शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यात काेराेना वाढतोय, सॅनिटायझरचा वापर घटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शिमगोत्सवात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे पुन्हा कोरोना वाढण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शिमगोत्सवात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे पुन्हा कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, याबाबत नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर बेफिकीरी दाखविली जात आहे. सध्या मास्क आणि सॅनिटायझरचा वापरच कमी झाल्याने त्यांच्या विक्रीतही गतवर्षीपेक्षा घट झाली आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यानंतर लोकांच्या मनात कोरोनाबाबत भीती मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने तसेच संचारबंदीच्या अनुषंंगाने कडक नियम करण्यात आल्याने सॅनिटायझर आणि मास्कचा वापर मोठ्या प्रमाणावर होत हाेता.

ऑक्टोबर महिन्यात लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल झाले. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली. त्यामुळे कोरोना गेला, असे समजून नागरिकांचा विना मास्क वावर वाढला तसेच सॅनिटायझरचाही वापर कमी झाला. त्यामुळे औषधांच्या दुकानातील मास्क आणि सॅनिटायझरची विक्री घटली आहे.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असली तरीही नागरिकांमध्ये बेफिकीरी दिसून येत आहे.

लोक मास्क वापरतात. पण तो नाकावरच लावतात आणि समोर कोण बोलायला आले तर चेहरा न झाकता उलट मास्क खाली करून बोलतात. हे जास्त संसर्ग वाढण्यासाठी धोकादायक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझरचाही वापर आता फारसा करताना दिसत नाहीत.

- उन्मेष शिंदे, अध्यक्ष

केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, रत्नागिरी

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया

काही वेळा मास्कचा वापर केल्यावर घुसमटल्यासारखे वाटते. त्यामुळे नेहमी मास्क वापरला जात नाही. तसेच सॅनिटायझरऐवजी वारंवार हात धुतले जातात. त्यामुळे अपाय होत नाही. सध्या आम्ही सॅनिटायझर पूर्णपणे बंद केले असून हात धुण्यासाठी पाण्याचा वापर करतो.

- चेतन केंद्रे, रत्नागिरी

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरलाच पाहिजे. सध्या मास्क हे कोरोनापासून वाचविणारे उत्तम शस्त्र आहे. त्याचबरोबर प्रवास करताना किंवा बाहेर वावरताना सॅनिटायझरचा वापर होणे गरजेचे आहे. घरात असताना सॅनिटायझरऐवजी पाण्याचा वापर केल्यास सॅनिटायझरचे दुष्परिणाम होणार नाहीत.

- रेखा सावंत, रत्नागिरी

मास्क, सॅनिटायझर विक्री घटली

सध्या लोकांमध्ये मास्क आणि सॅनिटायझरच्या वापराबाबत उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी मास्क आणि सॅनिटायझरच्या विक्रीत घट झाल्याचे मारूती मंदिर येथील औषध विक्रेत्याने सांगितले.

मास्क आता सगळेच औषध दुकानातून नेतात असे नाही. आता घरगुती अनेक व्यक्ती मास्क विकतात. त्यामुळे मास्कच्या दुकानातील विक्रीत घट झाल्याचे एका औषध विक्रेत्याने सांगितले.

मास्क आणि सॅनिटायझरच्या विक्रीत सुमारे ५० टक्के घट झाली असल्याचे आरोग्य मंदिर येथील एका औषध विक्रेत्याकडून सांगण्यात आले.

कोरोनाचे प्रमाण कमी होताच लोकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे कमी केले आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी विक्री ५० टक्के घटली असल्याचे मारूती मंदिर येथील एका औषध विक्रेत्याने सांगितले.