शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

काेरोनाच्या भीतीने भावकीत आलेय अंतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोरोना कालावधीत माणुसकीचे विविध पैलू नजरेसमोर येत आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : कोरोना कालावधीत माणुसकीचे विविध पैलू नजरेसमोर येत आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंब तसेच त्यांच्या भावकीतील लोकही पुढे येत नाहीत. त्यामुळे गावातील ग्रामसेवकच अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेत आहेत़ तालुक्यातील मार्गताम्हाणे बुद्रुक येथेही असाच प्रकार घडला. बाधित व्यक्तीचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कारासाठी कोणीही आले नाही. अखेर ग्रामसेवकाने पुढाकार घेतल्यावर चौघेजण तयार झाले आणि अंत्यविधी पार पडला. अशा घटनांमुळे भावकी - भावकीत अंतर निर्माण झाल्याचे चित्र बहुतांशी ठिकाणी पाहायला मिळत आहे.

काेराेनाच्या काळात ग्रामीण भागात शासकीय यंत्रणेला काम करताना तितक्याच अडचणींना सामाेरे जावे लागते आहे. विशेषतः कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर या अडचणी निर्माण होत आहेत. अनेकदा मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह स्वीकारला जात नाही किंवा त्यावर अंत्यविधी करण्यासाठी मृत व्यक्तीची भावकी, नातेवाईक, कुटुंबीय आणि ग्रामस्थ पुढाकार घेत नसल्याचे धक्कादायक प्रकार पुढे येऊ लागले आहेत. तालुक्यातील मार्गताम्हाणे बुद्रुक येथे एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांना व ग्रामस्थांना कल्पना देण्यात आली. त्यानंतर मृताचा भाऊ व भावकीतील एक सदस्य पुढे आले. ग्रामकृती दलातील सदस्यांनी अंत्यविधीची तयारी केली. रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत मृतास नेण्यासाठी चार व्यक्ती उपस्थित नव्हत्या. शेवटी ग्रामसेवक मनोहर शंकर गायकवाड यांनी याकामी पुढाकार घेतल्यावर रुग्णवाहिकेचे चालकही तयार झाले. सर्वांनी पीपीई कीट घालून मृतास स्मशानशेडपर्यंत नेले. तिथे अंत्यसंस्कार झाल्यावर सर्वजण परतले. ग्रामसेवक गायकवाड यांनी पुढाकार घेऊन अशापद्धतीने पाच व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले आहेत.

काही ठिकाणी ग्रामकृतीदलही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत नसल्याने अडचणी येऊ लागल्या आहेत. कोरोना कालावधीत भीतीपोटी भावकीत वाढलेले अंतर कमी करण्यासाठी ग्रामकृती दलातून प्रयत्न होण्याची गरज आहे.

----------------------------

कोरोनाबाधित मृतदेहांचा अंत्यविधी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तयारी ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता पीपीई कीट व अन्य यंत्रणा ग्रामपंचायतीने उपलब्ध केल्यास अडचणी येणार नाही. गावा-गावांमधून अशाच पद्धतीने अंत्यविधी पार पडत आहेत. त्यामुळे शहरातील स्मशानभूमीवर अवलंबून राहता त्या-त्या गावांतील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी भावकी, ग्रामकृतीदलाने पुढे येण्याची गरज आहे. प्रशासनावर अधिक भार टाकणे योग्य नाही.

- शौकत मुकादम, माजी सभापती, चिपळूण पंचायत समिती