शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रचारामध्ये मुंबईकरांची गाडी सुसाट--: पदाधिकारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 11:07 IST

नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत स्थिरावलेले असंख्य कोकणी लोक लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोकणातल्या आपापल्या गावी डेरेदाखल झाले आहेत. शिवसेना आणि स्वाभिमानने यात विशेष आघाडी घेतली

ठळक मुद्देशिवसेना-स्वाभिमानकडून जोरदार फिल्डींग

मनोज मुळ्ये  ।

रत्नागिरी : नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत स्थिरावलेले असंख्य कोकणी लोक लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोकणातल्या आपापल्या गावी डेरेदाखल झाले आहेत. शिवसेना आणि स्वाभिमानने यात विशेष आघाडी घेतली असून, ग्रामीण भागात मुंबईकरांच्या प्रचाराने अधिक वेग घेतला आहे.

कोकणातील विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जवळजवळ प्रत्येक घरातील एक व्यक्ती तरी मुंबईत नोकरी, व्यवसायासाठी स्थलांतरीत झाली आहे. परक्या गावात गेल्यानंतर तेथे असलेले आपल्या गावातील लोक शोधण्याची सहज प्रवृत्ती असते. त्यातूनच मुंबईत असंख्य ग्रामविकास मंडळे आहेत. ही मंडळे आपापल्या गावातील समस्या मंत्रालय स्तरावरून मार्गी लावतात. गावाच्या ध्येयधोरणांचे निर्णयही अनेकदा या ग्रामविकास मंडळांकडून घेतले जातात आणि ते गावात मान्यही केले जातात. ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे.

मुंबईतील मतदान २९ रोजी असल्यामुळे रत्नागिरीतील मतदान आटोपल्यानंतर हे सर्व मुंबईत जाऊन प्रचार करतील, असे नियोजन आहे.

शिवसेनेचा संपर्क अधिक

मुंबईत असलेली कोकणी मंडळे, कोकणी लोकप्रतिनिधी यात शिवसेनेचा वाटा मोठा आहे. त्यात शिवसेना उमेदवार विनायक राऊत हे पक्षाचे सचिव असल्याने त्यांचा या मंडळांशी चांगला संपर्क आहे. मुंबईतील कामगारांशी संपर्क चांगला आहे आणि शिवसेनेचे मुंबईतील बहुतांश लोकप्रतिनिधी कोकणातील आहेत. त्यामुळे मुंबईकर शिवसेनेच्या अधिक फायद्याचे आहेत.

शिवसेनेचा संपर्क अधिक

मुंबईत असलेली कोकणी मंडळे, कोकणी लोकप्रतिनिधी यात शिवसेनेचा वाटा मोठा आहे. त्यात शिवसेना उमेदवार विनायक राऊत हे पक्षाचे सचिव असल्याने त्यांचा या मंडळांशी चांगला संपर्क आहे. मुंबईतील कामगारांशी संपर्क चांगला आहे आणि शिवसेनेचे मुंबईतील बहुतांश लोकप्रतिनिधी कोकणातील आहेत. त्यामुळे मुंबईकर शिवसेनेच्या अधिक फायद्याचे आहेत.

राणे यांचाही संपर्क

स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांचाही मुंबईतील कोकणी मंडळांशी चांगला संपर्क आहे. विविध खात्यांच्या मंत्री पदामुळे गावागावातील कामाच्या निमित्ताने ते या मंडळांशी जोडले गेले आहेत. नितेश राणे यांची मुंबईत समर्थ कामगार संघटना आहे. त्यामुळे मुंबईकरांना आपल्याकडे खेचण्यात शिवसेनेप्रमाणे स्वाभिमान पक्षही आग्रही आहे.

मुंबईस्थित मंडळे हा कोकणासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि अशा मंडळांचे महत्त्व राजकीय लोकांनाही चांगले माहिती आहे. त्यामुळेच अशा मंडळांशी राजकीय पक्षांकडून सातत्याने संपर्क ठेवला जातो. सध्याची निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच अशा मंडळांच्या मुंबईमध्ये बैठका घेण्यात आल्या आहेत. मंडळांच्या प्रमुख पदाधिकाºयांची गावातील लोकांशी चर्चा झाली आहे.

मुंबईत असलेल्या मंडळांमध्ये बहुतांश मध्यमवर्गीय मंडळींचा समावेश आहे. त्याखेरीज कामगारवर्गातही कोकणी माणसांची संख्या खूप मोठी आहे. बहुतांश कामगार संघटना शिवसेनेकडे आहेत. भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून या वर्गामध्ये शिवसेना पोहोचली आहे. त्यातच विनायक राऊत हे शिवसेनेचे सचिव असल्याने, कामगार संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. कोकणातील हे कामगारही या निवडणुकीत सहभागी होतात.

सर्वात महत्त्वाचा वर्ग आहे तो लोकप्रतिनिधी म्हणून मुंबईत काम करणाºयांचा. पक्षीय पदे किंवा नगरसेवक ते आमदार अशा विविध पदांवर अनेक कोकणी लोक काम करत आहेत. कामधंद्यासाठी मुंबईत गेलेल्या कोकणी लोकांनी शिवसेनेला खूप मोलाची साथ केली. त्यातून शिवसेना मोठी झाली. शिवसेना मोठी होतानाच असंख्य कोकणी लोकंही मोठी झाली.

शिवसेनेच्या पहिल्या फळीतही कोकणी लोकांची संख्या खूप मोठी होती. त्यातून अनेक कोकण लोक मुंबईतील राजकारणात शिरले आणि विविध पदांवर विराजमान झाले. मुंबई महापालिकेतील अनेक नगरसेवक मूळचे कोकणातील आहेत. ज्यावेळी कोणत्याही निवडणुका येतात, तेव्हा ही सर्व मंडळी प्रचारासाठी कोकणात आपापल्या गावी येतात. मुंबईकरांच्या शब्दाला गावागावात मान असल्याने त्यांच्या प्रचाराला राजकीय पातळीवरही महत्त्व दिले जात आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग