शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

बसफेऱ्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST

खेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणावर ...

खेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी होऊ लागल्याने खेड बस आगारातून सकाळी १० वाजता खेड-बोरीवली आणि खेड-पुणे-पिंपरी-चिंचवड या दोन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांची लगबग

मंडणगड : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी आता या हंगामाची तयारी करीत आहेत. खरीप हंगाम लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने बी-बियाणे विक्री केंद्र दिवसभर सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सर्व केंद्रांवर शेतकरी बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत.

दिशादर्शक फलक गायब

रत्नागिरी : जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दिशाफलक बसविण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळात हे कमी जाडीचे दिशादर्शक फलक भुईसपाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अपघात कमी व्हावेत म्हणून रस्त्याशेजारी असलेले फलकही गायब झाले आहेत.

रुग्णवाढीने चिंता व्यक्त

रत्नागिरी : जिल्ह्यात काही अंशी कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणाखाली येत आहे. परंतु काही तालुक्यांमध्ये अजूनही ही संख्या कमी-जास्त होत आहे. काही वेळा रुग्णसंख्या शून्यावर आल्याने दिलासा मिळतो. मात्र पुन्हा थोड्या दिवसांत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येच्या वाढीने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

ग्राहकांची झुंंबड

दापोली : कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र लॉकडाऊनचा फटका रास्त धान्य दुकानात येणाऱ्या ग्राहकाला बसू लागला आहे. शासनाने सर्व अत्यावश्यक सेवांची वेळ सकाळी ७ ते ११ अशी ठेवली आहे. त्यामुळे रास्त दर धान्य दुकानेही या वेळेत सुरू राहत असल्याने गर्दी होत आहे.