शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात काेराेना वाढतोय, सॅनिटायझरचा वापर घटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शिमगोत्सवात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे पुन्हा कोरोना वाढण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शिमगोत्सवात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे पुन्हा कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, याबाबत नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर बेफिकीरी दाखविली जात आहे. सध्या मास्क आणि सॅनिटायझरचा वापरच कमी झाल्याने त्यांच्या विक्रीतही गतवर्षीपेक्षा घट झाली आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यानंतर लोकांच्या मनात कोरोनाबाबत भीती मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने तसेच संचारबंदीच्या अनुषंंगाने कडक नियम करण्यात आल्याने सॅनिटायझर आणि मास्कचा वापर मोठ्या प्रमाणावर होत हाेता.

ऑक्टोबर महिन्यात लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल झाले. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली. त्यामुळे कोरोना गेला, असे समजून नागरिकांचा विना मास्क वावर वाढला तसेच सॅनिटायझरचाही वापर कमी झाला. त्यामुळे औषधांच्या दुकानातील मास्क आणि सॅनिटायझरची विक्री घटली आहे.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असली तरीही नागरिकांमध्ये बेफिकीरी दिसून येत आहे.

लोक मास्क वापरतात. पण तो नाकावरच लावतात आणि समोर कोण बोलायला आले तर चेहरा न झाकता उलट मास्क खाली करून बोलतात. हे जास्त संसर्ग वाढण्यासाठी धोकादायक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझरचाही वापर आता फारसा करताना दिसत नाहीत.

- उन्मेष शिंदे, अध्यक्ष

केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, रत्नागिरी

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया

काही वेळा मास्कचा वापर केल्यावर घुसमटल्यासारखे वाटते. त्यामुळे नेहमी मास्क वापरला जात नाही. तसेच सॅनिटायझरऐवजी वारंवार हात धुतले जातात. त्यामुळे अपाय होत नाही. सध्या आम्ही सॅनिटायझर पूर्णपणे बंद केले असून हात धुण्यासाठी पाण्याचा वापर करतो.

- चेतन केंद्रे, रत्नागिरी

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरलाच पाहिजे. सध्या मास्क हे कोरोनापासून वाचविणारे उत्तम शस्त्र आहे. त्याचबरोबर प्रवास करताना किंवा बाहेर वावरताना सॅनिटायझरचा वापर होणे गरजेचे आहे. घरात असताना सॅनिटायझरऐवजी पाण्याचा वापर केल्यास सॅनिटायझरचे दुष्परिणाम होणार नाहीत.

- रेखा सावंत, रत्नागिरी

मास्क, सॅनिटायझर विक्री घटली

सध्या लोकांमध्ये मास्क आणि सॅनिटायझरच्या वापराबाबत उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी मास्क आणि सॅनिटायझरच्या विक्रीत घट झाल्याचे मारूती मंदिर येथील औषध विक्रेत्याने सांगितले.

मास्क आता सगळेच औषध दुकानातून नेतात असे नाही. आता घरगुती अनेक व्यक्ती मास्क विकतात. त्यामुळे मास्कच्या दुकानातील विक्रीत घट झाल्याचे एका औषध विक्रेत्याने सांगितले.

मास्क आणि सॅनिटायझरच्या विक्रीत सुमारे ५० टक्के घट झाली असल्याचे आरोग्य मंदिर येथील एका औषध विक्रेत्याकडून सांगण्यात आले.

कोरोनाचे प्रमाण कमी होताच लोकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे कमी केले आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी विक्री ५० टक्के घटली असल्याचे मारूती मंदिर येथील एका औषध विक्रेत्याने सांगितले.