शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

कालव्यांना प्रतीक्षा पाण्याची..!

By admin | Updated: December 2, 2014 23:17 IST

गडगडी प्रकल्प : कोट्यवधीचा खर्च पाण्यात, शेतकरी तहानलेलाच!

देवरूख : येथील शेतकऱ्याला शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध व्हावे आणि शेती बहरुन फुलावी, या उद्देशाने हाती घेतलेला संगमेश्वर तालुक्यातील गडगडी धरण प्रकल्प तीस वर्षांनंतरही पूर्णत्त्वाच्या प्रतीक्षेत आहे. या धरण प्रकल्पाचे काम अद्याप अपूर्णावस्थेतच असून, कोट्यवधी रुपयांचा निधी धरणामध्ये जिरला आहे. मात्र, अजूनही कालव्यांना पाण्याची प्रतीक्षा आहे.संगमेश्वर तालुक्यातील वाशी येथील गडगडी नदी धरण प्रकल्पाची दोन वर्षांपूर्वी पुन्हा उंची वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, हे कामही अद्यापह अपूर्णावस्थेत आहे. केवळ ठेकेदार गब्बर व्हावेत, या उद्देशानेच धरणाचे काम झाल्याचे दिसत आहे. गेल्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतरही आजघडीला धरणाचे कालवे पूर्ण होणे बाकी आहे. झालेल्या कालव्यामध्ये गाळ साचला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कित्येक हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याऐवजी पाणी वाया जाताना दिसत आहे. या धरणाचा फायदा १३पेक्षा अधिक गावातील शेतकऱ्यांना होऊ शकतो. मात्र, आजची स्थिती पाहता धरणाच्या डाव्या बाजूच्या कालव्याने वाहणारे पाणी हे तेथील नजीकच्या शेतकऱ्यांना मिळत होते.या डाव्या बाजूच्या कालव्यातून चावी असलेल्या बाजूच्या कालव्यातून सध्या पाणी सोडले नसल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. मात्र, या कालव्यातून वाहणाऱ्या पाण्यावरच तेथील शेतकऱ्यांची उन्हाळी शेती होत होती. हा कालवा सिमेंट क्राँक्रिटने बांधलेल्या ठिकाणाच्या शेवटच्या बाजूजवळ मोठी भेग गेली आहे. त्यामुळे या कालव्यातील पाणी सध्या मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. वाया जाणाऱ्या पाण्याकडे गडगडी नदी पाटबंधारे विभागाचे सध्या दुर्लक्ष दिसून येत आहे. खरेतर या कालव्यातून वाहणारे पाणी हे शेतकऱ्यांना उपयुक्त होते. मात्र, या कालव्याला छेद मिळाल्याने उन्हाळी शेतीला मिळणारे पाणी सध्या मिळेनासे झाले आहे.वाशी - किंजळे येथील गडगडी नदी धरण प्रकल्पाच्या धरणातील पाणी साठ्याची क्षमता १३.५२६ दशलक्ष घनमीटर (टीएमसी) एवढी आहे. संगमेश्वर तालुक्यातील या गडगडी लघु पाटबंधारे प्रकल्पाला १९७८-७९ साली मान्यता मिळाली असली तरी १९८२ला अंतिम मंजूरी मिळाली. अंतिम मंजुरी मिळाली तेव्हा या प्रकल्पाची अंदाजित रक्कम २ कोटी एवढी होती. या कामाला खऱ्या अर्थाने १९८७ साली प्रत्यक्ष सुरुवात झाली. या धरणामुळे तब्बल ९९६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे गरजेचे होते. मात्र, ३० ते ३२ वर्षांच्या काळानंतर सुमारे ९० कोटींच्या घरामध्ये पोहोचलेला हा प्रकल्प मार्गी लागला का? हा प्रश्न सध्या तालुकावासीयांना भेडसावत आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे आजपर्यंत ९० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी या गडगडी नदी धरण प्रकल्पात जिरला आहे. मात्र, ९९६ क्षेत्रापैकी किती हेक्टर जमीन ओलिताखाली आली, याचे संशोधन करणे आणि हा प्रश्न मार्गी लावणे सध्याच्या सरकारला क्रमप्राप्त आहे. (प्रतिनिधी)ग्रामस्थांचा पुढाकारयाविषयी स्थानिक ग्रामस्थांना विचारले असता त्यांनी सांगितले की, उन्हाळी शेती करणारे येथील शेतकरी या कालव्याची देखभाल करतात. वाया जाणारे पाणीदेखील सुस्थितीत करण्यासाठी येथील ग्रामस्थच नेहमी पुढाकार घेत असल्याचे उत्तर एका स्थानिक ग्रामस्थाने दिले.कायमस्वरुपी उपअभियंताच नाहीमध्यम पाटबंधारे विभागाच्या या गडगडी नदी प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या गडगडी नदी प्रकल्प कार्यालयाचे उपअभियंता हे एप्रिलला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर या कार्यालयाला सध्या कायमस्वरुपी उपअभियंता नसल्याने येथील कार्यालयाला हक्काचा कारभारीच नसल्याने येथील कारभार पाहण्यासाठी चिपळूणच्या उपअभियंत्यांकडे प्रभारी पदभार देण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी प्रभारी किती दिवसांनी भेट देतात, याविषयी माहिती कळू शकलेली नाही.