शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात काेराेना वाढतोय, सॅनिटायझरचा वापर घटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शिमगोत्सवात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे पुन्हा कोरोना वाढण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शिमगोत्सवात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे पुन्हा कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, याबाबत नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर बेफिकीरी दाखविली जात आहे. सध्या मास्क आणि सॅनिटायझरचा वापरच कमी झाल्याने त्यांच्या विक्रीतही गतवर्षीपेक्षा घट झाली आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यानंतर लोकांच्या मनात कोरोनाबाबत भीती मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने तसेच संचारबंदीच्या अनुषंंगाने कडक नियम करण्यात आल्याने सॅनिटायझर आणि मास्कचा वापर मोठ्या प्रमाणावर होत हाेता.

ऑक्टोबर महिन्यात लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल झाले. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली. त्यामुळे कोरोना गेला, असे समजून नागरिकांचा विना मास्क वावर वाढला तसेच सॅनिटायझरचाही वापर कमी झाला. त्यामुळे औषधांच्या दुकानातील मास्क आणि सॅनिटायझरची विक्री घटली आहे.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असली तरीही नागरिकांमध्ये बेफिकीरी दिसून येत आहे.

लोक मास्क वापरतात. पण तो नाकावरच लावतात आणि समोर कोण बोलायला आले तर चेहरा न झाकता उलट मास्क खाली करून बोलतात. हे जास्त संसर्ग वाढण्यासाठी धोकादायक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझरचाही वापर आता फारसा करताना दिसत नाहीत.

- उन्मेष शिंदे, अध्यक्ष

केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, रत्नागिरी

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया

काही वेळा मास्कचा वापर केल्यावर घुसमटल्यासारखे वाटते. त्यामुळे नेहमी मास्क वापरला जात नाही. तसेच सॅनिटायझरऐवजी वारंवार हात धुतले जातात. त्यामुळे अपाय होत नाही. सध्या आम्ही सॅनिटायझर पूर्णपणे बंद केले असून हात धुण्यासाठी पाण्याचा वापर करतो.

- चेतन केंद्रे, रत्नागिरी

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरलाच पाहिजे. सध्या मास्क हे कोरोनापासून वाचविणारे उत्तम शस्त्र आहे. त्याचबरोबर प्रवास करताना किंवा बाहेर वावरताना सॅनिटायझरचा वापर होणे गरजेचे आहे. घरात असताना सॅनिटायझरऐवजी पाण्याचा वापर केल्यास सॅनिटायझरचे दुष्परिणाम होणार नाहीत.

- रेखा सावंत, रत्नागिरी

मास्क, सॅनिटायझर विक्री घटली

सध्या लोकांमध्ये मास्क आणि सॅनिटायझरच्या वापराबाबत उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी मास्क आणि सॅनिटायझरच्या विक्रीत घट झाल्याचे मारूती मंदिर येथील औषध विक्रेत्याने सांगितले.

मास्क आता सगळेच औषध दुकानातून नेतात असे नाही. आता घरगुती अनेक व्यक्ती मास्क विकतात. त्यामुळे मास्कच्या दुकानातील विक्रीत घट झाल्याचे एका औषध विक्रेत्याने सांगितले.

मास्क आणि सॅनिटायझरच्या विक्रीत सुमारे ५० टक्के घट झाली असल्याचे आरोग्य मंदिर येथील एका औषध विक्रेत्याकडून सांगण्यात आले.

कोरोनाचे प्रमाण कमी होताच लोकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे कमी केले आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी विक्री ५० टक्के घटली असल्याचे मारूती मंदिर येथील एका औषध विक्रेत्याने सांगितले.