोरोनाबाधित मृतदेहांचा अंत्यविधी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तयारी ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता पीपीई कीट व अन्य यंत्रणा ग्रामपंचायतीने उपलब्ध केल्यास अडचणी येणार नाही. गावा-गावांमधून अशाच पद्धतीने अंत्यविधी पार पडत आहेत. त्यामुळे शहरातील स्मशानभूमीवर अवलंबून राहता त्या-त्या गावांतील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी भावकी, ग्रामकृतीदलाने पुढे येण्याची गरज आहे. प्रशासनावर अधिक भार टाकणे योग्य नाही.

- शौकत मुकादम, माजी सभापती, चिपळूण पंचायत समिती